शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
2
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
3
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
4
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
5
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
6
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
7
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
8
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
9
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
10
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
11
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
12
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
13
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
14
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
15
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
16
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
17
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
18
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
19
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
20
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

वाघांच्या देशा

By admin | Updated: January 21, 2015 02:20 IST

सर्वसामान्य माणसांना भारतात कसेही दिवस येवोत, वाघांना मात्र ‘अच्छे दिन’ आल्याचे आज स्पष्ट झाले. २०१०च्या तुलनेत देशात तब्बल ३० टक्के वाघ वाढले

तीन वर्षांत संख्येत झाली ३० टक्के वाढनवी दिल्ली : सर्वसामान्य माणसांना भारतात कसेही दिवस येवोत, वाघांना मात्र ‘अच्छे दिन’ आल्याचे आज स्पष्ट झाले. २०१०च्या तुलनेत देशात तब्बल ३० टक्के वाघ वाढले असून त्यांची संख्या दोन हजार २२६वर पोहोचली आहे. देशातील वाघांची २०१४ची आकडेवारी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज जाहीर केली. जगभरात वाघांची संख्या घटत असताना भारताने मात्र यात वाढ नोंदविली आहे, हे विशेष. २००६ मध्ये देशातील वाघांची संख्या १४११ वर आल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि विविध पर्यावरणवादी संस्थांनी हातात हात घालून ‘वाघ वाचवा’ मोहीम हाती घेतली. २०१० साली या मोहिमेला यश आले आणि वाघांची संख्या १७०६वर पोहोचली. आता यात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कर्नाटक नंबर वन!कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि केरळात वाघांच्या संख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यातही कर्नाटक नंबर वन आहे. या राज्यात तब्बल ४०६ वाघांची नोंद झाली आहे. उत्तराखंडमध्ये ३४० वाघांची नोंद झाली आहे. केरळात १३६, तर तामिळनाडूत २२९ वाघ नोंदविले गेले आहेत. २०१०साली कर्नाटकात ३०० वाघ होते. ओडिशा आणि झारखंडमध्ये मात्र वाघांची संख्या घटली आहे. ओडिशामध्ये २०१० साली ३२ वाघ होते, आज ही संख्या २८, तर झारखंडमधील संख्या दहावरून तीनवर आली आहे. मेमध्ये आशियाई सिंहगणनागुजरात सरकारतर्फे दर पाच वर्षांनी होणारी आशियाई सिंहगणना गीरच्या अभयारण्यात २ ते ५ मेच्या दरम्यान होणार आहे. मागील गणना २०१० मध्ये झाली होती. त्यावेळी ४११ सिंहांची मोजणी करण्यात आली होती. च्जगभरातील ७० टक्के वाघ आता एकट्या भारतात असून वाघांचा उत्तम व्यवस्थापन करणारा देश म्हणून आपले नाव झाले असल्याची प्रतिक्रिया जावडेकर यांनी दिली.च्या व्याघ्रगणनेसाठी देशभरात ९ हजार ७३५ कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. वाघबहुल १८ राज्यांत ३ लाख ७८ हजार ११८ चौरस किलोमीटर परिसर जंगलाने व्यापला आहे. च्प्रेमात पडावी, अशी १५४० दुर्मिळ छायाचित्रे या गणनेदरम्यान मिळाली. वनकर्मचारी, सहभागी संस्था आणि सर्वांच्या पर्यावरणीय दृष्टिकोनामुळेच वाघांची संख्या वाढली आहे.