शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

तूरडाळीचे वरण आवाक्याबाहेरच

By admin | Updated: December 7, 2015 00:24 IST

रडाळीचे गगनाला भिडलेले भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले प्रयत्न पूर्णपणे फोल ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी १५५ रुपयांपर्यंत खाली आलेली तूरडाळ पुन्हा १७० रुपयांवर पोहोचली आहे

पुणे : तूरडाळीचे गगनाला भिडलेले भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले प्रयत्न पूर्णपणे फोल ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी १५५ रुपयांपर्यंत खाली आलेली तूरडाळ पुन्हा १७० रुपयांवर पोहोचली आहे. तसेच पुढील पंधरा दिवसांत नवीन तूरडाळीची आवक सुरू झाली तरी हे भाव सर्वसामान्यांच्या आटोक्यात येण्यासाठी नवीन वर्ष उजाडावे लागणार आहे. तूरडाळीचे भाव प्रतिकिलो २०० रुपयांच्या पुढे गेल्यानंतर राज्य सरकारने ही भाववाढ रोखण्यासाठी साठेबाजांवर कारवाई सुरू केली. साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला. तसेच जप्त केलेली डाळ प्रति किलो १०० रुपये भावाने खुल्या बाजारात आणण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र, या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. त्यावेळी घाऊक बाजारात तूरडाळीचे भाव १५५ ते १६० रुपयांपर्यंत खाली आले. पण मागील दोन आठवड्यांत हे भाव प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी वाढले आहेत. सध्या तूरडाळीचे भाव क्लिंटलमागे १२००० ते १७००० रुपये एवढे आहेत. किरकोळ बाजारात हे भाव अधिक आहेत.पुढील पंधरा दिवसांत तूरडाळीचा नवीन हंगाम सुरू होत आहे. बार्शी, लातूर, अकोला, विदर्भ, उदगीर, बेळगाव या भागातून ही डाळ बाजारात येईल. मात्र, सध्याचे चढे भाव पाहता नवीन माल बाजारात येऊनही त्यामध्ये फारसा बदल होण्याची चिन्हे नाहीत. नवीन आवक सुरू झाल्यानंतर त्याचे प्रमाण कमी असते. साधारण महिन्याभरात आवक वाढल्यानंतर भाव कमी व्हायला सुरुवात होईल, असे डाळीचे व्यापारी विजय राठोड यांनी सांगितले. सध्यातरी भाव कमी होण्याचे चिन्हे नसल्याने सर्वसामान्यांकडून तूरडाळीची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे तूरडाळीला तितकासा उठाव नाही. परिणामी नवीन तूरडाळीची व्यापाऱ्यांकडून मोठी खरेदी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नवीन तूरडाळीलाही लगेचच फारसा प्रतिसाद मिळणार नाही, असे व्यापाऱ्यांनी नमूद केले.