शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: June 6, 2016 23:50 IST

अहमदनगर: शहरासह जिल्ह्याला रविवारी रात्री झालेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला़ घरांच्या पडझडीत तिघे ठार तर, १३ जण जखमी झाले आहेत़ जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे

अहमदनगर: शहरासह जिल्ह्याला रविवारी रात्री झालेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला़ घरांच्या पडझडीत तिघे ठार तर, १३ जण जखमी झाले आहेत़ जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे १३८ घरांची पडझड झाली़विद्युत तारांवर झाडे व फांद्या उन्मळून पडल्याने सोमवारी दुपारपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता़ मुळा धरण परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प होता़ त्यामुळे शहरासह उपनगरांतील जनजीवन विस्कळीत झाले होते़ दरम्यान महावितरणकडून दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आल्याने काही ठिकाणी सायंकाळी विद्युत पुरवठा सुरळीत झाला़शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावली़ घराचा पत्रा लागून श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील भिसान इसाक शेख (वय-४) हा बालक जागीच ठार झाला़ नवनागापूर येथे भिंत कोसळून आदित्य साळुंके (वय १३) याचा मृत्यू झाला़ नगर तालुक्यातील अरणगाव येथील दादा ढमढेरे (वय, ५५) हे मयत झाले़ जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या घरांच्या पडझडीत १३ जण जखमी झाले असून, जखमीमध्ये संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील हेमलता मतू व कैलास भोलाराम, शेवगाव तालुक्यातील दहीफळ येथे राजू भाऊसाहेब पांढरे, कमल राजू पांढरे, प्रथमेश राजू पांढरे, उत्तम सीताराम ठोंबरे, संजय भाऊसाहेब ठोंबरे, संजय भाऊसाहेब ठोंबरे, गोजराबाई ठोंबरे हे अंगावर पत्रे पडून जखमी झाले आहेत़ (प्रतिनिधी)रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा सोमवारी दिवसभर बंद राहिला. २४ तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. मंगळवारपासून शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने मुळानगर, विळद पंपिंग स्टेशन येथील वीज पुरवठा खंडित झाला. रविवारी रात्रभर पाणी उपसा करणारे पंप बंद राहिल्याने शहर पाणी वितरण व्यवस्थेच्या टाक्या भरल्या नाहीत. परिणामी शहरासह उपनगराचा पाणी पुरवठा बंद राहिला.शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा झाला नाही. वीज नसल्याने हौदात थोडेसे असलेल्या पाण्याने अपार्टमेंटच्या टाक्या भरता आल्या नाहीत. काही घरांत तर पिण्याचे पाणीही नाही अन् वापराचेही नाही. विंधन विहीर असली तरी वीज नसल्याने बोअरिंगचे पाणीही मिळेना. विहीर कोसळलीइसळक येथील शेतकरी महादेव खामकर यांनी ८ ते १० लाख रुपये खर्चून विहिरीचे बांधकाम केले होते़ मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विहिरीचे बांधकाम पडले़ विहीर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे़ झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता़‘मुळा’ लाईन उध्दवस्तवादळाचा सर्वाधिक फटका बसला नगर ते मुळा धरण या २७ किलोमीटर वीजवाहिनीला. यादरम्यान एकूण २० ते २५ ठिकाणी विस्कळीतपणा आला होता. काही ठिकाणी तारा तुटल्या, तर बऱ्याच ठिकाणी वीजवाहिनीवर फांद्या पडल्या होत्या. सोमवारी रात्रीपर्यत दुरूस्तीचे काम सुरू होते. ‘मुळा’त नवीन पाणीमुळा धरण पाणलोट क्षेत्रात राहुरी तालुक्यात २५ तर मुळानगर परिसरात ३५ मि़ मी़ पाऊस झाला़ दगडांच्या खाणीत जोरदार पावसाचे आगमन झाले़ मुळा धरणात सोमवारी दिवसभरात एकूण ३१ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे़ त्यामुळे मुळा धरणातील पाणी पातळीत १५ फुटाने वाढ झाली आहे़ दहा संसार उघड्यावरनगर तालुक्यातील निंबळक येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने निंबळक- इसळक परिसरातील ८ ते १० घरांचे पत्रे उडाले़ त्यामुळे सुमारे दहा कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे़ निंबळक येथील रहिवासी भिमा कदम, रामदास शिंदे, कुंडलिक वायकर, सदाशिव वायकर यांच्या घरावरील पत्रे उडाले़ दयानंद देवकर, मनोज रोकडे, किसन यादव, रामकिसन गेरंगे, आदिनाथ गेरंगे, आदिनाथ गेरंगे यांच्या घरांच्या भिंती कोसळल्याने त्यांची तारांबळ उडाली़आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवाराजिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मागील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची बैठक घेऊन प्रत्येक तालुका मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते़ मात्र अद्याप एकाही तालुक्यात हा कक्ष सुरू करण्यात आला नाही़ त्यामुळे बाधित कुटुंबांना मदत मिळण्यास विलंब होत असून, काही ठिकाणी पंचनामे करण्यासाठी प्रशासन पोहोचले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़