शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: June 6, 2016 23:50 IST

अहमदनगर: शहरासह जिल्ह्याला रविवारी रात्री झालेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला़ घरांच्या पडझडीत तिघे ठार तर, १३ जण जखमी झाले आहेत़ जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे

अहमदनगर: शहरासह जिल्ह्याला रविवारी रात्री झालेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला़ घरांच्या पडझडीत तिघे ठार तर, १३ जण जखमी झाले आहेत़ जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे १३८ घरांची पडझड झाली़विद्युत तारांवर झाडे व फांद्या उन्मळून पडल्याने सोमवारी दुपारपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता़ मुळा धरण परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प होता़ त्यामुळे शहरासह उपनगरांतील जनजीवन विस्कळीत झाले होते़ दरम्यान महावितरणकडून दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आल्याने काही ठिकाणी सायंकाळी विद्युत पुरवठा सुरळीत झाला़शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावली़ घराचा पत्रा लागून श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील भिसान इसाक शेख (वय-४) हा बालक जागीच ठार झाला़ नवनागापूर येथे भिंत कोसळून आदित्य साळुंके (वय १३) याचा मृत्यू झाला़ नगर तालुक्यातील अरणगाव येथील दादा ढमढेरे (वय, ५५) हे मयत झाले़ जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या घरांच्या पडझडीत १३ जण जखमी झाले असून, जखमीमध्ये संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील हेमलता मतू व कैलास भोलाराम, शेवगाव तालुक्यातील दहीफळ येथे राजू भाऊसाहेब पांढरे, कमल राजू पांढरे, प्रथमेश राजू पांढरे, उत्तम सीताराम ठोंबरे, संजय भाऊसाहेब ठोंबरे, संजय भाऊसाहेब ठोंबरे, गोजराबाई ठोंबरे हे अंगावर पत्रे पडून जखमी झाले आहेत़ (प्रतिनिधी)रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा सोमवारी दिवसभर बंद राहिला. २४ तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. मंगळवारपासून शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने मुळानगर, विळद पंपिंग स्टेशन येथील वीज पुरवठा खंडित झाला. रविवारी रात्रभर पाणी उपसा करणारे पंप बंद राहिल्याने शहर पाणी वितरण व्यवस्थेच्या टाक्या भरल्या नाहीत. परिणामी शहरासह उपनगराचा पाणी पुरवठा बंद राहिला.शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा झाला नाही. वीज नसल्याने हौदात थोडेसे असलेल्या पाण्याने अपार्टमेंटच्या टाक्या भरता आल्या नाहीत. काही घरांत तर पिण्याचे पाणीही नाही अन् वापराचेही नाही. विंधन विहीर असली तरी वीज नसल्याने बोअरिंगचे पाणीही मिळेना. विहीर कोसळलीइसळक येथील शेतकरी महादेव खामकर यांनी ८ ते १० लाख रुपये खर्चून विहिरीचे बांधकाम केले होते़ मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विहिरीचे बांधकाम पडले़ विहीर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे़ झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता़‘मुळा’ लाईन उध्दवस्तवादळाचा सर्वाधिक फटका बसला नगर ते मुळा धरण या २७ किलोमीटर वीजवाहिनीला. यादरम्यान एकूण २० ते २५ ठिकाणी विस्कळीतपणा आला होता. काही ठिकाणी तारा तुटल्या, तर बऱ्याच ठिकाणी वीजवाहिनीवर फांद्या पडल्या होत्या. सोमवारी रात्रीपर्यत दुरूस्तीचे काम सुरू होते. ‘मुळा’त नवीन पाणीमुळा धरण पाणलोट क्षेत्रात राहुरी तालुक्यात २५ तर मुळानगर परिसरात ३५ मि़ मी़ पाऊस झाला़ दगडांच्या खाणीत जोरदार पावसाचे आगमन झाले़ मुळा धरणात सोमवारी दिवसभरात एकूण ३१ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे़ त्यामुळे मुळा धरणातील पाणी पातळीत १५ फुटाने वाढ झाली आहे़ दहा संसार उघड्यावरनगर तालुक्यातील निंबळक येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने निंबळक- इसळक परिसरातील ८ ते १० घरांचे पत्रे उडाले़ त्यामुळे सुमारे दहा कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे़ निंबळक येथील रहिवासी भिमा कदम, रामदास शिंदे, कुंडलिक वायकर, सदाशिव वायकर यांच्या घरावरील पत्रे उडाले़ दयानंद देवकर, मनोज रोकडे, किसन यादव, रामकिसन गेरंगे, आदिनाथ गेरंगे, आदिनाथ गेरंगे यांच्या घरांच्या भिंती कोसळल्याने त्यांची तारांबळ उडाली़आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवाराजिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मागील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची बैठक घेऊन प्रत्येक तालुका मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते़ मात्र अद्याप एकाही तालुक्यात हा कक्ष सुरू करण्यात आला नाही़ त्यामुळे बाधित कुटुंबांना मदत मिळण्यास विलंब होत असून, काही ठिकाणी पंचनामे करण्यासाठी प्रशासन पोहोचले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़