शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: June 6, 2016 23:50 IST

अहमदनगर: शहरासह जिल्ह्याला रविवारी रात्री झालेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला़ घरांच्या पडझडीत तिघे ठार तर, १३ जण जखमी झाले आहेत़ जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे

अहमदनगर: शहरासह जिल्ह्याला रविवारी रात्री झालेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला़ घरांच्या पडझडीत तिघे ठार तर, १३ जण जखमी झाले आहेत़ जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे १३८ घरांची पडझड झाली़विद्युत तारांवर झाडे व फांद्या उन्मळून पडल्याने सोमवारी दुपारपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता़ मुळा धरण परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प होता़ त्यामुळे शहरासह उपनगरांतील जनजीवन विस्कळीत झाले होते़ दरम्यान महावितरणकडून दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आल्याने काही ठिकाणी सायंकाळी विद्युत पुरवठा सुरळीत झाला़शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावली़ घराचा पत्रा लागून श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील भिसान इसाक शेख (वय-४) हा बालक जागीच ठार झाला़ नवनागापूर येथे भिंत कोसळून आदित्य साळुंके (वय १३) याचा मृत्यू झाला़ नगर तालुक्यातील अरणगाव येथील दादा ढमढेरे (वय, ५५) हे मयत झाले़ जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या घरांच्या पडझडीत १३ जण जखमी झाले असून, जखमीमध्ये संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील हेमलता मतू व कैलास भोलाराम, शेवगाव तालुक्यातील दहीफळ येथे राजू भाऊसाहेब पांढरे, कमल राजू पांढरे, प्रथमेश राजू पांढरे, उत्तम सीताराम ठोंबरे, संजय भाऊसाहेब ठोंबरे, संजय भाऊसाहेब ठोंबरे, गोजराबाई ठोंबरे हे अंगावर पत्रे पडून जखमी झाले आहेत़ (प्रतिनिधी)रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा सोमवारी दिवसभर बंद राहिला. २४ तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. मंगळवारपासून शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने मुळानगर, विळद पंपिंग स्टेशन येथील वीज पुरवठा खंडित झाला. रविवारी रात्रभर पाणी उपसा करणारे पंप बंद राहिल्याने शहर पाणी वितरण व्यवस्थेच्या टाक्या भरल्या नाहीत. परिणामी शहरासह उपनगराचा पाणी पुरवठा बंद राहिला.शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा झाला नाही. वीज नसल्याने हौदात थोडेसे असलेल्या पाण्याने अपार्टमेंटच्या टाक्या भरता आल्या नाहीत. काही घरांत तर पिण्याचे पाणीही नाही अन् वापराचेही नाही. विंधन विहीर असली तरी वीज नसल्याने बोअरिंगचे पाणीही मिळेना. विहीर कोसळलीइसळक येथील शेतकरी महादेव खामकर यांनी ८ ते १० लाख रुपये खर्चून विहिरीचे बांधकाम केले होते़ मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विहिरीचे बांधकाम पडले़ विहीर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे़ झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता़‘मुळा’ लाईन उध्दवस्तवादळाचा सर्वाधिक फटका बसला नगर ते मुळा धरण या २७ किलोमीटर वीजवाहिनीला. यादरम्यान एकूण २० ते २५ ठिकाणी विस्कळीतपणा आला होता. काही ठिकाणी तारा तुटल्या, तर बऱ्याच ठिकाणी वीजवाहिनीवर फांद्या पडल्या होत्या. सोमवारी रात्रीपर्यत दुरूस्तीचे काम सुरू होते. ‘मुळा’त नवीन पाणीमुळा धरण पाणलोट क्षेत्रात राहुरी तालुक्यात २५ तर मुळानगर परिसरात ३५ मि़ मी़ पाऊस झाला़ दगडांच्या खाणीत जोरदार पावसाचे आगमन झाले़ मुळा धरणात सोमवारी दिवसभरात एकूण ३१ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे़ त्यामुळे मुळा धरणातील पाणी पातळीत १५ फुटाने वाढ झाली आहे़ दहा संसार उघड्यावरनगर तालुक्यातील निंबळक येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने निंबळक- इसळक परिसरातील ८ ते १० घरांचे पत्रे उडाले़ त्यामुळे सुमारे दहा कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे़ निंबळक येथील रहिवासी भिमा कदम, रामदास शिंदे, कुंडलिक वायकर, सदाशिव वायकर यांच्या घरावरील पत्रे उडाले़ दयानंद देवकर, मनोज रोकडे, किसन यादव, रामकिसन गेरंगे, आदिनाथ गेरंगे, आदिनाथ गेरंगे यांच्या घरांच्या भिंती कोसळल्याने त्यांची तारांबळ उडाली़आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवाराजिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मागील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची बैठक घेऊन प्रत्येक तालुका मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते़ मात्र अद्याप एकाही तालुक्यात हा कक्ष सुरू करण्यात आला नाही़ त्यामुळे बाधित कुटुंबांना मदत मिळण्यास विलंब होत असून, काही ठिकाणी पंचनामे करण्यासाठी प्रशासन पोहोचले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़