शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

‘सरल’च्या माध्यमातून राज्यात शिक्षक पदभरती

By admin | Updated: November 11, 2015 02:39 IST

राज्यभरात शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. पूर्वी ही पदे तोंडी आकडेवारीच्या आधारे भरली जात होती. चुकीची माहिती कळविली जात होती

रूपेश उत्तरवार, यवतमाळराज्यभरात शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. पूर्वी ही पदे तोंडी आकडेवारीच्या आधारे भरली जात होती. चुकीची माहिती कळविली जात होती. पटसंख्या ग्राह्य धरून शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापकांची पदे भरली जातील, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाकरिता ते यवतमाळात आले होते. शिक्षकांच्या पदभरतीकरिता विशेष पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. यामध्ये शिक्षण परिषद वर्षात दोन वेळा शिक्षकांची परीक्षा घेणार असून त्यात उत्तीर्ण झालेले उमेदवार तीन वर्षे पात्र राहतील व मेरिट लिस्टनुसार त्यांची रिक्त जागी नियुक्ती केली जाईल. ही परीक्षा आॅनलाइन असेल. परीक्षा संपताच त्याच ठिकाणी गुण जाहीर होतील. त्यामुळे गैरप्रकाराला वाव राहणार नाही, असे ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर शिक्षणाच्या मुख्य कामासोबत १५० अशैक्षणिक कामांचे ओझे टाकण्यात आले आहे. यामध्ये शालेय पोषण आहाराचाही समावेश आहे. तथापि, ही कामे काढून घेतली जाणार आहेत. यासोबतच गरज असेल तरच प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.