शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

रायगड महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना शिवकालीन इतिहास अनुभवता येणार – विनोद तावडे

By admin | Updated: November 4, 2015 18:39 IST

रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवाचे प्रतिक आहे. महाराष्ट्राचा हा गौरव देशभरासह जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच पर्यटकांना शिवकालीन इतिहास अनुभवता येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि ४ - रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवाचे प्रतिक आहे. महाराष्ट्राचा हा गौरव देशभरासह जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच पर्यटकांना शिवकालीन इतिहास अनुभवता यावा यासाठी येत्या २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान पाच दिवस रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती  सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.
रायगड किल्ल्यावर आयोजित करण्यात येणा-या महोत्सावाच्या अनुषंगाने आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. तावडे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस कोकणचे विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, रागयड जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपटटे यांच्यासह रायगड जिल्हयातील विविध प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले की, रायगड महोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्व आणि रोमहर्षक इतिहास नवीन पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रायगड किल्ला आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्यापाशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असून दोन्ही ठिकाणांसाठीचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे.
शिवछत्रपती महाराज एक शूर योध्दे म्हणून जगप्रसिध्द आहेत. पण शिवाजी महाराज हे एक व्यवस्थापन गुरु होते. शिवाजी महाराजांनी त्या काळात वनसंरक्षण,पर्यावारण, दुष्काळ निवारण या व्यवस्थेमध्येही उत्तम नियोजन केले होते. त्यांचे हे कौशल्य देखाव्याच्या स्वरुपात पुन्हा मांडण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या या व्यवस्थेमध्ये स्थानिक गावक-यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे, असेही तावडे यांनी सागितले.