शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

रायगड महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना शिवकालीन इतिहास अनुभवता येणार – विनोद तावडे

By admin | Updated: November 4, 2015 18:39 IST

रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवाचे प्रतिक आहे. महाराष्ट्राचा हा गौरव देशभरासह जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच पर्यटकांना शिवकालीन इतिहास अनुभवता येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि ४ - रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवाचे प्रतिक आहे. महाराष्ट्राचा हा गौरव देशभरासह जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच पर्यटकांना शिवकालीन इतिहास अनुभवता यावा यासाठी येत्या २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान पाच दिवस रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती  सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.
रायगड किल्ल्यावर आयोजित करण्यात येणा-या महोत्सावाच्या अनुषंगाने आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. तावडे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस कोकणचे विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, रागयड जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपटटे यांच्यासह रायगड जिल्हयातील विविध प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले की, रायगड महोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्व आणि रोमहर्षक इतिहास नवीन पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रायगड किल्ला आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्यापाशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असून दोन्ही ठिकाणांसाठीचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे.
शिवछत्रपती महाराज एक शूर योध्दे म्हणून जगप्रसिध्द आहेत. पण शिवाजी महाराज हे एक व्यवस्थापन गुरु होते. शिवाजी महाराजांनी त्या काळात वनसंरक्षण,पर्यावारण, दुष्काळ निवारण या व्यवस्थेमध्येही उत्तम नियोजन केले होते. त्यांचे हे कौशल्य देखाव्याच्या स्वरुपात पुन्हा मांडण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या या व्यवस्थेमध्ये स्थानिक गावक-यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे, असेही तावडे यांनी सागितले.