शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

मुंबईतील ३ तरूण 'इसिस'मध्ये सामील?

By admin | Updated: December 21, 2015 11:30 IST

मुंबईतील मालवणी येथून गेल्या दोन महिन्यांपासून गायब असलेले तीन तरूण कुख्यात दहशतवादी संघटना 'इसिस'मध्ये सामील झाल्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - पुण्यातील अवघी १६ वर्षांची तरूण इसिसमध्ये जाण्याच्या तयारीत असताना एटीएसने तिला रोखल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील तीन तरूण इसिसमध्ये सामील होण्यासाठी देश सोडून गेल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मालवणी येथून गेल्या दोन महिन्यांपासून गायब असलेले तीन तरूण कुख्यात दहशतवादी संघटना 'इसिस'मध्ये सामील झाल्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे. अयाज सुलतान (२३), मोहसीन शेख (२६) आणि वाजिद शेख (२५) अशी त्यांची नावे असून एकाच परिसरात राहणारे हे तीन मित्र तिघेही ब-याच काळापासून बेपत्ता असून ते इसिसच्या जाळ्यात अडकल्याची शक्यता एटीएसच्या वरिष्ठ अधिका-याने व्यक्त केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
हे तिघेही ब-याच काळापासून देश सोडून जाण्याच्या विचारात होते आणि त्यासाठी पैसेही साठवत होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळत आहे. कुवेतमधील कंपनीने नोकरीची ऑफर दिल्याचे सांगत अयाज सुलतान (२३) हा तरूण ३० ऑक्टोबरला पुण्याला रवाना झाला. त्यानंतर मोहसीन शेख व वाजिद शेख हे दोघेही १६ डिसेंबर रोजी घरातून गायब झाले, मोहसीनने मित्राच्या लग्नाचे कारण दिले तर वाजिद आधारकार्ड दुरूस्तीच्या बहाण्याने बाहेर पडला आणि ते दोघेही अद्यापही घरी परतलेले नाहीत. एटीएसने त्या तिघांचे फोटो जारी केले आहेत.
महिनाभर उलटून गेल्यावरही अयाज परत न आल्याने आणि त्याचे दोन मित्रही डिसेंबरमध्ये गायब झाल्याने त्याच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुली. एरवी अतिशय प्रेमळपणे, मनमिळाऊपणे, घराची व भावंडांच्या शिक्षणाची जबाबादारी उचलणारा अयाज गेल्या काही महिन्यांपासून बदलला होता. त्याचे कामात बिलकूल लक्ष नव्हते, तो सतत फोन किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेटनवर काम करत असायचा, असे त्याच्या आईने सांगितले. मात्र काही दिवसांनी तो परत पूर्वीसारखा वागू लागला, सगळ्यांची काळजी घेऊ लागला. एक नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी आपलं घर गहाण ठेऊन पैसे उभे केल्याचे त्याने आईला सांगितले, मात्र ३० ऑक्टोबर रोजी पुण्यात नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावल्याचे सांगत तो कपड्यांची बॅग व पासपोर्ट घेऊन निघून गेला आणि परत आलाच नाही, अशी माहिती त्याच्या आईने दिले. काही दिवसांनी त्याचे मित्र मोहसीन आणि वाजिद हेही गायब झाल्याचे अयाजच्या आईला समजले आणि त्यांनी मालवणी पोलिसांत धाव घेऊन ही माहिती दिली. 
आपली मुले इसिसमध्ये सामील होण्यासाठी देश सोडून  निघून गेल्याचा संशय त्यांनी पोलिसांसमोर व्यक्त करताच, पोलिसांनी या घटनेची माहिती एटीएसला दिली. एटीएस एधिका-यांनी या तिघांच्याही मित्रांची कसून चौकशी केली तसेच वाजिदचा फोन चेक केला असात तो इसिबद्दलच्या माहितीने भरलेला होता. या तिघांपैकी अयाज हा आधीच देशबाहेर पडल्याचा अंदाज अधिका-यांनी व्यक्त केला आहे, मात्र वाजिद व मोहसीनबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 
यापूर्वी मे २०१४ मध्ये कल्याणमधील चार युवक इसिसमध्ये सामील होण्यासाठी सीरियाला रवाना झाले होते, त्यातील एक तरूण अरीब माजिदला देशात परत आला असून सध्या तो एनआयएच्या कोठडीत आहे, मात्र इतर तीन तरूणांचे काय झाले याबद्दल काहीही माहिती मिळू शकलेली नाही.