शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत शिक्षकांचे प्रश्न मार्गी

By admin | Updated: February 7, 2016 01:23 IST

ग्रामीण महाराष्ट्राचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे. याच शिक्षकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे भवितव्य घडवायचे आहे, याची पुरेपूर जाण आघाडी सरकारला आहे. म्हणूनच केवळ तीन

नवी मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे. याच शिक्षकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे भवितव्य घडवायचे आहे, याची पुरेपूर जाण आघाडी सरकारला आहे. म्हणूनच केवळ तीन वर्षांचा वेळ द्या, तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. ऐरोलीतील पटनी मैदानावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन व राज्यस्तरीय शिक्षण परिषद शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते. या परिषदेला राज्यभरातून हजारो शिक्षक उपस्थित होते. आगामी काळात शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल घडविण्याची गरज आहे. मातृभाषेतून शिक्षण घ्यावे, त्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी या कामात शिक्षकांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे, असेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी नक्कीच काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी आणखी काही काळ धीर धरावा, त्यांचे सर्व प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शिक्षकांसाठी पेन्शन योजना, आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न, संगणक प्रशिक्षणासाठी एक वर्षाची मुदतवाढ तसेच नवीन शिक्षक भरतीला मान्यता, शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य विमा आदी प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन तावडे यांनी यावेळी दिले. शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान राहिले आहे. नवीन पिढी घडविण्याचे उत्तरदायित्व या घटकांवर आहे. त्यामुळे शिक्षकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याचे धोरण चुकीचे आहे. त्याचा थेट फटका शिक्षकांना बसतोय. त्यामुळे त्यादृष्टीनेसुध्दा सुधारित धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तीन वर्षांची मुदत मागितली आहे. ते नवीन आहेत. त्यामुळे त्यांना प्रश्न समजून घ्यायला वेळ दिला पाहिजे, असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला. शिक्षकांचे प्रश्न तसे छोटे आहेत. परंतु राज्याच्या अर्थकारणावर परिणाम करणारे आहेत. त्यामुळे एकटे शिक्षणमंत्री याचा निर्णय घेऊ शकत नाहीत याचे भान ठेवायला हवे, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.याप्रसंगी माजी मंत्री जयंत पाटील, गणेश नाईक, संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, एस. डी. पाटील तसेच खासदार के. पी. नाना पाटील आदींची भाषणे झाली. (प्रतिनिधी)शिक्षकांच्या सुटीचा बाऊ करू नयेराज्यभरातील शिक्षकांना अधिवेशनाला उपस्थित राहता यावे, यासाठी त्यांना सहा दिवसांची भरपगारी सुटी देण्यात आली आहे. परंतु प्रसारमाध्यमांतून त्यावर टीका होत आहे. परंतु शिक्षकांच्या सुटीचा बाऊ करायची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना लगावला. तसेच सध्याचे सरकार नवीन आहे. त्यामुळे त्यांचे हे पहिलेच बाळांतपण असल्याने त्यांना तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ द्या, अशी कोपरखळीही पवार यांनी मारली.शाळा दत्तक घेणारशिक्षक संघाच्या वतीने आगामी काळात प्रत्येक जिल्हा, महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात एक शाळा दत्तक घेतली जाणार आहे. आमदार व विधान परिषद सदस्यांनीही आपापल्या जिल्ह्यातील एक शाळा दत्तक घ्यावी, जेणेकरून मराठी शाळा टिकून राहतील, अशी सूचना संघाचे नेते संभाजीराव यांनी यावेळी केली.