शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

तीन वर्षांत शिक्षकांचे प्रश्न मार्गी

By admin | Updated: February 7, 2016 01:23 IST

ग्रामीण महाराष्ट्राचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे. याच शिक्षकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे भवितव्य घडवायचे आहे, याची पुरेपूर जाण आघाडी सरकारला आहे. म्हणूनच केवळ तीन

नवी मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे. याच शिक्षकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे भवितव्य घडवायचे आहे, याची पुरेपूर जाण आघाडी सरकारला आहे. म्हणूनच केवळ तीन वर्षांचा वेळ द्या, तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. ऐरोलीतील पटनी मैदानावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन व राज्यस्तरीय शिक्षण परिषद शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते. या परिषदेला राज्यभरातून हजारो शिक्षक उपस्थित होते. आगामी काळात शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल घडविण्याची गरज आहे. मातृभाषेतून शिक्षण घ्यावे, त्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी या कामात शिक्षकांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे, असेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी नक्कीच काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी आणखी काही काळ धीर धरावा, त्यांचे सर्व प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शिक्षकांसाठी पेन्शन योजना, आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न, संगणक प्रशिक्षणासाठी एक वर्षाची मुदतवाढ तसेच नवीन शिक्षक भरतीला मान्यता, शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य विमा आदी प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन तावडे यांनी यावेळी दिले. शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान राहिले आहे. नवीन पिढी घडविण्याचे उत्तरदायित्व या घटकांवर आहे. त्यामुळे शिक्षकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याचे धोरण चुकीचे आहे. त्याचा थेट फटका शिक्षकांना बसतोय. त्यामुळे त्यादृष्टीनेसुध्दा सुधारित धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तीन वर्षांची मुदत मागितली आहे. ते नवीन आहेत. त्यामुळे त्यांना प्रश्न समजून घ्यायला वेळ दिला पाहिजे, असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला. शिक्षकांचे प्रश्न तसे छोटे आहेत. परंतु राज्याच्या अर्थकारणावर परिणाम करणारे आहेत. त्यामुळे एकटे शिक्षणमंत्री याचा निर्णय घेऊ शकत नाहीत याचे भान ठेवायला हवे, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.याप्रसंगी माजी मंत्री जयंत पाटील, गणेश नाईक, संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, एस. डी. पाटील तसेच खासदार के. पी. नाना पाटील आदींची भाषणे झाली. (प्रतिनिधी)शिक्षकांच्या सुटीचा बाऊ करू नयेराज्यभरातील शिक्षकांना अधिवेशनाला उपस्थित राहता यावे, यासाठी त्यांना सहा दिवसांची भरपगारी सुटी देण्यात आली आहे. परंतु प्रसारमाध्यमांतून त्यावर टीका होत आहे. परंतु शिक्षकांच्या सुटीचा बाऊ करायची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना लगावला. तसेच सध्याचे सरकार नवीन आहे. त्यामुळे त्यांचे हे पहिलेच बाळांतपण असल्याने त्यांना तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ द्या, अशी कोपरखळीही पवार यांनी मारली.शाळा दत्तक घेणारशिक्षक संघाच्या वतीने आगामी काळात प्रत्येक जिल्हा, महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात एक शाळा दत्तक घेतली जाणार आहे. आमदार व विधान परिषद सदस्यांनीही आपापल्या जिल्ह्यातील एक शाळा दत्तक घ्यावी, जेणेकरून मराठी शाळा टिकून राहतील, अशी सूचना संघाचे नेते संभाजीराव यांनी यावेळी केली.