शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अंकित क न्स्ट्रक्शनवर तीन वर्षेच बंदी का ?

By admin | Updated: July 31, 2014 01:01 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळाप्रकरणात राज्य शासनाने व्यावसायिक किशोर कन्हेरे यांच्या अंकित कंस्ट्रक्शन कंपनीवर थातूरमातूर कारवाई केली आहे. या कंपनीवर केवळ तीन वर्षांसाठी

हायकोर्ट संतप्त : आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळाप्रकरणात राज्य शासनाने व्यावसायिक किशोर कन्हेरे यांच्या अंकित कंस्ट्रक्शन कंपनीवर थातूरमातूर कारवाई केली आहे. या कंपनीवर केवळ तीन वर्षांसाठी बंदी लादण्यात आली आहे. ही बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला खटकली आहे. संबंधित निर्णय घेताना पडताळण्यात आलेली कागदपत्रे येत्या आठवडाभरात पटलावर सादर करण्याचे निर्देश त्यांनी शासनाला दिले आहेत.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष आज, बुधवारी प्रकरणावर सुनावणी झाली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (कार्य) श्यामलकुमार मुखर्जी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. प्रतिज्ञापत्रानुसार, राज्य शासनाने २८ जुलै रोजीच्या आदेशान्वये अंकित कंस्ट्रक्शन कंपनीला २८ जुलै २०१४ पासून पुढील तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. घोटाळ्याशी संबंध नसलेल्या अन्य काही कंपन्यांवर कायमस्वरुपी बंदी लादण्यात आली असताना अंकित कंस्ट्रक्शनवर दाखविण्यात आलेल्या मेहरबानीवर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. परिणामी न्यायालयाने वरील निर्देश दिलेत. यापूर्वी शासनाने २८ एप्रिल रोजी न्यायालयाच्या आदेशानंतर अंकित कंस्ट्रक्शन कंपनीला एक वर्षासाठी वर्ग-१-अ दर्जावरून वर्ग-१-ब मध्ये अवनत केले होते. तसेच, कंपनीच्या इतर चालू कामाच्या देयकातून नुकसानभरपाई वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव वि.दि. सरदेशमुख यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली होती. न्यायालयाने या कारवाईवर असमाधान व्यक्त करून शासनाला कडक शब्दांत फटकारले होते. राजकीय दबावामुळे अंकित कंस्ट्रक्शनला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. परिणामी शासनाने हा निर्णय परत घेऊन नवा आदेश काढण्यासाठी परवानगी मागितली होती. न्यायालयाने शासनाची विनंती मान्य करून ३० जुलैपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाने अंकित कंस्ट्रक्शनवर तीन वर्षांसाठी बंदी लादण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)