शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोदाम आग प्रकरणी तिघांना कोठडी

By admin | Updated: December 29, 2014 05:22 IST

तालुक्यातील रहानाळ गावात मढवी कम्पाउंड येथे शनिवारी पहाटे भंगार गोदामाच्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला

भिवंडी : तालुक्यातील रहानाळ गावात मढवी कम्पाउंड येथे शनिवारी पहाटे भंगार गोदामाच्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार असलेल्या तिघांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जागेच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहेत.रहानाळ येथील मढवी कम्पाउंडचे मालक राजन मढवी यांनी भंगार साठवणूक करण्यासाठी मनवर अली जंगबहादूर खान, इश्तियाक अहमद उस्मान अली सलीम अन्सारी व शौकत अली उस्मान अन्सारी या तिघांना दोन हजार रुपये भाड्याने जागा दिली होती. त्यामध्ये लाकडाच्या फ्रेम्स, प्लास्टिक व इतर वस्तू साठविलेल्या होत्या. रात्री २.३० वाजता लागलेल्या आगीत तीन गोदामांसह भंगार भरलेले तीन टेम्पो जळून खाक झाले. ही आग शेकोटी, शॉर्टसर्किट अथवा अग्निजन्य पदार्थामुळे भडकली असावी, असा कयास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. काल फोरेन्सिक लॅबचे कर्मचारी घटनास्थळाला भेट देऊन आगीची कारणे शोधण्यासाठी काही वस्तू तपासासाठी घेऊन गेले आहेत. या गोदामांना ग्रामपंचायतीची परवानगी नव्हती तसेच वापरण्यात येणारे वीज कनेक्शन अवैध होते, असे परिसरातील गोदामातील सूत्रांनी सांगितले. या गोदामांत नवीन उत्पादनाच्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी लाकडाच्या फ्रेम बनविण्यात येत होत्या. ते लाकूड हलक्या दर्जाचे असल्याने साठविलेल्या लाकडाने व त्या शेजारी साठविलेल्या प्लास्टिक भंगार वस्तूंनी पेट घेतला. अशा ज्वलनशील वस्तूंचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था या गोदामात अथवा परिसरात केली नसल्याने आठ कामगारांचा नाहक बळी गेला. ३२लाखांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. नारपोली पोलीस ठाण्यात या आग प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तीन गोदामचालकांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. (प्रतिनिधी)