शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

गोदाम आग प्रकरणी तिघांना कोठडी

By admin | Updated: December 29, 2014 05:22 IST

तालुक्यातील रहानाळ गावात मढवी कम्पाउंड येथे शनिवारी पहाटे भंगार गोदामाच्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला

भिवंडी : तालुक्यातील रहानाळ गावात मढवी कम्पाउंड येथे शनिवारी पहाटे भंगार गोदामाच्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार असलेल्या तिघांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जागेच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहेत.रहानाळ येथील मढवी कम्पाउंडचे मालक राजन मढवी यांनी भंगार साठवणूक करण्यासाठी मनवर अली जंगबहादूर खान, इश्तियाक अहमद उस्मान अली सलीम अन्सारी व शौकत अली उस्मान अन्सारी या तिघांना दोन हजार रुपये भाड्याने जागा दिली होती. त्यामध्ये लाकडाच्या फ्रेम्स, प्लास्टिक व इतर वस्तू साठविलेल्या होत्या. रात्री २.३० वाजता लागलेल्या आगीत तीन गोदामांसह भंगार भरलेले तीन टेम्पो जळून खाक झाले. ही आग शेकोटी, शॉर्टसर्किट अथवा अग्निजन्य पदार्थामुळे भडकली असावी, असा कयास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. काल फोरेन्सिक लॅबचे कर्मचारी घटनास्थळाला भेट देऊन आगीची कारणे शोधण्यासाठी काही वस्तू तपासासाठी घेऊन गेले आहेत. या गोदामांना ग्रामपंचायतीची परवानगी नव्हती तसेच वापरण्यात येणारे वीज कनेक्शन अवैध होते, असे परिसरातील गोदामातील सूत्रांनी सांगितले. या गोदामांत नवीन उत्पादनाच्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी लाकडाच्या फ्रेम बनविण्यात येत होत्या. ते लाकूड हलक्या दर्जाचे असल्याने साठविलेल्या लाकडाने व त्या शेजारी साठविलेल्या प्लास्टिक भंगार वस्तूंनी पेट घेतला. अशा ज्वलनशील वस्तूंचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था या गोदामात अथवा परिसरात केली नसल्याने आठ कामगारांचा नाहक बळी गेला. ३२लाखांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. नारपोली पोलीस ठाण्यात या आग प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तीन गोदामचालकांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. (प्रतिनिधी)