शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
4
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
6
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
7
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
8
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
9
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
10
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
11
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
12
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
13
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
14
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले
15
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
16
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
17
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
18
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
19
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
20
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...

कीटकजन्य आजाराने घेतले तीन बळी?

By admin | Updated: September 22, 2016 01:48 IST

एखाद्या रुग्णाचा झालेला मृत्यू हा नेमक्या कोणत्या कीटकजन्य आजाराने झाला आहे

पुणे : एखाद्या रुग्णाचा झालेला मृत्यू हा नेमक्या कोणत्या कीटकजन्य आजाराने झाला आहे, याची तपासणी करण्यासाठी आणखी तीन रुग्णांचे अहवाल कीटकजन्य आजार मृत्यू संशोधन समितीकडे पाठवण्यात आले आहेत. यांपैकी २ पुणे शहरातील असून, १ अहमदनगर जिल्ह्यातील आहे.काही महिन्यांपासून शहरासह संपूर्ण राज्यात डेंगी व चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच पुन्हा पाऊस सुरू झाल्याने ठिकठिकाणी पाण्याची डबकीही साचल्याने डेंगीच्या डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात राज्य आरोग्य विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांना अपयश आले आहे. साथीच्या आजारांमुळे ३ रुग्णांचा आॅगस्ट महिन्यात मृत्यू झाला होता. यामध्ये एक ८० वर्षीय ज्येष्ठ महिला, ४४ वर्षीय पुरुष आणि १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या रुग्णांचा मृत्यू नेमका कोणत्या कीटकजन्य आजाराने झाला आहे, याची तपासणी करण्यासाठी संबंधित रुग्णांचे अहवाल कीटकजन्य आजार मृत्यू संशोधन समितीकडे पाठविण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)>या अहवालाचा निकाल आल्यावर या व्यक्तींच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. शहरातील एका रुग्णांचा मृत्यू डेंगीने झाला असल्याचा अहवाल कीटकजन्य आजार मृत्यू संशोधन समितीने नुकताच दिला होता. या पार्श्वभूमीवर, या अहवालाचे निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत. >अहवाल संशोधन विभागाकडेही राज्य स्तरावर काम करणारी वैद्यकीय तज्ज्ञांची समिती आहे. कीटकजन्य आजारावर उपचार घेत असलेल्या एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास तो नेमक्या कोणत्या कीटकजन्य आजाराने झाला आहे, हे निश्चित करण्याचा अधिकार ‘कीटकजन्य आजार मृत्यू संशोधन समिती’ला असतो. या समितीमध्ये बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ, सहायक संचालक आरोग्य सेवा, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक संचालक हिवताप व वैद्यकीय विभाग, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय विभाग अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ, जिल्हा शल्यचिकित्सक, राष्ट्रीय विषाणू संस्थेचे प्रतिनिधी अशा वेगवेगळ्या तज्ज्ञ व डॉक्टरांचा समावेश असतो. या समितीकडून संबंधित रुग्ण आजारी पडल्यापासून ते त्याचा मृत्यू होईपर्यंत त्यावर उपचार करणारे विविध डॉक्टर व वैद्यकीय तज्ज्ञ या सर्वांकडून त्या रुग्णांची संपूर्ण सखोल माहिती मागवली जाते. ती कागदपत्रे स्थानिक जिल्हा आरोग्य अधिकारी समितीकडे सादर केल्यानंतर संबंधित रुग्णाचे केलेले रोगनिदान, वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल आणि त्यावरील उपचारांची सर्व कागदपत्रे या समितीतर्फे तपासली जातात. त्यातून मृत्यूचे निश्चित कारण दिले जाते. मृत्यूच्या कारणाची माहिती देण्याचा अधिकार केवळ समितीला असतो.