शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

वानखेडेवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ?

By admin | Updated: October 28, 2014 01:48 IST

नव्या सरकारचा वानखेडे स्टेडियमवर होऊ घातलेल्या शपथविधी सोहळा सुरक्षितपणो पार पडावा, यासाठी मुंबई पोलीस रणनीती आखत आहेत.

सूत्रंची माहिती : शपथविधी सोहळ्यासाठी पोलिसांची तयारी सुरू
मुंबई : नव्या सरकारचा वानखेडे स्टेडियमवर होऊ घातलेल्या शपथविधी सोहळा सुरक्षितपणो पार पडावा, यासाठी मुंबई पोलीस रणनीती आखत आहेत. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्टेडियमभोवती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली जाईल.
31 ऑक्टोबर रोजी हा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या सोहळय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून विविध क्षेत्रंतील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. उपस्थितांपैकी बहुतांश अतिमहत्त्वाच्या, महत्त्वाच्या व्यक्ती असतील. मुंबई पोलिसांच्या अंदाजानुसार या सोहळय़ाला 3क् ते 35 हजार पाहुणो येऊ शकतील. हे सर्व लक्षात घेऊन मुंबई पोलीस या शपथविधी सोहळय़ाच्या सुरक्षेसाठी रणनीती आखत आहेत. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सोहळय़ासाठी कोणाकोणाला आमंत्रण आहे त्याची यादी शासनाच्या सर्वसाधारण प्रशासकीय विभागाकडून पोलिसांना मिळेल. त्यात महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा सहभाग असेल. त्या यादीनुसार आमंत्रितांनाच स्टेडियममध्ये सोडण्यात यावे, याकडे वरिष्ठ अधिका:यांचा कल आहे. 
  स्टेडियममध्ये पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमे:यांचे चित्रण नियंत्रण कक्षात असून, त्यावर बंदोबस्तावरील जबाबदार अधिका:यांची करडी नजर असेल. स्टेडियमभोवतीचा परीघ निर्मनुष्य करून तेथे आमंत्रितांची मेटल डिटेक्टरमधून पहिली झाडाझडती होईल. स्टेडियममध्ये प्रत्येक ठिकाणी सशस्त्र कमांडो तैनात असतील. सोहळ्याआधी  संपूर्ण स्टेडियमची अॅन्टी सॅबोटॅज पथक व बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून चाचपणी केली जाईल. तसेच सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीमही घेतली जाईल, असे समजते.