शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

वैनगंगेत बुडून तरूणासह तिघांचा मृत्यू

By admin | Updated: June 26, 2016 17:31 IST

आठ दिवसांपूर्वी वाशिम येथून मूल येथे मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या तरूणासह दोन बालकांचा चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत 
चामोर्शी, दि. २६ -  आठ दिवसांपूर्वी वाशिम येथून मूल येथे मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या तरूणासह दोन बालकांचा चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १.३० वाजता घडली.
 
वाशिम येथून आठ ते दहा दिवसांपूर्वी मूल येथील मामा प्रशांत अप्पलवार यांच्याकडे त्यांच्या बहिणीचे मुले अंकूर प्रशांत पाठक (२२) रा. वाशिम, वैभव प्रशांत पाठक (१६) रा. वाशिम हे आले होते. उन्हाळ्याच्या सुट्या संपल्याने गावाकडे जाण्यापूर्वी मार्र्कंडा येथे आपल्या कुटुंबासह रविवारी ते देवदर्शनासाठी आले. 
 
यावेळी अंकूर पाठक, वैभव प्रशांत पाठक व गणेश प्रशांत अप्पलवार (१३) हे तिघे व तीन मुली नावेवर बसून आंघोळीसाठी दुस-या बाजुला गेले. ज्या ठिकाणी रेती कमी पडलेली आहे. ज्या ठिकाणापासून कमी असते. आंघोळ करीत असताना कमी पाणी आहे, असे समजून गणेश अप्पलवार हा १३ वर्षाचा मुलगा खोल पाण्यात जाऊ लागला व तो डुबायला लागला. 
 
त्याला वाचविण्यासाठी वैभव व अंकूर हे दोघेही खोल पाण्यात गेले. त्यांना पोहता येत नसल्याने या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान या तिघांचे मृतदेह नावाडी नारायण राऊत, गणपती राऊत, परशुराम भोयर, पत्रू गेडाम, अंबादास शेरकी यांनी पाण्यातून बाहेर काढले. घटनेची माहिती कळताच पोलीस निरिक्षक किरण अवचार, पोलीस उपनिरिक्षक धर्मसिंग सुंदरडे, प्रशांत कंडारे, पोलीस हवालदार अशोक कुमरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. 
 
तर प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतक कुटुंबाचे सांत्वन केले. जय मॉ दुर्गा मंडळाच्या रूग्णवाहिकेने अतुल बन्सोड याने तिन्ही मृतदेह ग्रामीण रूग्णालय चामोर्शी येथे आणले. या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर ते नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. 
 
एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतकाच्या नातेवाईकांची आमदार डॉ. देवराव होळी, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, मनोज पालारपवार, आनंद गण्यारपवार, जयराम चलाख, ज्ञानेश्वर कुनघाडकर, विनोद पेशेट्टीवार यांनी ग्रामीण रूग्णालय चामोर्शी येथे भेट घेऊन सांत्वन केले.