शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तिघांनाही फाशीच

By admin | Updated: May 10, 2017 03:03 IST

संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या संगणक अभियंता नयना पुजारी अपहरण, बलात्कार व खून प्रकरणातील तीनही आरोपींना विशेष न्यायाधीश

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या संगणक अभियंता नयना पुजारी अपहरण, बलात्कार व खून प्रकरणातील तीनही आरोपींना विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. हा भयानक प्रकार ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ असल्याने फाशीची शिक्षा दिल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नयना अभिजित पुजारी (वय २८) या खराडी येथील सेनिक्रॉन प्रा.लि. या सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामास होत्या. त्या ७ आॅक्टोबर २००९ रोजी रात्री आठच्या सुमारास कात्रज येथे घरी जाण्यासाठी खराडी येथील रिलायन्स मार्टजवळील लक्ष्मी हॉस्पिटलजवळच्या बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्या वेळी आरोपी इंडिका कारमधून त्या ठिकाणी आले. त्यांनी नयना यांना हडपसर येथे सोडण्यासाठी प्रवासी म्हणून कारमध्ये घेतले. त्यानंतर नयना यांना वाघोली, तुळापूर, जरेवाडी (ता. खेड) येथे नेऊन सामूहिक बलात्कार करत खून केला. या आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १६ आॅक्टोबर २००९ रोजी अटक केली.सुनावणीदरम्यान राजेश चौधरी हा आरोपी माफीचा साक्षीदार झाला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी एकूण ३७ साक्षीदार तपासले. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. बी.ए. आलुर यांनी १३ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांकडून न्यायालयात अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर आणि न्यायालयास असलेल्या शंकांचेही दोन्ही पक्षांनी निरसन केले. त्यानंतर मंगळवारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.या गुन्ह्यातील मास्टर माइंड समजला जाणारा योगेश राऊत हा ससून रुग्णालयात दाखल असताना नैसर्गिक विधीच्या बहाण्याने १७ सप्टेंबर २०११ रोजी फरार झाला होता. त्याला तब्बल पावणेदोन वर्षांनंतर पोलिसांच्या विशेष पथकाने पुन्हा पकडले होते. योगेश अशोक राऊत (वय ३२, रा. गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (३१, रा. सोळू, ता. खेड), विश्वास हिंदूराव कदम (३४, रा. दिघीगाव. मूळ भुरकवडी, ता. खटाव, जि. सातारा) अशी फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. राजेश पांडूरंग चौधरी (वय ३१, रा. गोळेगाव, ता. खेड) असे मुक्तता केलेल्या माफीच्या साक्षीदाराचे नाव आहे. अपहरण, जबरी चोरी, सामूहिक बलात्कार, खून, मृताच्या शरीरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा गुन्ह्यांखाली तिघांना दोषी ठरवण्यात आले आहे.