शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

तीन नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार

By admin | Updated: April 16, 2016 02:36 IST

वैद्यकीय क्षेत्रात उत्तम दर्जाचे डॉक्टर तयार व्हावेत आणि सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या मुलांनाही चांगले वैद्यकीय शिक्षण मिळावे, यासाठी खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वातून

मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात उत्तम दर्जाचे डॉक्टर तयार व्हावेत आणि सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या मुलांनाही चांगले वैद्यकीय शिक्षण मिळावे, यासाठी खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वातून वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि आॅईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपन्यांबरोबर खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यात सरकारी रुग्णालयांप्रमाणे शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.परेल येथील वाडिया रुग्णालयाने ९० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात तावडे बोलत होते. राज्यपाल चे. विद्यासागर राव हेदेखील या वेळी उपस्थिती होते. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत सरकारी महाविद्यालयांप्रमाणे शुल्क आकारल्यास सामान्य घरातील मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल. सामान्य कुटुंबातून डॉक्टर निर्माण होण्याची गरज आहे. मुंबईला काही तरी द्यावे, या भावनेतून या महाविद्यालयांची संकल्पना समोर आल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक जागा निर्माण व्हाव्यात, चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी टाटा, अंबानी यांच्यासारख्या मोठ्या व्यावसायिकांनी येऊन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ही महाविद्यालये सरकारी नियमानुसार चालावीत. तसेच शुल्क पद्धती सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणे असावी, अशी अपेक्षाही तावडे यांनी व्यक्त केली.वाडिया कुटुंबीयांनी गरिबांच्या सेवेसाठी रुग्णालय बांधले होते. आणि त्याचा विस्तारही झाला आहे. वाडिया कुटुंबीयांनी ज्या पद्धतीने रुग्णांची सेवा केली, तशीच पुढेही करणार असल्याचे नस्ली वाडिया यांनी म्हटले. (प्रतिनिधी)कुठे उभारणार वैद्यकीय महाविद्यालये?या कंपन्या वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यासाठी उत्सुक आहेत. बीपीटीच्या वडाळा येथील रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार करत आहे. तर ‘ओएनजीसी’ने वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली असून जेएनपीटी रायगड किंवा उरण या भागात ते वैद्यकीय महाविद्यालय उभारणार आहेत. ‘आवडीच्या रुग्णालयात प्रसूती अधिकार मिळावा’महिलेच्या आयुष्यात गर्भधारणा आणि प्रसूती या दोन अत्यंत महत्त्वाच्या घटना असतात. प्रत्येक महिलेला तिच्या आवडीच्या रुग्णालयात प्रसूतीचा अधिकार मिळाला पाहिजे. यासंदर्भात सरकारने कायदा करावा, तो कायदा मी तत्काळ संमत करेन. असा अधिकार देणारा भारत हा जगातील पहिला देश असेल, अशा शब्दांत राज्यपाल विद्यासागर राव यांनी इच्छा बोलून दाखविली. महिलाकेंद्री आरोग्य व्यवस्थेची अत्यंत आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.