शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

डीसीआरमध्ये बदलासाठी तीन महिन्यात नियमावली

By admin | Updated: December 23, 2015 01:23 IST

राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील (बृहन्मुंबई महापालिका वगळून) सर्व महापालिका व नगरपालिका यांच्या महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम

नागपूर : राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील (बृहन्मुंबई महापालिका वगळून) सर्व महापालिका व नगरपालिका यांच्या महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये मंजूर असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या समन्वयाखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचा अहवाल नुकताच शासनाला प्राप्त झाला आहे. या अहवालतील शिफारशींनुसार डीसीआरमध्ये बदल करण्यासाठी तीन महिन्यात नियमावली तयार केली जाईल, असे आश्वासन नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली.प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करीत मिरा- भार्इंदर (ठाणे) शहरात १९८५ पूर्वी ग्राम पंचायत काळापासून अनधिकृतपणे बांधकामे झाली असून धोकादायक इमारती पडून लोकांचा मृत्यू होत असल्याचे सांगितले. डीसीआरमध्ये बदल करण्यासाठी नियमावली कधी तयार करणार अशी विचारणा त्यांनी केली. यावर राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले की, मिरा- भार्इंदर महापालिकेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये संरचनादृष्ट्या असुरक्षित इमारतीच्या पुनर्विकासाबाबतची तरतूद विनियम ३२ (७) आहे. महापालिका आयुक्तांनी २१ डिसेंबर २०१० रोजी पत्र पाठवून १ जून १९८५ पासून भाडेकरू असलेल्या व तत्पूर्वीच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी प्रत्यक्षात १जून १९८५ पूर्वी वापरलेले चटई क्षेत्र अधिक १ यापेक्षा जास्त अनुज्ञेय नाही. कमाल मर्यादा ३ चटई क्षेत्र जे कमीत कमी असेल ते अनुज्ञेय करण्याचा व त्यानंतर पुन्हा २० सप्टेंबर २०१२ च्या पत्रान्वये अशा इमारतींच्या पुनर्विकासासाठी १ जून १९८५ पूर्वीच्या ऐवजी १ जून १९९५ पूर्वीच्या इमारती व जुन्या इमारतीच्या भाडेकरूंच्या अखत्यारितील चटई क्षेत्र अधिक १ या प्रमाणे फेरबदल करावे, असे दोन प्रस्ताव महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७(१) ची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून शासनास मंजुरीसाठी सादर केले होते. संंबंधित प्रस्ताव नियोजनाच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे तसेच इतर महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदी विचारात घेऊन शासनाने सदरचे कलम ३७ चे प्रस्ताव १७ जुलै २०१५ च्या अधिसूचनेनुसार नामंजूर केले आहेत, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)