शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पुण्याच्या तीन अपहृत विद्यार्थ्यांची सुटका

By admin | Updated: January 4, 2016 03:23 IST

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुण्याच्या तीन विद्यार्थ्यांचे रविवारी सकाळी अपहरण केले होते.

रायपूर/गडचिरोली : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुण्याच्या तीन विद्यार्थ्यांचे रविवारी सकाळी अपहरण केले होते. मात्र नंतर त्यांनी त्यांना मुक्त केले. हे युवक शांततेचा संदेश देण्यासाठी सायकलने मोहिमेवर निघाले होते आणि पुण्याहून गडचिरोलीमार्गे छत्तीसगडला जात असताना काही दिवसांपूर्वी त्यांचे अपहरण झाले होते.आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे (रा. कराड ता. सातारा) अशी त्यांची नावे असून, जवळच्याच बिजापूर जिल्ह्यातील बसागुडा भागात त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जगरगुंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चिंगरजवळील तिम्मपुरम् गावात माओवादी कमांडर पापा राव याच्या ताब्यात देण्यात आले. अपहरणाचे वृत्त कळताच पोलिसांनी दक्षिण बस्तरमधील सर्व नक्षलविरोधी मोहिमा तातडीने थांबविल्या. त्यानंतर पोलिसांनी या तीनही तरुणांचा ठावठिकाणा शोधला आणि त्यांच्या सुटकेसाठी विविध माध्यमांद्वारे अपहरणकर्त्यांसोबत बातचीत केली, असे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक एस.आर.पी. कल्लुरी यांनी सांगितले. परंतु नक्षल्यांसोबत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही. २३ डिसेंबर रोजी हे तीनही तरुण नागपूर येथून भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे पोहोचले. २५ ते २८ डिसेंबरदरम्यान बेद्रे, कारकेली, बैरमगड असा प्रवास करून २९ डिसेंबर रोजी ते छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथे पोहोचले. याच ठिकाणाहून नक्षल्यांनी तिघांचेही अपहरण केले. अज्ञातस्थळी नेऊन दोन ते तीन दिवस त्यांची कसून चौकशी केली. यादरम्यान एका नक्षल समर्थकामार्फत नागपूर येथे संपर्क झाल्याने ही घटना उघडकीस आली. (वृत्तसंस्था/प्रतिनिधी)धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष : सुटका झाल्यानंतर या तरुणांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या चिंतलनार कॅम्पवर सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना हवाईमार्गे जगदलपूर येथे नेण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी या तरुणांनी अशा प्रकारची यात्रा काढण्यासाठी सुकमा प्रशासनाशी संपर्क साधला होता. मात्र अशी यात्रा काढणे धोकादायक ठरू शकते, अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या होत्या.