शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीसाठी केली तीनशे झाडांची कत्तल

By admin | Updated: July 10, 2014 23:18 IST

तीन वर्षापासून जगविलेल्या तिनशे झाडांवर जे.सी.बी. चालून झाडे बुडा सोबत उखडून पाडले.

सोनाळा : येथील सोनाळा-बोरखेड रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाने हजारो रुपये खर्च करुन तीन वर्षापासून जगविलेल्या तिनशे झाडांवर जे.सी.बी. चालून झाडे बुडा सोबत उखडून पाडले. याबाबतची तक्रार बोरखेड वासीयांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.सोनाळा ते बोरखेड रोडलगत सामाजिक वनीकरण विभाग जळगाव जामोदने गत ३ वर्षापूर्वी वृक्षांची लागवड केली आहे. तर या झाडांची जोपासणा करुन ही झाडे जगविली आहेत. मात्र १४१ गाव वानपाणी पुरवठा योजने अंतर्गत बोरखेड गावाला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईनचे काम सुरु असून १५ दिवसांपूर्वी जे.सी.पी. क्र.एम.एच.४१ डि. ७१७१ च्या चालकाने डाब्या बाजुने असलेल्या वृक्षांच्या दोन रांगामधून जेसीबीने पाईपलाईनसाठी मोठी चर खोदली. यामुळे वृक्षारोपण केलेली सुमारे ३00 चे वर पाच ते आठ फुटाची झाडे बुंध्यासह उखडली.बोरखेडवासीयांनी संबंधीत ठेकेदाराला वृक्षांच्या बाजूला अंतर सोडून पाईपलाईन खोदण्याचे सांगीतले असताना हेकेखोरपणे चक्क १५ दिवस काम बंद ठेवले होते. अखेर ७ जुलै रोजी पुन्हा ठेकेदाराने जेसीपी एम.एच.४१ डी. ७१७१ ने रस्त्यावर खोदाई काम सुरु केले. यामध्ये ३00 च्यावर झाडे बुथ्यासोबत उखडून पडली.सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्यावरील वृक्षाचे रक्षणाकरिता एका मजुराची नेमणूक केली होती. त्याच्या समक्ष वृक्षांची कत्तल होत असतानाही सामाजिक वनीकरण विभागाकडून अद्यापही दखल घेतल्या गेली नाही. गेल्या तीन वर्षापासून दररोज १0 मजुर १६८ रु. रोजंदारीने या वृक्षांना पाणी देण्याचे काम करीत आहेत.मात्र पाईपलाईनसाठी वृक्षांची कत्तल झाल्याने शासनाच्या हजारो रुपयावर पाणी फेरले गेले असून वृक्षारोपणाचा उद्देशही साध्य झाला नाही. याबाबत सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकार्‍यांकडे चौकशीसाठी भ्रमणध्वनी केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे वृक्ष कत्तलीसाठी सामाजिक वनीकरण विभागाने तर छुपी परवानगी दिली नाही ना, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहे. तेव्हा वृक्षांची कत्तल करणार्‍या संबंधित ठेकेदार व सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी याबाबत दिलेल्या निवेदनावर संतोष आगलावे, यशवंत घाटे, मोहन बारब्दे, सिध्दार्थ घाटे, दीपक बाराब्दे, श्रीकृष्ण आगलावे, किसन बारब्दे आदींसह दोनशे गावकर्‍यांच्या सह्या आहेत.