शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
2
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
3
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
4
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
5
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
6
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
7
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
8
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
9
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
10
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
11
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
12
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
13
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
14
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
15
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
16
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
17
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
18
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
19
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
20
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...

जलवाहिनीसाठी केली तीनशे झाडांची कत्तल

By admin | Updated: July 10, 2014 23:18 IST

तीन वर्षापासून जगविलेल्या तिनशे झाडांवर जे.सी.बी. चालून झाडे बुडा सोबत उखडून पाडले.

सोनाळा : येथील सोनाळा-बोरखेड रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाने हजारो रुपये खर्च करुन तीन वर्षापासून जगविलेल्या तिनशे झाडांवर जे.सी.बी. चालून झाडे बुडा सोबत उखडून पाडले. याबाबतची तक्रार बोरखेड वासीयांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.सोनाळा ते बोरखेड रोडलगत सामाजिक वनीकरण विभाग जळगाव जामोदने गत ३ वर्षापूर्वी वृक्षांची लागवड केली आहे. तर या झाडांची जोपासणा करुन ही झाडे जगविली आहेत. मात्र १४१ गाव वानपाणी पुरवठा योजने अंतर्गत बोरखेड गावाला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईनचे काम सुरु असून १५ दिवसांपूर्वी जे.सी.पी. क्र.एम.एच.४१ डि. ७१७१ च्या चालकाने डाब्या बाजुने असलेल्या वृक्षांच्या दोन रांगामधून जेसीबीने पाईपलाईनसाठी मोठी चर खोदली. यामुळे वृक्षारोपण केलेली सुमारे ३00 चे वर पाच ते आठ फुटाची झाडे बुंध्यासह उखडली.बोरखेडवासीयांनी संबंधीत ठेकेदाराला वृक्षांच्या बाजूला अंतर सोडून पाईपलाईन खोदण्याचे सांगीतले असताना हेकेखोरपणे चक्क १५ दिवस काम बंद ठेवले होते. अखेर ७ जुलै रोजी पुन्हा ठेकेदाराने जेसीपी एम.एच.४१ डी. ७१७१ ने रस्त्यावर खोदाई काम सुरु केले. यामध्ये ३00 च्यावर झाडे बुथ्यासोबत उखडून पडली.सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्यावरील वृक्षाचे रक्षणाकरिता एका मजुराची नेमणूक केली होती. त्याच्या समक्ष वृक्षांची कत्तल होत असतानाही सामाजिक वनीकरण विभागाकडून अद्यापही दखल घेतल्या गेली नाही. गेल्या तीन वर्षापासून दररोज १0 मजुर १६८ रु. रोजंदारीने या वृक्षांना पाणी देण्याचे काम करीत आहेत.मात्र पाईपलाईनसाठी वृक्षांची कत्तल झाल्याने शासनाच्या हजारो रुपयावर पाणी फेरले गेले असून वृक्षारोपणाचा उद्देशही साध्य झाला नाही. याबाबत सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकार्‍यांकडे चौकशीसाठी भ्रमणध्वनी केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे वृक्ष कत्तलीसाठी सामाजिक वनीकरण विभागाने तर छुपी परवानगी दिली नाही ना, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहे. तेव्हा वृक्षांची कत्तल करणार्‍या संबंधित ठेकेदार व सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी याबाबत दिलेल्या निवेदनावर संतोष आगलावे, यशवंत घाटे, मोहन बारब्दे, सिध्दार्थ घाटे, दीपक बाराब्दे, श्रीकृष्ण आगलावे, किसन बारब्दे आदींसह दोनशे गावकर्‍यांच्या सह्या आहेत.