शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सेवा हमी कायद्याचे तीनतेरा...

By admin | Updated: July 27, 2015 01:18 IST

राज्य शासनाने सेवा हमी कायदा लागू करून राज्यातील जनतेला मोठा अधिकार प्राप्त करून दिला आहे.त्याद्वारे मिळणाऱ्या विविध दाखल्यांची

सुरेश लोखंडे, ठाणेराज्य शासनाने सेवा हमी कायदा लागू करून राज्यातील जनतेला मोठा अधिकार प्राप्त करून दिला आहे.त्याद्वारे मिळणाऱ्या विविध दाखल्यांची सेवा ग्रामपंचायतींमध्ये सध्या सुरू असलेल्या ग्रामसेवा केंद्रांद्वारे ग्रामसेवकाला द्यावी लागणार आहे. पण, नेटवर्कअभावी अद्यापही ग्रामस्थांना ती मिळत नाही. याची पुनरावृत्ती होऊन लागू केलेल्या सेवा हमी कायद्याची पायमल्ली होण्याची शक्यता नाकारण्यासारखी नसल्याचे बोलले जात आहे. महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात ‘नागरी सेवा केंद्र’, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या संबंधित दाखल्यांसाठी ‘सेतू’ आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचे लागणारे विविध स्वरूपांचे दाखले, प्रमाणपत्रे ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी ‘ग्रामसेवा केंद्रे’ आधीच सुरू आहेत. पण, आतापर्यंत ही केवळ संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी होती. पण, आता सेवा हमी कायद्याने जनतेला ठरावीक कालावधीत सुमारे १३ दाखले मिळण्याचा हक्क या कायद्याने दिला. त्यांच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या ग्रामसेवा केंद्रांचा वापर ग्रामसेवकांकडून केला जाणार आहे. पण, ग्रामीण भागात सुरू असलेल्या या ई-सेवा सेंटरला पुरेशा वीजपुरवठ्यासह नेटवर्कही मिळत नसल्यामुळे लागू झालेल्या या सेवा हमी कायद्याची पायमल्ली ग्रामपंचायत प्रशासनाकडून होणे सहज शक्य आहे. त्यावर उपाययोजना होणे अपेक्षित आहे. अन्यथा, प्रारंभापासून त्याची पायमल्ली झाल्यास हा सेवा हमी कायदा प्रभावी ठरणार नसल्याचे सांगितले जात आहे.