शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

विट्यामध्ये तिघांची टोळी जेरबंद

By admin | Updated: August 3, 2015 00:12 IST

या संशयित चोरट्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांत घरफोड्यांसह अन्य गुन्हेचे कबूल केले पन्नासहून अधिक गुन्ह्यांचा छडा; १२ लाखांचा ऐवज जप्त

विटा : विटा पोलिसांनी दि. २२ जुलै रोजी अटक केलेल्या राजेंद्र शिवाजी बाबर, महेश शिवाजी बाबर (दोघेही रा. किकली, जि. सातारा), नानासाहेब हरिबा कदम (रा. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) या संशयित चोरट्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आदी जिल्ह्यांत घरफोड्यांसह अन्य गुन्हे केल्याचे कबूल केले असून, विटा पोलिसांनी या संशयित चोरट्यांकडून विविध घरफोड्यांतील सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २७४ ग्रॅम सोने, ७ किलो चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह दोन चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. विट्यासह सांगली जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर झालेल्या चोऱ्यांमध्ये या टोळीचा हात असल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याची माहिती विट्याचे पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.विटा पोलिसांनी गेल्या आठवड्यात महेश शिवाजी बाबर (वय ३८), राजेंद्र शिवाजी बाबर (४५) या दोन सख्ख्या भावांसह येतगावच्या नानासाहेब हरिबा कदम अशा तीन संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यातील महेश आणि राजेंद्र बाबर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात पुढे आले. त्यांच्यावर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यात चोरी, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, हत्यारे कायदा भंग आणि वाहन चोरीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यापैकी संशयित राजेंद्र शिवाजी बाबर याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई झाली असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.विटा पोलिसांनी अटक केलेल्या तीन संशयितांकडे चौकशी केली असता, विटा शहरासह उपनगरांतील काही चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी विटा चोरीतील २७४ ग्रॅम सोने, १ किलो २८४ ग्रॅम चांदी यासह अन्य ३ लाख ८९ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.संशयितांनी शहरातील हजारे मळा, सुळकाई रस्ता, मायणी रस्ता, दत्तनगर, सावरकरनगर, जुना वासुंबे रस्ता, मेटकरी वस्ती आदी भागात चोऱ्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्याही हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील संशयित महेश बाबर याच्याकडून बारा जिवंत काडतुसे, चांदीचे दागिने, मोबाईल असा ३६ हजार २९४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित राजेंद्र बाबर याच्या मायणी रस्त्यावरील घरातून चार मोबाईल, दोन कॅमेरे, मनगटी घड्याळ, चांदीच्या वस्तू असा सुमारे ८२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)राजेंद्र बाबर टोळीचा म्होरक्याया टोळीकडून लोखंडी कात्री, शिडी, सोने गाळण्याचे यंत्र, हातोडा, कटावणी, बॅटरी जप्त केली आहे. साडेपाच किलो चांदी जप्त केली आहे. संशयितांनी सोने व चांदी विटा व पंढरपूर येथील सराफाकडे विकल्याचे तपासात पुढे येत आहे. दहा टीव्ही संच जप्त केले आहेत. त्यांची किंमत २ लाख ७७ हजार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, उपअधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक मोहन जाधव, सहायक निरीक्षक स्वप्नील घोंगडे, उपनिरीक्षक अमोल शिंदे, नाना पाटील, बाजीराव पाटील, विजय पारधी, विलास मुंढे, बाबूराव खरमाटे, राजेंद्र भिंगारदेवे, किरण खाडे, विशाल चंद, विक्रम गायकवाड, रामचंद्र खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.