शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

विट्यामध्ये तिघांची टोळी जेरबंद

By admin | Updated: August 3, 2015 00:12 IST

या संशयित चोरट्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांत घरफोड्यांसह अन्य गुन्हेचे कबूल केले पन्नासहून अधिक गुन्ह्यांचा छडा; १२ लाखांचा ऐवज जप्त

विटा : विटा पोलिसांनी दि. २२ जुलै रोजी अटक केलेल्या राजेंद्र शिवाजी बाबर, महेश शिवाजी बाबर (दोघेही रा. किकली, जि. सातारा), नानासाहेब हरिबा कदम (रा. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) या संशयित चोरट्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आदी जिल्ह्यांत घरफोड्यांसह अन्य गुन्हे केल्याचे कबूल केले असून, विटा पोलिसांनी या संशयित चोरट्यांकडून विविध घरफोड्यांतील सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २७४ ग्रॅम सोने, ७ किलो चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह दोन चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. विट्यासह सांगली जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर झालेल्या चोऱ्यांमध्ये या टोळीचा हात असल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याची माहिती विट्याचे पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.विटा पोलिसांनी गेल्या आठवड्यात महेश शिवाजी बाबर (वय ३८), राजेंद्र शिवाजी बाबर (४५) या दोन सख्ख्या भावांसह येतगावच्या नानासाहेब हरिबा कदम अशा तीन संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यातील महेश आणि राजेंद्र बाबर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात पुढे आले. त्यांच्यावर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यात चोरी, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, हत्यारे कायदा भंग आणि वाहन चोरीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यापैकी संशयित राजेंद्र शिवाजी बाबर याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई झाली असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.विटा पोलिसांनी अटक केलेल्या तीन संशयितांकडे चौकशी केली असता, विटा शहरासह उपनगरांतील काही चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी विटा चोरीतील २७४ ग्रॅम सोने, १ किलो २८४ ग्रॅम चांदी यासह अन्य ३ लाख ८९ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.संशयितांनी शहरातील हजारे मळा, सुळकाई रस्ता, मायणी रस्ता, दत्तनगर, सावरकरनगर, जुना वासुंबे रस्ता, मेटकरी वस्ती आदी भागात चोऱ्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्याही हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील संशयित महेश बाबर याच्याकडून बारा जिवंत काडतुसे, चांदीचे दागिने, मोबाईल असा ३६ हजार २९४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित राजेंद्र बाबर याच्या मायणी रस्त्यावरील घरातून चार मोबाईल, दोन कॅमेरे, मनगटी घड्याळ, चांदीच्या वस्तू असा सुमारे ८२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)राजेंद्र बाबर टोळीचा म्होरक्याया टोळीकडून लोखंडी कात्री, शिडी, सोने गाळण्याचे यंत्र, हातोडा, कटावणी, बॅटरी जप्त केली आहे. साडेपाच किलो चांदी जप्त केली आहे. संशयितांनी सोने व चांदी विटा व पंढरपूर येथील सराफाकडे विकल्याचे तपासात पुढे येत आहे. दहा टीव्ही संच जप्त केले आहेत. त्यांची किंमत २ लाख ७७ हजार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, उपअधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक मोहन जाधव, सहायक निरीक्षक स्वप्नील घोंगडे, उपनिरीक्षक अमोल शिंदे, नाना पाटील, बाजीराव पाटील, विजय पारधी, विलास मुंढे, बाबूराव खरमाटे, राजेंद्र भिंगारदेवे, किरण खाडे, विशाल चंद, विक्रम गायकवाड, रामचंद्र खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.