शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
7
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
8
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
9
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
11
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
12
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
13
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
14
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
15
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
16
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
17
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
18
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
19
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
20
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश

विट्यामध्ये तिघांची टोळी जेरबंद

By admin | Updated: August 3, 2015 00:12 IST

या संशयित चोरट्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांत घरफोड्यांसह अन्य गुन्हेचे कबूल केले पन्नासहून अधिक गुन्ह्यांचा छडा; १२ लाखांचा ऐवज जप्त

विटा : विटा पोलिसांनी दि. २२ जुलै रोजी अटक केलेल्या राजेंद्र शिवाजी बाबर, महेश शिवाजी बाबर (दोघेही रा. किकली, जि. सातारा), नानासाहेब हरिबा कदम (रा. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) या संशयित चोरट्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आदी जिल्ह्यांत घरफोड्यांसह अन्य गुन्हे केल्याचे कबूल केले असून, विटा पोलिसांनी या संशयित चोरट्यांकडून विविध घरफोड्यांतील सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २७४ ग्रॅम सोने, ७ किलो चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह दोन चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. विट्यासह सांगली जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर झालेल्या चोऱ्यांमध्ये या टोळीचा हात असल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याची माहिती विट्याचे पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.विटा पोलिसांनी गेल्या आठवड्यात महेश शिवाजी बाबर (वय ३८), राजेंद्र शिवाजी बाबर (४५) या दोन सख्ख्या भावांसह येतगावच्या नानासाहेब हरिबा कदम अशा तीन संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यातील महेश आणि राजेंद्र बाबर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात पुढे आले. त्यांच्यावर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यात चोरी, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, हत्यारे कायदा भंग आणि वाहन चोरीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यापैकी संशयित राजेंद्र शिवाजी बाबर याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई झाली असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.विटा पोलिसांनी अटक केलेल्या तीन संशयितांकडे चौकशी केली असता, विटा शहरासह उपनगरांतील काही चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी विटा चोरीतील २७४ ग्रॅम सोने, १ किलो २८४ ग्रॅम चांदी यासह अन्य ३ लाख ८९ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.संशयितांनी शहरातील हजारे मळा, सुळकाई रस्ता, मायणी रस्ता, दत्तनगर, सावरकरनगर, जुना वासुंबे रस्ता, मेटकरी वस्ती आदी भागात चोऱ्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्याही हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील संशयित महेश बाबर याच्याकडून बारा जिवंत काडतुसे, चांदीचे दागिने, मोबाईल असा ३६ हजार २९४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित राजेंद्र बाबर याच्या मायणी रस्त्यावरील घरातून चार मोबाईल, दोन कॅमेरे, मनगटी घड्याळ, चांदीच्या वस्तू असा सुमारे ८२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)राजेंद्र बाबर टोळीचा म्होरक्याया टोळीकडून लोखंडी कात्री, शिडी, सोने गाळण्याचे यंत्र, हातोडा, कटावणी, बॅटरी जप्त केली आहे. साडेपाच किलो चांदी जप्त केली आहे. संशयितांनी सोने व चांदी विटा व पंढरपूर येथील सराफाकडे विकल्याचे तपासात पुढे येत आहे. दहा टीव्ही संच जप्त केले आहेत. त्यांची किंमत २ लाख ७७ हजार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, उपअधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक मोहन जाधव, सहायक निरीक्षक स्वप्नील घोंगडे, उपनिरीक्षक अमोल शिंदे, नाना पाटील, बाजीराव पाटील, विजय पारधी, विलास मुंढे, बाबूराव खरमाटे, राजेंद्र भिंगारदेवे, किरण खाडे, विशाल चंद, विक्रम गायकवाड, रामचंद्र खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.