शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 29, 2016 00:55 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

कळंब (उस्मानाबाद)/ हिंगोली : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. कळंब तालुक्यातील खेर्डा येथील गुरुलिंग खराडे (५२) यांनी मंगळवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. यंदा आधी पावसाने ओढ दिल्याने तर नंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. याच विवंचनेतून त्यांनी मंगळवारी मध्यरात्री घरासमोरील जनावराच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, असा परिवार आहे.हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथील विष्णू पंडित (३५) या शेतकऱ्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांच्यावर एक लाखाचे कर्ज होते. रोजगार नसल्याने कर्जफेडीच्या चिंतेने बुधवारी दुपारी विष्णू यांनी विषप्राशन केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. औंढा नागगनाथ तालुक्यातील चिंचोली (निळोबा) येथे हिराजी मोरे (४५) यांनी दुष्काळी परिस्थितीला कंटाळून सोमवारी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. (प्रतिनिधी)विदर्भात शेतकऱ्याची आत्महत्याराळेगाव (यवतमाळ) : अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी येथील वाल्मिक चंपतराव डहाके (५५) या शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर सोसायटीचे एक लाख रुपयांचे कर्ज होते.