शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 29, 2016 00:55 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

कळंब (उस्मानाबाद)/ हिंगोली : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. कळंब तालुक्यातील खेर्डा येथील गुरुलिंग खराडे (५२) यांनी मंगळवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. यंदा आधी पावसाने ओढ दिल्याने तर नंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. याच विवंचनेतून त्यांनी मंगळवारी मध्यरात्री घरासमोरील जनावराच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, असा परिवार आहे.हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथील विष्णू पंडित (३५) या शेतकऱ्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांच्यावर एक लाखाचे कर्ज होते. रोजगार नसल्याने कर्जफेडीच्या चिंतेने बुधवारी दुपारी विष्णू यांनी विषप्राशन केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. औंढा नागगनाथ तालुक्यातील चिंचोली (निळोबा) येथे हिराजी मोरे (४५) यांनी दुष्काळी परिस्थितीला कंटाळून सोमवारी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. (प्रतिनिधी)विदर्भात शेतकऱ्याची आत्महत्याराळेगाव (यवतमाळ) : अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी येथील वाल्मिक चंपतराव डहाके (५५) या शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर सोसायटीचे एक लाख रुपयांचे कर्ज होते.