शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 29, 2016 00:55 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

कळंब (उस्मानाबाद)/ हिंगोली : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. कळंब तालुक्यातील खेर्डा येथील गुरुलिंग खराडे (५२) यांनी मंगळवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. यंदा आधी पावसाने ओढ दिल्याने तर नंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. याच विवंचनेतून त्यांनी मंगळवारी मध्यरात्री घरासमोरील जनावराच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, असा परिवार आहे.हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथील विष्णू पंडित (३५) या शेतकऱ्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांच्यावर एक लाखाचे कर्ज होते. रोजगार नसल्याने कर्जफेडीच्या चिंतेने बुधवारी दुपारी विष्णू यांनी विषप्राशन केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. औंढा नागगनाथ तालुक्यातील चिंचोली (निळोबा) येथे हिराजी मोरे (४५) यांनी दुष्काळी परिस्थितीला कंटाळून सोमवारी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. (प्रतिनिधी)विदर्भात शेतकऱ्याची आत्महत्याराळेगाव (यवतमाळ) : अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी येथील वाल्मिक चंपतराव डहाके (५५) या शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर सोसायटीचे एक लाख रुपयांचे कर्ज होते.