शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

पडझडीचे तीन बळी

By admin | Updated: June 24, 2015 04:16 IST

सोमवार मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे़ याचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला़ अनेक भागांत पाणी तुंबले़ पालिकेने जादा पंप

मुंबई : सोमवार मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे़ याचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला़ अनेक भागांत पाणी तुंबले़ पालिकेने जादा पंप लावून पाण्याचा निचरा वेळेत केला़ परंतु पावसाच्या तडाख्यामुळे संरक्षण भिंत, दरड, वृक्ष कोसळून तसेच शॉक लागून एकूण ३ जणांचा मृत्यू तर ९ जण जखमी झाले आहेत़ गोवंडीतील सह्याद्री नगरमध्ये शिवसेना शाखेजवळ संरक्षण भिंत कोसळून बेली अशोककुमार (२५) या महिलेचा मृत्यू झाला़ मंगळवारी दुपारी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराजवळ झाड कोसळून अ‍ॅथनी सॅबेस्टियन (२२) या तरुणाचा मृत्यू झाला़ अ‍ॅन्थनी हातगाडीवर डोसे विकत असे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याच अपघातात गीता खारवा (३०) ही महिला जखमी झाली. सोमवारी मध्यरात्री २च्या सुमारास विजेच्या खांबावरील बॅनर उतरवित असताना प्रकाश आसाराम राजभर या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना भांडुपच्या टेंभीपाडा परिसरात घडली. घरात पावसाचे पाणी झिरपू नये म्हणून त्यावर बॅनर टाकण्यास तो विजेच्या खांबावर चढून त्यावरील बॅनर उतरवित होता.