शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखली

By admin | Updated: September 5, 2016 04:18 IST

मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातुरात पाणी वाया घालवल्याचा फटका तीन अभियंत्यांना बसला.

लातूर : मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातुरात पाणी वाया घालवल्याचा फटका तीन अभियंत्यांना बसला. बार्शी रोडवरील टाकी भरल्यानंतर पाणीपुरवठा वेळीच बंद न केल्याने, लाखो लीटर पाणी वाहून गेल्याप्रकरणी या तिघांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.शाखा अभियंता श्रीमती यू. एच. शिंदे, बी. डी. बिराजदार आणि डी. जी. यादव या तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी घेतला. आयुक्तपदाचा पदभार असताना, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयालगत बार्शी रोडवर असलेल्या जलकुंभात हरंगुळ व साई येथील जलशुद्धिकरण केंद्राच्या पंपांवरून मोठ्या दाबाने पाणी घेऊन लातूरकरांची तहान भागविली जाते. २१ आॅगस्ट रोजी पाणीपुरवठा सुरू नसताना हे दोन्ही पंप सुरू होते. त्यामुळे जलकुंभ भरल्यानंतर लाखो लीटर पाणी वाया गेले आणि त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. अर्ध्या तासानंतर हे पंप बंद करण्यात आले. आर्वी जलकुंभास पाणी घेण्याची जबाबदारी शाखा अभियंता यू. एच. शिंदे यांच्याकडे, तर हरंगुळ जलशुद्धिकरण केंद्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम बी. डी. बिराजदार यांच्याकडे आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. जी. यादव आहेत. (प्रतिनिधी)>लातूर : मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातुरात पाणी वाया घालवल्याचा फटका तीन अभियंत्यांना बसला. बार्शी रोडवरील टाकी भरल्यानंतर पाणीपुरवठा वेळीच बंद न केल्याने, लाखो लीटर पाणी वाहून गेल्याप्रकरणी या तिघांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.शाखा अभियंता श्रीमती यू. एच. शिंदे, बी. डी. बिराजदार आणि डी. जी. यादव या तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी घेतला. आयुक्तपदाचा पदभार असताना, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयालगत बार्शी रोडवर असलेल्या जलकुंभात हरंगुळ व साई येथील जलशुद्धिकरण केंद्राच्या पंपांवरून मोठ्या दाबाने पाणी घेऊन लातूरकरांची तहान भागविली जाते. २१ आॅगस्ट रोजी पाणीपुरवठा सुरू नसताना हे दोन्ही पंप सुरू होते. त्यामुळे जलकुंभ भरल्यानंतर लाखो लीटर पाणी वाया गेले आणि त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. अर्ध्या तासानंतर हे पंप बंद करण्यात आले. आर्वी जलकुंभास पाणी घेण्याची जबाबदारी शाखा अभियंता यू. एच. शिंदे यांच्याकडे, तर हरंगुळ जलशुद्धिकरण केंद्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम बी. डी. बिराजदार यांच्याकडे आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. जी. यादव आहेत. (प्रतिनिधी)तथापि, यादव यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याने, जिल्हाधिकारी पोले यांनी गेल्या आठवड्यात यादव, शिंदे आणि बिराजदार यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखली.