शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

तीन आसनी रिक्षाचालक ‘वडाप’विरोधात

By admin | Updated: April 11, 2017 00:26 IST

मोहिमेस पाठबळ : सतरा संघटनांचा संयुक्तपाठिंबा : मोहीम तीव्रतेने राबविण्याचे पवार यांचे आश्वासन

कोल्हापूर : शहरात सुरूअसलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागा (आर.टी.ओ)च्या मोहिमेला सोमवारी भक्कम बळ मिळाले. शहरातील तीन आसनी प्रवासी वाहतूक सर्व १७ रिक्षा संघटनांनी भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटनेच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांना पाठिंबा दर्शविला. ‘पवारसाहेब आगे बडो, हम तुमारे साथ है’ अशा घोषणा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षाचालकांनी दिल्या. पवार म्हणाले, तुमच्या सहकार्यामुळे ही मोहीम अधिक तीव्र राबविण्यासाठी पाठबळ मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा आसनी रिक्षाचालकांनी आपला व्यवसाय शहराच्या हद्दीबाहेर करावा, असेही आवाहन त्यांनी केले. प्रामाणिकपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या पाठीशी ‘आरटीओ’चे अधिकारी निश्चितपणे राहतील, अशीही ग्वाही पवार यांनी दिली. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधी कारवाईसाठी महापालिका आणि आरटीओ यांच्या संयुक्ततेने चार पथके स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सर्व रिक्षा संघटनेच्यावतीने बाबा इंदूलकर, विजय गायकवाड, सुभाष शेटे यांनीही विचार मांडताना, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शहरांतर्गत प्रवासी अवैध वाहतूक करणारी समांतर वाहतूक व्यवस्था बंद करावी, सहा आसनी वाहतूकसुद्धा बंद करावी, तीन आसनी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसाठी परवाना असताना आठ ते दहा प्रवासी वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपे डिझेल रिक्षांवर कारवाई सुरू ठेवावी, ग्रामीण भागात परवाना असताना शहरांतर्गत वाहतूक केली जाते त्यांच्यावर कारवाई करावी, वायू, ध्वनिप्रदूषण थांबवावे, आदी मुद्दे मांडले.रिक्षा व्यावसायिकांनी ‘आरटीओ’ कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कारवाईचे समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्या. शिष्टमंडळाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोटर वाहन निरीक्षक ए. के. पाटील, प्रदीप गुरव हे उपस्थित होते. यावेळी विजय गायकवाड, बाबा इंदूलकर, राजू जाधव, सुभाष शेटे, अरुण घोरपडे, शंकर पंडित, ईश्वर चैनी, अविनाश दिंडे, शफुद्दिन शेख, दिलीप मोरे, रमेश पोवार, मोहन बागडी, राजू शाहीर, जाफर मुजावर, अविनाश वांद्रे, अनिल लांबोरे, राजू पाटील, शेखर कोळेकर, आदी सहभागी झाले होते. दबावाला बळी पडू नकारिक्षा व्यावसायिकांनी, ‘आरटीओ’च्या कार्यालयाच्या वडापविरोधी मोहिमेचे स्वागत करीत या कारवाईबाबत दबावाला बळी न पडता प्रामाणिक रिक्षा व्यवसाय करणाऱ्या चालकांच्या पाठीशी ‘आरटीओ’ने राहावे, असे आवाहन केले; पण दबावाला बळी पडून कारवाई थांबली तर या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा यावेळी दिला.