शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

तीन आसनी रिक्षाचालक ‘वडाप’विरोधात

By admin | Updated: April 11, 2017 00:26 IST

मोहिमेस पाठबळ : सतरा संघटनांचा संयुक्तपाठिंबा : मोहीम तीव्रतेने राबविण्याचे पवार यांचे आश्वासन

कोल्हापूर : शहरात सुरूअसलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागा (आर.टी.ओ)च्या मोहिमेला सोमवारी भक्कम बळ मिळाले. शहरातील तीन आसनी प्रवासी वाहतूक सर्व १७ रिक्षा संघटनांनी भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटनेच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांना पाठिंबा दर्शविला. ‘पवारसाहेब आगे बडो, हम तुमारे साथ है’ अशा घोषणा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षाचालकांनी दिल्या. पवार म्हणाले, तुमच्या सहकार्यामुळे ही मोहीम अधिक तीव्र राबविण्यासाठी पाठबळ मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा आसनी रिक्षाचालकांनी आपला व्यवसाय शहराच्या हद्दीबाहेर करावा, असेही आवाहन त्यांनी केले. प्रामाणिकपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या पाठीशी ‘आरटीओ’चे अधिकारी निश्चितपणे राहतील, अशीही ग्वाही पवार यांनी दिली. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधी कारवाईसाठी महापालिका आणि आरटीओ यांच्या संयुक्ततेने चार पथके स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सर्व रिक्षा संघटनेच्यावतीने बाबा इंदूलकर, विजय गायकवाड, सुभाष शेटे यांनीही विचार मांडताना, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शहरांतर्गत प्रवासी अवैध वाहतूक करणारी समांतर वाहतूक व्यवस्था बंद करावी, सहा आसनी वाहतूकसुद्धा बंद करावी, तीन आसनी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसाठी परवाना असताना आठ ते दहा प्रवासी वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपे डिझेल रिक्षांवर कारवाई सुरू ठेवावी, ग्रामीण भागात परवाना असताना शहरांतर्गत वाहतूक केली जाते त्यांच्यावर कारवाई करावी, वायू, ध्वनिप्रदूषण थांबवावे, आदी मुद्दे मांडले.रिक्षा व्यावसायिकांनी ‘आरटीओ’ कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कारवाईचे समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्या. शिष्टमंडळाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोटर वाहन निरीक्षक ए. के. पाटील, प्रदीप गुरव हे उपस्थित होते. यावेळी विजय गायकवाड, बाबा इंदूलकर, राजू जाधव, सुभाष शेटे, अरुण घोरपडे, शंकर पंडित, ईश्वर चैनी, अविनाश दिंडे, शफुद्दिन शेख, दिलीप मोरे, रमेश पोवार, मोहन बागडी, राजू शाहीर, जाफर मुजावर, अविनाश वांद्रे, अनिल लांबोरे, राजू पाटील, शेखर कोळेकर, आदी सहभागी झाले होते. दबावाला बळी पडू नकारिक्षा व्यावसायिकांनी, ‘आरटीओ’च्या कार्यालयाच्या वडापविरोधी मोहिमेचे स्वागत करीत या कारवाईबाबत दबावाला बळी न पडता प्रामाणिक रिक्षा व्यवसाय करणाऱ्या चालकांच्या पाठीशी ‘आरटीओ’ने राहावे, असे आवाहन केले; पण दबावाला बळी पडून कारवाई थांबली तर या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा यावेळी दिला.