शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

सांगलीतील रवींद्र माने खूनप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: May 2, 2017 21:04 IST

रवींद्र माने याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित बाबू शिंदेसह तीन संशयितांना अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 2 - येथील अहिल्यानगरमधील तडीपार गुंड रवींद्र माने याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित बाबू शिंदेसह तीन संशयितांना अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. रवींद्र शहरात आल्याची बाबूने पोलिसांना टिप दिली होती. यातून या दोघांत वाद होऊन त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यामुळे रवींद्रची गेम केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. याप्रकरणी रवींद्रचा मित्र इमाम मेहबूब शेख (वय १९, रा. अहिल्यानगर, कुपवाड) याची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक केलेल्यांमध्ये बाबू उर्फ मल्हारी बबन शिंदे (वय २३, रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर), ऋषिकेश दिनकर गळवे (१९, वाल्मिकी आवास) व नागेश सुधीर हडदरे (२२, संभाजीनगर, जुना बुधगाव रस्ता, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांना न्यायालयाने ५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. खून झाल्यापासून ते फरारी आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. सहा महिन्यापूर्वी रवींद्रला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. २८ मार्चला तडीपार आदेशचा भंग करुन रवींद्र सांगलीत आला होता. त्याला गुंडाविरोधी पथकाने पकडले होते. पथकाला मी आल्याची टिप बाबू शिंदे याने दिल्याचा संशय रवींद्रला आला होता. याचा त्याने बाबूला जाबही विचारला होता. यातून दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. गेली एक महिना त्यांच्यात धुसफूस सुरू होती.गेल्या आठवड्यात बाबूने रवींद्रच्या गटातील एका तरुणास बोलावून घेतले. त्याला कवलापूर (ता. मिरज) येथील माळावर नेऊन बेदम मारहाण केली होती. ही बाब बाबूला समजताच घटनेपूर्वी एक दिवस अगोदर रवींद्र बाबूच्या घरी गेला होता. त्याने बाबूला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे दोघांतील वैरत्वाने चांगलाच पेट घेतला होता. बाबूनेही रवींद्रला सोडायचे नाही, अशी शपथच घेतली. त्यानुसार त्याने हत्यारांची जुळवा-जुळव करुन दुसऱ्यादिवशीपासून त्याने रवींद्रचा गेम करण्यासाठी त्याच्यावर पाळत ठेवली. घटनेदिवशी रवींद्र भावाच्या वाढदिवसाची तयारी करण्यात मग्न होता. कलानगर येथे मंडप ठरवून तो तीन मित्रासोबत निघाल्याची संधी साधून बाबूने त्याचा गेम केला होता. माफी मागायला लावली अन् गेम केलारवींद्र भावाच्या वाढदिवसासाठी मंडप ठरवून तो घेऊन जात असताना बाबू व त्याच्या साथीदारांनी त्याला कलानगरमधील दत्त मंदिराजवळ गाठले. रवींद्रच्या दुचाकीला मोटारीने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रवींद्र व त्याचा मित्र भोराप्पा आमटे उडून पडताच बाबू व साथीदार हत्यारे घेऊन उतरले. त्यांनी रवींद्रला ह्यटार्गेटह्ण केले. बाबूने गेली एक महिनाभर सुरु असलेला वाद उकरुन काढून रवींद्रला स्वत:ची पाय धरुन माफी मागायला सांगितले. रवींद्रनेही घाबरुन खाली वाकून गुडगे जमिनीववर टेकून बाबूच्या डोक्यावर पाय ठेऊन माफी मागत होता. तेवढ्यात बाबू व साथीदारांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने घाव घातले. रवींद्रला त्यांनी बचावाची कोणतीही संधी दिली नाही, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांना रवींद्रचा गुडघे टेकलेल्या स्थितीतच मृतदेच आढळून आला होता.भोराप्पावर खुनाचा गुन्हारवींद्रच्या खुनाचा प्रत्यक्षदर्क्षी साथीदार भोराप्पा आमटे आहे. भोराप्पा व रवीद्र एकाचा दुचाकीवर जात होते. रवींद्रची ह्यगेमह्ण करताना भोराप्पाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. बाबूने त्याच्यावरही हल्ला चढविल्यानंतर तो बेशुद्ध पडला होता. त्यामुळे या घटनेचा दुसरा साक्षीदार व रवींद्रचा मित्रा इमाम शेख याची पोलिसांनी फिर्याद घेतली आहे. भोराप्पाविरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर येथील अनिल पंढरीनाथ वाळूकर (वय २५) याचा खून केल्याचा गुन्हा नोंद आहे. या खुनात भोराप्पासह पाचजणांना अटक झाली होती. टेम्पो आडवा मारल्याच्या क्षुल्लक कारणावरुन माधवनगर येथे हा खून झाला होता.