शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

साडे तीन वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्ठात; आतापर्यंत सहावी महिला जि.प.च्या अध्यक्ष पदी

By सुरेश लोखंडे | Updated: January 15, 2018 21:24 IST

जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी जमातीमधील मंजुषा जाधव अध्यक्ष पदी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील या सहाव्या महिला अध्यक्षा ठरल्यां आहेत.

ठळक मुद्देलोकमतचे भाकित तंतोतंत खरे ठरलेप्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला एका सदस्याचे पाठबळ घेऊन सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी सोबत घ्यावे लागलेसाडे तीन वर्ष प्रशासकीय राजवट असलेल्या या जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी जमातीमधील मंजुषा जाधव अध्यक्ष पदी विजयी

सुरेश लोखंडे,ठाणे : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्याच्या एतिहासिक घटने प्रसंगी ठाणे जिल्हा परिषद बरखास्त करावी लागली. त्यानंतर विविध कारणांमुळे सुमारे साडे तीन वर्ष प्रशासकीय राजवट असलेल्या या जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी जमातीमधील मंजुषा जाधव अध्यक्ष पदी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील या सहाव्या महिला अध्यक्षा ठरल्यां आहेत.       जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी ‘ठाणे जि.प. अध्यक्षा आदिवासी महिला’ या मथळ्या खाली लोकमतने १३ डिसेंबररोजी वृत्तप्रसिध्द करून या स्पर्धेतील अफवा दूर केल्या होत्या. यानंतर विजयी उमेदवार घोषीत होताच मंजुषा जाधव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असल्याचे भाकित देखील लोकमतते १५ डिसेंबर रोजी प्रसिध्द केले असता ते ही तंतोतंत खरे ठरले आहे. जाधव यांच्या रूपाने आदिवासी महिला अध्यक्षपदी विराजमान होऊन साडे तीन वर्षाच्या प्रशासकीय सत्ता संपुष्ठात आणण्याचा बहुमानही त्यांना सेनेच्या नेतृत्वामुळे मिळाला आहे.ठाणे जिल्हा परिषदेची स्थापना १९६२ ला झाली असता तेव्हा पासून जाधव यांच्यासह आतापर्यंत २३ अध्यक्ष झाले आहेत. यामध्ये १९६२ ते १९७२ या कालावधीत पांडुरंग देशमुख पहिले अध्यक्ष आहेत. त्यानंतर २९ आॅगस्ट १९७२ ते ७९ या पाच वर्षाच्या कालावधीत वसईच्या ताराबाई नरसिंह वर्तक या ठाणे जि.प.च्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. त्यानंतर वासुदेव वर्तक १९७९ ते ८० या कालावधीत अध्यक्ष होते. त्यानंतर अशोक सिन्हा हे सीईओ २१ दिवसाचे प्रशासक अध्यक्ष होते. यानंतर सुदाम भोईर यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा प्रशासक म्हणून सुबोध कुमार यांनी २२ दिवस सत्ता केली. यानंतर मिनालीसेन गवई या १ जुलै १९९० ते १० मार्च १९९२ या कालावधीत महिला प्रशासक अध्यक्षा झाल्या होते. या प्रशासकानंतर १९९७ ते ९८ या दरम्यान माणक एकनाथ पाटील ह्या महिला अध्यक्ष झाल्या. या पाठोपाठ वाड्याच्या रेखा पष्ठे २००७ ते ०९ आणि २०१२ ते ०१४ या दरम्यान राष्ट्रवादीच्या अंबरनाथ येथील सारिका गायकवाड ह्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर सुमारे साडे तीन वर्षाच्या प्रशासकीय कालावधी नंतर शहापूर मंजुषा जाधव या सहाव्या महिला अध्यक्षा जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. जाधव यांच्यासह आतापर्यंत २३ अध्यक्षांनी जिल्हा परिषदेचे सत्ता करून ग्रामीण भागाचा विकास केला आहे.प्रशासकीय राजवटीच्या आधी राष्ट्रवादी  काँग्रेसची जिल्हा परिषदेवर सत्ता होती. शिवसेनेशी युती करून राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवत उपाध्यक्ष पद मिळवले आहे. या आधी विभाजनानंतर सुमारे दोन वेळा निवडणुका जाहीर होऊनही त्या झाल्या नाहीत. पहिल्या वेळी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एकही उमेदवार दिला नाही. या पक्षांच्या बहिष्कारास विचारात न घेता काही पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आठ सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरला असता. ते बिन विरोध विजयी झाले. मात्र संख्याबळा ऐवजी जिल्हा परिषद अस्तित्वात आली नाही. त्यानंतर अल्पावधीतच निवडणुका घोषित झाल्या. मात्र बिनविरोध निवडून आलेल्यांचे सदस्यपद कायम ठेवून या निवडणुका होणार होत्या. पण त्यास विरोध करीत न्यायालयात जनहित याचीका दाखल केल्यामुळे निवडणूक होऊ शकली नाही. या निडवणुकीत प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला एका सदस्याचे पाठबळ घेऊन सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी सोबत घ्यावे लागले आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार