शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

साडे तीन वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्ठात; आतापर्यंत सहावी महिला जि.प.च्या अध्यक्ष पदी

By सुरेश लोखंडे | Updated: January 15, 2018 21:24 IST

जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी जमातीमधील मंजुषा जाधव अध्यक्ष पदी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील या सहाव्या महिला अध्यक्षा ठरल्यां आहेत.

ठळक मुद्देलोकमतचे भाकित तंतोतंत खरे ठरलेप्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला एका सदस्याचे पाठबळ घेऊन सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी सोबत घ्यावे लागलेसाडे तीन वर्ष प्रशासकीय राजवट असलेल्या या जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी जमातीमधील मंजुषा जाधव अध्यक्ष पदी विजयी

सुरेश लोखंडे,ठाणे : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्याच्या एतिहासिक घटने प्रसंगी ठाणे जिल्हा परिषद बरखास्त करावी लागली. त्यानंतर विविध कारणांमुळे सुमारे साडे तीन वर्ष प्रशासकीय राजवट असलेल्या या जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी जमातीमधील मंजुषा जाधव अध्यक्ष पदी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील या सहाव्या महिला अध्यक्षा ठरल्यां आहेत.       जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी ‘ठाणे जि.प. अध्यक्षा आदिवासी महिला’ या मथळ्या खाली लोकमतने १३ डिसेंबररोजी वृत्तप्रसिध्द करून या स्पर्धेतील अफवा दूर केल्या होत्या. यानंतर विजयी उमेदवार घोषीत होताच मंजुषा जाधव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असल्याचे भाकित देखील लोकमतते १५ डिसेंबर रोजी प्रसिध्द केले असता ते ही तंतोतंत खरे ठरले आहे. जाधव यांच्या रूपाने आदिवासी महिला अध्यक्षपदी विराजमान होऊन साडे तीन वर्षाच्या प्रशासकीय सत्ता संपुष्ठात आणण्याचा बहुमानही त्यांना सेनेच्या नेतृत्वामुळे मिळाला आहे.ठाणे जिल्हा परिषदेची स्थापना १९६२ ला झाली असता तेव्हा पासून जाधव यांच्यासह आतापर्यंत २३ अध्यक्ष झाले आहेत. यामध्ये १९६२ ते १९७२ या कालावधीत पांडुरंग देशमुख पहिले अध्यक्ष आहेत. त्यानंतर २९ आॅगस्ट १९७२ ते ७९ या पाच वर्षाच्या कालावधीत वसईच्या ताराबाई नरसिंह वर्तक या ठाणे जि.प.च्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. त्यानंतर वासुदेव वर्तक १९७९ ते ८० या कालावधीत अध्यक्ष होते. त्यानंतर अशोक सिन्हा हे सीईओ २१ दिवसाचे प्रशासक अध्यक्ष होते. यानंतर सुदाम भोईर यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा प्रशासक म्हणून सुबोध कुमार यांनी २२ दिवस सत्ता केली. यानंतर मिनालीसेन गवई या १ जुलै १९९० ते १० मार्च १९९२ या कालावधीत महिला प्रशासक अध्यक्षा झाल्या होते. या प्रशासकानंतर १९९७ ते ९८ या दरम्यान माणक एकनाथ पाटील ह्या महिला अध्यक्ष झाल्या. या पाठोपाठ वाड्याच्या रेखा पष्ठे २००७ ते ०९ आणि २०१२ ते ०१४ या दरम्यान राष्ट्रवादीच्या अंबरनाथ येथील सारिका गायकवाड ह्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर सुमारे साडे तीन वर्षाच्या प्रशासकीय कालावधी नंतर शहापूर मंजुषा जाधव या सहाव्या महिला अध्यक्षा जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. जाधव यांच्यासह आतापर्यंत २३ अध्यक्षांनी जिल्हा परिषदेचे सत्ता करून ग्रामीण भागाचा विकास केला आहे.प्रशासकीय राजवटीच्या आधी राष्ट्रवादी  काँग्रेसची जिल्हा परिषदेवर सत्ता होती. शिवसेनेशी युती करून राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवत उपाध्यक्ष पद मिळवले आहे. या आधी विभाजनानंतर सुमारे दोन वेळा निवडणुका जाहीर होऊनही त्या झाल्या नाहीत. पहिल्या वेळी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एकही उमेदवार दिला नाही. या पक्षांच्या बहिष्कारास विचारात न घेता काही पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आठ सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरला असता. ते बिन विरोध विजयी झाले. मात्र संख्याबळा ऐवजी जिल्हा परिषद अस्तित्वात आली नाही. त्यानंतर अल्पावधीतच निवडणुका घोषित झाल्या. मात्र बिनविरोध निवडून आलेल्यांचे सदस्यपद कायम ठेवून या निवडणुका होणार होत्या. पण त्यास विरोध करीत न्यायालयात जनहित याचीका दाखल केल्यामुळे निवडणूक होऊ शकली नाही. या निडवणुकीत प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला एका सदस्याचे पाठबळ घेऊन सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी सोबत घ्यावे लागले आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार