शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

पंधरा ठेकेदारांपैकी अखेर तिघे नरमले

By admin | Updated: November 5, 2016 03:18 IST

शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चे अंती १५ ठेकेदारां पैकी तिघांनी मजुरीची थकीत रक्कम देण्याचे मान्य केले

हितेन नाईक,

पालघर- जव्हार, विक्रमगड, डहाणू तालुक्यातील २४१ आदिवासी कुटुंबांनी शहरी भागात केलेल्या मजुरीचे पैसे थकविल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चे अंती १५ ठेकेदारां पैकी तिघांनी मजुरीची थकीत रक्कम देण्याचे मान्य केले असून हळू हळू इतर ठेकेदार सुद्धा पुढे येत असल्याने कष्टकरी संघटनेच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. आदिवासी मजुरांची होणारी ही पिळवणूक व लुट जिल्हाधिकाऱ्यांपुढे आल्यानंतर जिल्हातील ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाला स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने शेवटी नाईलाजाने पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना शहराकडे स्थलांतर करीत मोलमजुरी करणाऱ्या शिवाय पर्याय नसतो. अशा शेकडो कुटुंबानी आपल्या कुटुंबाच्या उदरिनर्वाहासाठी जीवाचे रान करीत उभी केलेली सुमारे २५ लाख ९१ हजार ६४३ रुपयांची हक्काची रक्कम लुबाडली जात होती. २०१४-१५-१६ या तीन वर्षांमध्ये लाखो रुपयांची आपल्या कष्टाची रोंजदारी थकवली गेल्यामुळे जगण्याच्या प्रवाहात ही कुटुंबे उपासमारी आणि कुपोषणाच्या दुहेरी कात्रीत सापडली होती.आदिवासी कामगारांनी १५ ठेकेदारांकडे केलेल्या कामाच्या मोबदल्यात सुमारे २५ लाख ९१ हजार ६४३ रुपयांची थकीत रक्कम मिळावी या साठी कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वा खाली सुमारे २०० कुटुंबीय गुरुवार सकाळपासून पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे धरून बसले आहेत. शनिवारी सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जरे, कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, उपायुक्त विकास माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी निमिल गोयल, संबधित तहसीलदार, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो. मधू धोडी आदींमध्ये कष्टकऱ्यांची ठेकेदारांकडून होत असलेल्या पिळवणूकीवर चर्चा झाली.प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचल्यानंतर कल्पेश घरत यांनी ३० हजार, बहादूर धोडी यांनी ८८ हजार ६२२ रु पयांचा धनादेश जमा केला असून शांताराम सांबरे, भरत भाई सरवैय्या यांनी आपले पैसे जमा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उपजिल्हाधिकारी जरे यांनी दिली.>फ सवणुकीचे गुन्हे दाखल कराजिल्ह्यात कुपोषणाचा गंभीर प्रश्न काही महिन्यांपासून ऐरणीवर असताना ही सर्व २४१ कुटुंबे स्थानिक पातळीवर हाताला काम नसल्याने स्थलांतरित झाली होती. मजुरी हे त्यांचे जगण्याचे एकमेव साधन असताना रक्ताचे पाणी करून जमा झालेली रक्कम देण्यास मालक, ठेकेदारांनी चालढकल चालविल्याने ही सर्व कुटुंबे आर्थिक संकटात सापडली होती. अशा वेळी दोन वेळच्या खायची मोदाद झाली होती. मिठागरे, बांधकाम व्यावसायिक, दगडी खदान, वीटभट्टी, मासेमारी व्यवसायिक ई. मोठमाठ्या लोकांकडे ही मजुरीची रक्कम थकीत राहिली आहे. हे मजूर आगाऊ पैसे घेऊन कामासाठी बांधून घेतले जात असल्याने कायदेशीर रित्या ते वेठिबगार या संज्ञेत मोडत असल्याने मजुरांची फसवणूक करणाऱ्यां मालकावर वेठबिगार निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.