शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
3
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
4
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
5
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
6
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
7
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
8
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
9
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
10
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
11
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
12
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
13
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
14
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
15
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
16
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
17
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
18
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
19
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
20
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई

पंधरा ठेकेदारांपैकी अखेर तिघे नरमले

By admin | Updated: November 5, 2016 03:18 IST

शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चे अंती १५ ठेकेदारां पैकी तिघांनी मजुरीची थकीत रक्कम देण्याचे मान्य केले

हितेन नाईक,

पालघर- जव्हार, विक्रमगड, डहाणू तालुक्यातील २४१ आदिवासी कुटुंबांनी शहरी भागात केलेल्या मजुरीचे पैसे थकविल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चे अंती १५ ठेकेदारां पैकी तिघांनी मजुरीची थकीत रक्कम देण्याचे मान्य केले असून हळू हळू इतर ठेकेदार सुद्धा पुढे येत असल्याने कष्टकरी संघटनेच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. आदिवासी मजुरांची होणारी ही पिळवणूक व लुट जिल्हाधिकाऱ्यांपुढे आल्यानंतर जिल्हातील ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाला स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने शेवटी नाईलाजाने पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना शहराकडे स्थलांतर करीत मोलमजुरी करणाऱ्या शिवाय पर्याय नसतो. अशा शेकडो कुटुंबानी आपल्या कुटुंबाच्या उदरिनर्वाहासाठी जीवाचे रान करीत उभी केलेली सुमारे २५ लाख ९१ हजार ६४३ रुपयांची हक्काची रक्कम लुबाडली जात होती. २०१४-१५-१६ या तीन वर्षांमध्ये लाखो रुपयांची आपल्या कष्टाची रोंजदारी थकवली गेल्यामुळे जगण्याच्या प्रवाहात ही कुटुंबे उपासमारी आणि कुपोषणाच्या दुहेरी कात्रीत सापडली होती.आदिवासी कामगारांनी १५ ठेकेदारांकडे केलेल्या कामाच्या मोबदल्यात सुमारे २५ लाख ९१ हजार ६४३ रुपयांची थकीत रक्कम मिळावी या साठी कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वा खाली सुमारे २०० कुटुंबीय गुरुवार सकाळपासून पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे धरून बसले आहेत. शनिवारी सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जरे, कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, उपायुक्त विकास माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी निमिल गोयल, संबधित तहसीलदार, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो. मधू धोडी आदींमध्ये कष्टकऱ्यांची ठेकेदारांकडून होत असलेल्या पिळवणूकीवर चर्चा झाली.प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचल्यानंतर कल्पेश घरत यांनी ३० हजार, बहादूर धोडी यांनी ८८ हजार ६२२ रु पयांचा धनादेश जमा केला असून शांताराम सांबरे, भरत भाई सरवैय्या यांनी आपले पैसे जमा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उपजिल्हाधिकारी जरे यांनी दिली.>फ सवणुकीचे गुन्हे दाखल कराजिल्ह्यात कुपोषणाचा गंभीर प्रश्न काही महिन्यांपासून ऐरणीवर असताना ही सर्व २४१ कुटुंबे स्थानिक पातळीवर हाताला काम नसल्याने स्थलांतरित झाली होती. मजुरी हे त्यांचे जगण्याचे एकमेव साधन असताना रक्ताचे पाणी करून जमा झालेली रक्कम देण्यास मालक, ठेकेदारांनी चालढकल चालविल्याने ही सर्व कुटुंबे आर्थिक संकटात सापडली होती. अशा वेळी दोन वेळच्या खायची मोदाद झाली होती. मिठागरे, बांधकाम व्यावसायिक, दगडी खदान, वीटभट्टी, मासेमारी व्यवसायिक ई. मोठमाठ्या लोकांकडे ही मजुरीची रक्कम थकीत राहिली आहे. हे मजूर आगाऊ पैसे घेऊन कामासाठी बांधून घेतले जात असल्याने कायदेशीर रित्या ते वेठिबगार या संज्ञेत मोडत असल्याने मजुरांची फसवणूक करणाऱ्यां मालकावर वेठबिगार निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.