शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

धाग्याने विणली बंधुत्वाची गुंफन, ५ हजार भावांची बनल्या 'ताई'

By admin | Updated: August 21, 2016 17:34 IST

धावपळीच्या या युगात आप्तेष्टांचाही विसर पडत असल्याने कुटुंबातही दुरावा निर्माण होत असल्याची उदाहरणे आहेत.

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. २१ : धावपळीच्या या युगात आप्तेष्टांचाही विसर पडत असल्याने कुटुंबातही दुरावा निर्माण होत असल्याची उदाहरणे आहेत. मात्र अशा परिस्थितीत काहीजण मात्र याला अपवाद ठरत दृढ निश्चयाने निर्माण झालेले नाते घट्ट विणत आहेत याचे उदाहरण म्हणजे खामगाव तालुक्यातील आडवळणाच्या पोरज गावातील गोदावरीताई ढोण  होत. यामुळेच आज ५ हजार भावांच्या ताई होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.

खामगाव तालुक्यातील पोरज हे आडवळणाचे सुमारे ५०० ते ७०० लोकवस्तीचे गाव. या गावातील गोदावरीताई बोराडे  आई-वडिलांना एकुलत्या. त्यांचे लग्न येथील पुरुषोत्तम ढोण यांच्याशी झाले. लग्नानंतर वृध्द आई-वडिलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाल्याने गोदावरीताई व त्यांच्या पतीने गोदावरीतार्इंच्या माहेरीच राहण्याचा निर्णय घेतला. भाऊ म्हणजे एका आईचीच दोन लेकरे ही विचारसरणी झुगारत आपलेपणाने गोदावरीतार्इंनी गावातील प्रत्येकासोबतच भावाचे नाते जपले. यामुळे रक्षाबंधनदिनी त्या गावातील सुमारे ५० जणांना राखी बांधत. या सामाजिक कार्यातूनच त्या सन २००० मध्ये कृउबास संचालक तसेच खरेदी-विक्री संस्थेवर संचालक म्हणून निवडून आल्या. यामुळे तालुक्यात त्यांचा परिचय वाढल्याने बंधुत्वाचे नाते सुध्दा वाढले.

यामुळे बाहेरगावी राखी बांधण्यासाठी जावू शकत नसल्या तरी त्यांनी नियमितपणे राखी पाठविणे सुरु ठेवले आहे. या बंधुत्वाच्या नात्यामुळे आजरोजी त्यांनी सुमारे ५ हजार भावांना राखीच्या बंधनातून जोडले आहे. सन २००० मध्ये सुमारे ५०० भावांना त्या राखी पाठवित असत आज हा आकडा सुमारे ५ हजार पर्यंत पोहोचला आहे. या राखी वाटप कामी त्यांना पती पुरुषोत्तम ढोण, मुलगा उमेश व गणेश तसेच इतर नातेवाईकांचे सुध्दा सहकार्य मिळते. गेल्या तेरा वर्षापासून सातत्याने हा राखी पाठविण्याचा उपक्रम राबवित आहेत.