शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तूरडाळ रेशन दुकानदारांच्या माथी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 01:47 IST

गगनाला भिडलेल्या डाळीच्या भावामुळे सरकारवर कडाडून टीका झाल्यावर सवलतीच्या दरात डाळ विक्रीचा निर्णय सरकारने घेतला.

पुणे : गगनाला भिडलेल्या डाळीच्या भावामुळे सरकारवर कडाडून टीका झाल्यावर सवलतीच्या दरात डाळ विक्रीचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार जिल्ह्यात १८३१ क्विंटल तूरडाळीचा पुरवठा गोदामातून करण्यात आला. मात्र बाजारामध्ये तूरचे भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने रेशन दुकानदार डाळ घेतली तर ती आपल्याच माथी पडणार असल्याने उचलण्यास चालढकल करीत आहेत. आतापर्यंत फक्त ८४.१ क्विंटल इतकाच साठा उचलला गेला आहे. उर्वरित डाळ तशीच पडून आहे. २१ जुलैच्या शासननिर्णयानुसार अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना प्रत्येकी एक किलो डाळ १०३ रुपयांनी विकण्याचे आदेश आहेत. जिल्ह्यात बीपीएल शिधापत्रिकाधारकांची संख्या १ लाख ३० हजार ६५८, तर अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ५२ हजार ८५० इतकी आहे. एकूण १ लाख ८३ हजार ५०८ लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी जिल्ह्यातील १५ गोदामांत १८३१ क्विंटल डाळ आली आहे. मात्र ती डाळ उचलण्यास रेशन दुकानदार तयार नाहीत. त्यात दुकानात डाळ न्यायची तर वाहनाचे भाडे परवडेल का? डाळीची गुणवत्ता चांगली असेल का? लाभार्थी ती घेतील का? बाजारात ९० ते ९५ रुपये किलोने डाळ विकली जात असल्याने ती पडून राहील का, असे प्रश्न त्यांच्यासमोर पडले आहेत. असे असले तरी कार्डधारकांच्या संख्येप्रमाणे त्यांना डाळ उचलावीच लागणार असून ती त्यांच्या माथी पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार तथा गोदाम व्यवस्थापक उत्तम बडे यांच्याशी संपर्क साधून असता आतापर्यंत ८४.१ क्विंटल डाळ दुकानदारांनी गोदामातून उचलली आहे. आमच्याकडे तशा काही तक्रारी नाहीत. तसेच कार्डधारकांच्या संख्येप्रमाणे ती त्या त्या दुकानदारांना घ्यावीच लागणार असल्याचे सांगितले. १०४०० किलो डाळ भोरच्या गोदामात पडून भोर : रेशनिंग दुकानापेक्षा खासगी दुकानदारांकडे स्वस्त आणि चांगल्या प्रतीची डाळ मिळत असल्याने भोर तालुक्यातील शासकीय गोदामाला सुमारे १०४ क्विंटल (१०४०० किलो) तूरडाळ पडून आहे. तालुक्यातील १५५ ग्रामपंचायतीमध्ये १९७ गावे असून १७० स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानात दारिद्र्यरेषेखाली व अंत्योदय योजनेत असलेल्या कुटुंबांना २ रु. किलोने स्वस्तात ३५ किलो धान्य दिले जाते. डाळीची किंमत १०३ रु. प्रतिकिलो आहे. हीच डाळ खासगी दुकानात चांगल्या प्रतीची ९० रु. किलोने मिळते. यामुळे नागरिक डाळ घेणार नाहीत. शिवाय एक पोते डाळ विकल्यावर रेशनिंग दुकानदाराला ७० रु. मिळणार आहेत. मात्र डाळीचा भाव अधिक असल्याने खपणार नसल्याने इतकी १०४०० किलो डाळ मागील महिनाभरापासून गोदामात पडून आहे. पुरंदरला १३८७६ किलो पडूनजेजुरी : पुरंदर तालुक्यातील गोदामात १३८७६ किलो तूरडाळ वाटपासाठी आली असून ती बाहेरच्या बाजारभावापेक्षा महाग असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांकडून डाळ उचलण्यास नाराजी व्यक्त होत आहे, नाइलाजास्तव दुकानदार ही डाळ उचलत आहेत. पुरंदर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, पुरवठा निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता ही बाब उघड झाली आहे. या महिन्याची इतर स्वस्त धान्य दुकानदारांकडून खरेदी सुरू आहे. मात्र तूरडाळ बाहेरच्या बाजारापेक्षा महाग आहे. यामुळे मोठ्या नाखुशीनेच दुकानदार डाळ उचलत आहेत. दुकानदारांना भुर्दंड सोसावा लागणारस्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अशोक दळवी यांनी शासनाने बाहेरच्या बाजारभावापेक्षा कमी दराने तूरडाळ विक्रीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. या महिन्यापासून तालुक्यातील सर्वच दुकानदार तूरडाळ खरेदी करतील, पण ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळणार? हा प्रश्न आहे. ग्राहकांनी ती खरेदी न केल्यास तिचा भुर्दंड दुकानदारांनाच सोसावा लागणार आहे. एक तर ती दुकानदारांना खरेदी करण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यात ती विक्रीअभावी दुकानातच पडून राहणार असल्याने तालुक्यातील दुकानदारांतून मोठी नाराजी आहे. शासनाने याचा विचार करणे गरजेचे असल्याचेही दळवी यांनी म्हटले आहे.