शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तूरडाळ रेशन दुकानदारांच्या माथी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 01:47 IST

गगनाला भिडलेल्या डाळीच्या भावामुळे सरकारवर कडाडून टीका झाल्यावर सवलतीच्या दरात डाळ विक्रीचा निर्णय सरकारने घेतला.

पुणे : गगनाला भिडलेल्या डाळीच्या भावामुळे सरकारवर कडाडून टीका झाल्यावर सवलतीच्या दरात डाळ विक्रीचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार जिल्ह्यात १८३१ क्विंटल तूरडाळीचा पुरवठा गोदामातून करण्यात आला. मात्र बाजारामध्ये तूरचे भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने रेशन दुकानदार डाळ घेतली तर ती आपल्याच माथी पडणार असल्याने उचलण्यास चालढकल करीत आहेत. आतापर्यंत फक्त ८४.१ क्विंटल इतकाच साठा उचलला गेला आहे. उर्वरित डाळ तशीच पडून आहे. २१ जुलैच्या शासननिर्णयानुसार अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना प्रत्येकी एक किलो डाळ १०३ रुपयांनी विकण्याचे आदेश आहेत. जिल्ह्यात बीपीएल शिधापत्रिकाधारकांची संख्या १ लाख ३० हजार ६५८, तर अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ५२ हजार ८५० इतकी आहे. एकूण १ लाख ८३ हजार ५०८ लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी जिल्ह्यातील १५ गोदामांत १८३१ क्विंटल डाळ आली आहे. मात्र ती डाळ उचलण्यास रेशन दुकानदार तयार नाहीत. त्यात दुकानात डाळ न्यायची तर वाहनाचे भाडे परवडेल का? डाळीची गुणवत्ता चांगली असेल का? लाभार्थी ती घेतील का? बाजारात ९० ते ९५ रुपये किलोने डाळ विकली जात असल्याने ती पडून राहील का, असे प्रश्न त्यांच्यासमोर पडले आहेत. असे असले तरी कार्डधारकांच्या संख्येप्रमाणे त्यांना डाळ उचलावीच लागणार असून ती त्यांच्या माथी पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार तथा गोदाम व्यवस्थापक उत्तम बडे यांच्याशी संपर्क साधून असता आतापर्यंत ८४.१ क्विंटल डाळ दुकानदारांनी गोदामातून उचलली आहे. आमच्याकडे तशा काही तक्रारी नाहीत. तसेच कार्डधारकांच्या संख्येप्रमाणे ती त्या त्या दुकानदारांना घ्यावीच लागणार असल्याचे सांगितले. १०४०० किलो डाळ भोरच्या गोदामात पडून भोर : रेशनिंग दुकानापेक्षा खासगी दुकानदारांकडे स्वस्त आणि चांगल्या प्रतीची डाळ मिळत असल्याने भोर तालुक्यातील शासकीय गोदामाला सुमारे १०४ क्विंटल (१०४०० किलो) तूरडाळ पडून आहे. तालुक्यातील १५५ ग्रामपंचायतीमध्ये १९७ गावे असून १७० स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानात दारिद्र्यरेषेखाली व अंत्योदय योजनेत असलेल्या कुटुंबांना २ रु. किलोने स्वस्तात ३५ किलो धान्य दिले जाते. डाळीची किंमत १०३ रु. प्रतिकिलो आहे. हीच डाळ खासगी दुकानात चांगल्या प्रतीची ९० रु. किलोने मिळते. यामुळे नागरिक डाळ घेणार नाहीत. शिवाय एक पोते डाळ विकल्यावर रेशनिंग दुकानदाराला ७० रु. मिळणार आहेत. मात्र डाळीचा भाव अधिक असल्याने खपणार नसल्याने इतकी १०४०० किलो डाळ मागील महिनाभरापासून गोदामात पडून आहे. पुरंदरला १३८७६ किलो पडूनजेजुरी : पुरंदर तालुक्यातील गोदामात १३८७६ किलो तूरडाळ वाटपासाठी आली असून ती बाहेरच्या बाजारभावापेक्षा महाग असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांकडून डाळ उचलण्यास नाराजी व्यक्त होत आहे, नाइलाजास्तव दुकानदार ही डाळ उचलत आहेत. पुरंदर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, पुरवठा निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता ही बाब उघड झाली आहे. या महिन्याची इतर स्वस्त धान्य दुकानदारांकडून खरेदी सुरू आहे. मात्र तूरडाळ बाहेरच्या बाजारापेक्षा महाग आहे. यामुळे मोठ्या नाखुशीनेच दुकानदार डाळ उचलत आहेत. दुकानदारांना भुर्दंड सोसावा लागणारस्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अशोक दळवी यांनी शासनाने बाहेरच्या बाजारभावापेक्षा कमी दराने तूरडाळ विक्रीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. या महिन्यापासून तालुक्यातील सर्वच दुकानदार तूरडाळ खरेदी करतील, पण ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळणार? हा प्रश्न आहे. ग्राहकांनी ती खरेदी न केल्यास तिचा भुर्दंड दुकानदारांनाच सोसावा लागणार आहे. एक तर ती दुकानदारांना खरेदी करण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यात ती विक्रीअभावी दुकानातच पडून राहणार असल्याने तालुक्यातील दुकानदारांतून मोठी नाराजी आहे. शासनाने याचा विचार करणे गरजेचे असल्याचेही दळवी यांनी म्हटले आहे.