शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हवे साडेपाच हजार कोटी !

By admin | Updated: November 27, 2014 01:52 IST

निसर्ग कोपल्याने मराठवाडय़ातील तब्बल 48 लाख हेक्टर क्षेत्रवरील खरिपाचे पीक हातून गेले. लागवडही निघाली नाही. पाऊसच न झाल्याने रबी घेण्याचीही सोय राहिली नाही.

मराठवाडय़ातील दुष्काळ निवारण : 48 लाख हेक्टरवरील खरिपाचे नुकसान
सुनील कच्छवे - औरंगाबाद
निसर्ग कोपल्याने मराठवाडय़ातील तब्बल 48 लाख हेक्टर क्षेत्रवरील खरिपाचे पीक हातून गेले. लागवडही निघाली नाही. पाऊसच न झाल्याने रबी घेण्याचीही सोय राहिली नाही.  मराठवाडय़ाला या दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांची गरज आहे. 
 महसूल खात्याने नुकतीच विभागातील 8139 गावांची खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी जाहीर केली. यातील 8क्क्4 गावांची पैसेवारी पन्नासपेक्षा कमी आली आहे. या आकडेवारीने मराठवाडय़ाच्या दुष्काळावर शिक्कामोर्तब केले आहे. मराठवाडय़ात वार्षिक सरासरीच्या 53 टक्केच पाऊस झाला. त्यामुळे कापूस, सोयाबीन, मका पिकाचे उत्पादन 7क् टक्क्यांनी घटले. विभागात यावर्षी 5क् लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली.  त्यापैकी 48 लाख हेक्टरवरील पीक हातचे गेले. जमिनीत ओल नसल्यामुळे रबीचाही पेरा होऊ शकलेला नाही. खरीप आणि रबी अशी दोन्ही पिके गेल्यामुळे शेतक:याच्या हातात काहीच राहिले नाही. भूजल पातळीत मोठी घट झाल्याने शेकडो गावांमध्ये आतापासून तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.  महसूल विभागाच्या टंचाई निवारण कृती आराखडय़ानुसार मार्चअखेर्पयत सव्वा दोनशे कोटी लागणार असल्याचा अंदाज आहे. मार्चनंतर टंचाई परिस्थिती अधिकच गंभीर होणार आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यातही सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज आहे.
गारपीटग्रस्तांप्रमाणो निधी दिल्यास ़़़
यावर्षी झालेल्या गारपिटीमुळे 8 लाख 31 हजार हेक्टर क्षेत्रचे नुकसान झाले होत़े तेव्हा राज्य सरकारने 934 कोटी रुपयांची मदत दिली होती़ तर सध्या मराठवाडय़ात 48 लाख हेक्टरवरील खरिपाचे पीक हातचे गेले आह़े गारपीटग्रस्तांना मदत केली त्याप्रमाणो आर्थिक निकष ग्रा धरल्यास मराठवाडय़ाला दुष्काळ निवारणार्थ साडे पाच हजार कोटी रुपयांची गरज आह़े 
जनावरांचेही हाल
खरिपाचे नुकसान आणि रबीचा अत्यल्प पेरा यामुळे विभागात चारा टंचाईचे संकट घोंघावत आहे. मराठवाडय़ात एकूण 39 लाख 12 हजार मोठी आणि 12 लाख 51 हजार छोटी अशी जनावरे आहेत. या जनावरांना दरमहा 11.5 लाख मेट्रिक टन चारा लागतो. सध्याचा उपलब्ध चारा फेब्रुवारीर्पयतच पुरणार आहे. 
 
आघाडीकडून अडीच हजार कोटींची मदत
सातत्याने नैसर्गिक संकटात सापडलेल्या मराठवाडय़ातील शेतक:यांना गेल्या दोन वर्षात आघाडी सरकारकडून अडीच हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली. 2क्11 ला कापूस, सोयाबीन आणि धान पिकाचे नुकसान झाल्यामुळे 843 कोटी, 2क्13 मध्ये खरीप पिकाच्या नुकसानीपोटी 556 कोटी, त्यानंतर अतिवृष्टीमुळे 1क्1 कोटी आणि चालू वर्षी फेब्रुवारी- मार्च महिन्यांत झालेल्या गारपिटीचे नुकसानभरपाई म्हणून 934 कोटींची मदत देण्यात आली.  
 
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक
विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.  या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे तसेच राज्याचे मुख्य सचिव, तसेच कृषी, महसूल, पाणीपुरवठा आणि मदत व पुनर्वसन या विभागांचे प्रधान सचिव तसेच मराठवाडय़ातील विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री विभागातील आमदारांशी चर्चा करणार आहेत.