शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

हजारो कोटींची शिष्यवृत्ती संकटात

By admin | Updated: February 23, 2015 02:44 IST

२०११-१२ ते २०१४-१५ या चार वर्षांत शिष्यवृत्ती वाटप केलेल्या ४१ लाख २२ हजार ८८३ विद्यार्थ्यांमध्ये बहुसंख्य बोगस विद्यार्थी असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

अभिनय खोपडे, गडचिरोली२०११-१२ ते २०१४-१५ या चार वर्षांत शिष्यवृत्ती वाटप केलेल्या ४१ लाख २२ हजार ८८३ विद्यार्थ्यांमध्ये बहुसंख्य बोगस विद्यार्थी असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसे पुरावे शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या तपासात आढळून आले आहेत. आणखी २४ लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील बोगस विद्यार्थ्यांची संख्या ध्यानी घेता त्यांना ४ हजार ४२० कोटी रुपये अदा करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम वाटपाबाबत महाराष्ट्र सरकारचे कोणतेही धोरण नसल्याने बोगस संस्था मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मलिदा खात आहेत. मागील चार वर्षांत ६५ लाख ३३८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण विभागाकडे नावे नोंदविली. त्यापैकी प्रलंबित २३ लाख ७७ हजार ४५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २०१४-१५मध्ये ४ हजार ४२० कोटी रूपये लागणार आहे. केंद्र सरकारकडून येणारी शिष्यवृत्तीची रक्कम वर्षाच्या सुरूवातीलाच दिली जाते. ती पूर्ण खर्च झाली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार एवढी रक्कम कशी उभी करणार, हा प्रश्न आहे.गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या चौकशीतून बोगस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्याचे वास्तव पुढे आले आहे. उल्लेखनीय म्हणजे, केंद्र सरकारची ही भारत सरकार शिष्यवृत्ती अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाते. अनेक महाविद्यालयांनी अशाच प्रवर्गातील विद्यार्थ्यांची बोगस नावे नोंदवून त्यांची शिष्यवृत्ती स्वत:च घशात टाकली. त्यांनी बँक खातेही बनावट उघडले.