शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

हजारो कोटींची शिष्यवृत्ती संकटात

By admin | Updated: February 23, 2015 02:44 IST

२०११-१२ ते २०१४-१५ या चार वर्षांत शिष्यवृत्ती वाटप केलेल्या ४१ लाख २२ हजार ८८३ विद्यार्थ्यांमध्ये बहुसंख्य बोगस विद्यार्थी असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

अभिनय खोपडे, गडचिरोली२०११-१२ ते २०१४-१५ या चार वर्षांत शिष्यवृत्ती वाटप केलेल्या ४१ लाख २२ हजार ८८३ विद्यार्थ्यांमध्ये बहुसंख्य बोगस विद्यार्थी असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसे पुरावे शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या तपासात आढळून आले आहेत. आणखी २४ लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील बोगस विद्यार्थ्यांची संख्या ध्यानी घेता त्यांना ४ हजार ४२० कोटी रुपये अदा करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम वाटपाबाबत महाराष्ट्र सरकारचे कोणतेही धोरण नसल्याने बोगस संस्था मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मलिदा खात आहेत. मागील चार वर्षांत ६५ लाख ३३८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण विभागाकडे नावे नोंदविली. त्यापैकी प्रलंबित २३ लाख ७७ हजार ४५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २०१४-१५मध्ये ४ हजार ४२० कोटी रूपये लागणार आहे. केंद्र सरकारकडून येणारी शिष्यवृत्तीची रक्कम वर्षाच्या सुरूवातीलाच दिली जाते. ती पूर्ण खर्च झाली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार एवढी रक्कम कशी उभी करणार, हा प्रश्न आहे.गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या चौकशीतून बोगस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्याचे वास्तव पुढे आले आहे. उल्लेखनीय म्हणजे, केंद्र सरकारची ही भारत सरकार शिष्यवृत्ती अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाते. अनेक महाविद्यालयांनी अशाच प्रवर्गातील विद्यार्थ्यांची बोगस नावे नोंदवून त्यांची शिष्यवृत्ती स्वत:च घशात टाकली. त्यांनी बँक खातेही बनावट उघडले.