शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

हजारावर मजुरांनी सोडले गाव!

By admin | Updated: April 20, 2016 05:50 IST

कळंब तालुक्यातील शिराढोण या १६ हजार वस्तीच्या गावात जनावरांच्या चारा-पाण्यासह रोजगाराचाही प्रश्न गंभीर बनला आहे. गावात रोहयोची केवळ सहा कामे सुरू असून

राहुल ओमने, शिराढोण (जि. उस्मानाबाद)कळंब तालुक्यातील शिराढोण या १६ हजार वस्तीच्या गावात जनावरांच्या चारा-पाण्यासह रोजगाराचाही प्रश्न गंभीर बनला आहे. गावात रोहयोची केवळ सहा कामे सुरू असून, त्यावर १८० मजूर काम करीत आहेत. त्यामुळे येथील जवळपास ६०० तर लमाणतांडा वस्तीवरील ४०० मजुरांनी गाव सोडले आहे. त्यात युवकांचे प्रमाण अधिक आहे.मोठी बाजारपेठ असण्याबरोबरच जिल्ह्यात सर्वात मोठा तब्बल ५ हजार २०० हेक्टरचा शिवारही याच गावाचा आहे. गावात सुमारे तीन हजार शेतमालक आहेत. सोयाबीन हे नगदी पीक येथे केले जाते. तीन वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे शेतीचे गणित बिघडले आहे. एकरभर सोयाबीन पेरणीसाठी जवळपास २० हजारांचा खर्च येतो, परंतु चाळीस गुंठ्यात पन्नास ते साठ किलोचा उतारा आल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांचा खर्चही निघाला नाही. जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. येथील सुमारे दोन हजार जनावरांना दररोज १३ हजार ५९६ किलो चाऱ्याची आवश्यकता आहे. दरवर्षी सोयाबीन, भुस्कट व ज्वारीचा उपलब्ध होणारा कडबा यंदा खरीप व रबी हंगामही हातचा गेल्याने मिळाला नाही. चाऱ्याचा प्रश्न बिकट झाल्यानंतरही परिसरातील १५ गावांत एकही चारा छावणी सुरू झाली नाही. त्यामुळे पशुपालक जनावरे बेभाव विकत आहेत. रोहयोची १९२ रुपये प्रमाणे मिळणारी मजुरीही काही ठिकाणी मिळत नसल्याची तक्रार आहे.तीन एकर शेतीवर संपूर्ण कुटुंबाची उपजीविका चालते. तीन वर्षांपासून शेतीचा खर्चही न निघाल्याने आता भाजीपाला व्यवसाय सुरू केला. रोजचा खर्च भागविण्याएवढे उत्पन्न आता मिळत आहे. - मधुकर देशमुख, शेतकरीगतवर्षी सोयाबीनची दुबार पेरणी करूनही खर्च वाया गेला. पाणी नसल्याने बागायती पिके घेतली नाहीत. कुठे मजुरीचे कामही मिळत नाही. त्यामुळे कुटुंबाला दोन वेळचे खायला घालणेही मुश्कील होत आहे.- राजाभाऊ व्होनमाने, शेतकरी