शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

धान्य घोटाळ्याच्या तपासावर ताशेरे

By admin | Updated: November 9, 2016 05:55 IST

राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल झालेल्या वाडीवऱ्हे रेशन धान्य घोटाळ्याच्या तपासाबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी

नाशिक : राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल झालेल्या वाडीवऱ्हे रेशन धान्य घोटाळ्याच्या तपासाबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी ग्रामीण पोलिसांवर कडक ताशेरे ओढल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली आहे़ घोटाळ्याचा मास्टरमार्इंड जितूभाई ठक्कर पोलिसांना सापडत नसल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़उर्वरित चौघा संशयितांविरोधात महिनाभरात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे़ तपास अधिकाऱ्यांनी आॅक्टोबरमध्ये घोटी येथील संशयित दीपक श्रीश्रीमाळ व अन्य एकास अटक केली होती़ त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली़ मात्र, नंतर श्रीश्रीमाळ यास कोर्टात हजर केल्यानंतर तपासात प्रगती न आढळल्याने तसेच दोषारोपपत्र दाखल केले. परंतु काही महत्त्वाची कागदपत्रे तसेच मुद्देमाल हजर न केल्याबाबत न्यायालयाने तपास पद्धतीवर चांगलेच ताशेरे ओढले होते़ संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर संबंधित तपास अधिकारी वैद्यकीय रजेवर गेल्याने तपास पुन्हादुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे़ जितूभाई ठक्करकडून माल घेणे व त्याच्या बँक अकाउंटमधून पैसे काढण्याचे काम श्रीश्रीमाळ करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे़ ठक्कर १७ महिन्यांपासून फरार आहे. त्याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला असून संथपणे तपास करून पोलीस त्यास अप्रत्यक्षपणे मदत करीत असल्याची चर्चा आहे़पोलिसांनी संशयित अरुण घोरपडे, संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर, काशीनाथ पाटील, ज्ञानेश्वर घुले, धरमसिंग पटेल, जितेंद्र ठक्कर, पूनम होळकर, गुदामपाल संजय कचरू वामन,अश्विन जैन व प्रकाश शेवाळे असे एकूण १३ आरोपी निश्चित केले आहेत. (प्रतिनिधी)