शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

मराठवाड्यातील १२00 गावे तहानली

By admin | Updated: June 14, 2014 04:49 IST

पावसाळ्याच्या तोंडावर मराठवाड्यातील पाणीटंचाईने अधिकच भीषण स्वरूप धारण केले आहे.

औरंगाबाद : पावसाळ्याच्या तोंडावर मराठवाड्यातील पाणीटंचाईने अधिकच भीषण स्वरूप धारण केले आहे. विभागातील बाराशेपेक्षा जास्त गावे सध्या पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. यापैकी सहाशे गावांना ५०३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उर्वरित सहाशे गावांना जवळपासच्या भागातील विहिरी अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.मराठवाड्यात यंदा जानेवारी महिन्यापासूनच कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. सुरुवातीला औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यांतील काही गावांनाच टंचाईचे चटके बसत होते. मात्र, हळूहळू टंचाईने भीषण स्वरूप धारण केले. मे महिन्यात विभागातील सर्व आठही जिल्ह्यांमध्ये ही टंचाई जाणवू लागली. आता जून महिन्यात तर ही टंचाई आणखीच वाढली आहे. मागील आठवड्यापर्यंत विभागात ९५० गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत होती. चालू आठवड्यात यामध्ये आणखी अडीचशे गावांची भर पडली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्याही मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात ४६ ने वाढली आहे. सद्य:स्थितीत विभागातील ६०९ गावांना ५०३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २२२ टँकर सुरू आहेत, तर सर्वांत कमी १ टँकर हिंगोली जिल्ह्यात सुरू आहे. परभणी जिल्ह्यात अद्याप एकही टँकर सुरू करण्याची गरज भासलेली नाही.