शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

'त्या' तिघींनी केला 100 रुपयांत गोव्याचा प्रवास

By admin | Updated: January 10, 2017 17:23 IST

इशिका राय, हिना वासनानी आणि सुकन्या शर्मा यांनी नऊ दिवसांत रस्ते प्रवास करत गोवा गाठलं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - गोव्याचा प्रवास तोही 100 रुपयांत ऐकून अचंबित झालात ना ! मात्र, तीन मुलींनी हा प्रवास सहजशक्य करून दाखवला आहे. इशिका राय, हिना वासनानी आणि सुकन्या शर्मा यांनी नऊ दिवसांत रस्ते प्रवास करत गोवा गाठलं आहे. विशेष म्हणजे प्रत्येक दिवसाला फक्त 100 रुपये खर्च करण्याचं या तिघींनी नियोजन केलं होतं. गेल्या काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दिल चाहता है या सिनेमापासून प्रेरणा घेऊन या तिघींनी हा प्रवास केल्याची चर्चा आहे. दरम्यान, 23 वर्षांची सुकन्या शर्मा ही मुक्त लेखिका असून, स्कूबा ड्रायव्हर आहे. ती मूळची आग्र्याची असून, मुंबईला जाण्यापूर्वी ती पुणे आणि जयपूरला वास्तव्याला होती. तर 29 वर्षीय हिना वासनानी ही उदयपूरची असून, ती 2010ला ती मुंबईत आली. ती लहान चित्रपट निर्माती आहे. तसेच तिला साहसी क्रीडा प्रकार आवडतात. 35 वर्षीय इशिका राय ही कोलकात्याहून आली असून, पुण्यातल्या मायो कॉलेजमधून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ती सध्या आर्किटेक्ट आहे. इशिकानं यापूर्वी दिल्लीचा रस्ते प्रवास केल्याची माहिती दिली आहे. तीन वर्षांपूर्वी मी 14 रस्त्यांवरून प्रवास केले आहेत. मला रस्ते प्रवास खूप आवडत असल्याचंही तिने सांगितलं आहे. रस्ते प्रवासात शेवटच्या मिनिटाला आमचा कार्यक्रम बदलत असे. आम्हाला कोणतेच नियम पाळावे लागले नव्हते.   हिनामुळेच सुकन्या आणि इशिकाची ओळख झाली होती. सुकन्या म्हणाली, मी मुक्त लेखिका असल्यानं मला बाहेर फिरण्याची संधी मिळत होती. हिना आणि मी ब-याच ठिकाणी फिरलो. त्यानंतर हिनाच्या डोक्यातून या रस्ते प्रवासाची कल्पना आली. या प्रवासासाठी घरच्यांचाही विरोध होता. रस्ते प्रवास करणं ही आमची आवड आहे, असं हीनानं सांगितलं आहे. तर प्रवासात आम्हाला जास्तच मोकळेपणाने वेगवेगळ्या लोकांना भेटता आले. आम्हाला कमी खर्चात हा प्रवास करणं साधता आल्याचंही इशिकानं सांगितलं. आमचा बजेट प्रतिदिन 500 ते 1000 रुपयांपर्यंत वाढवण्याचाही काही मैत्रिणींनी सल्ला दिला, मात्र आम्ही कमी बजेटमध्येच प्रवास करण्याचा निश्चय केला होता, असं हिना म्हणाली.

दरम्यान, सुकन्या म्हणाली, प्रवासादरम्यान जास्त भार होऊ नये म्हणून आम्ही फारच थोडे कपडे सोबत घेतले होते. एकदा आम्ही कारनं जाण्याचाही निर्णय घेतला, मात्र त्यानंतर चालत जाण्यावर आमचं एकमत झालं. तसेच आम्ही पहिला थांबा अलिबागला घेतला. त्यानंतर मुरुड जंजिरा, हरिहरेश्वर, दापोली, गुहागर, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला आणि नंतर गोव्यात दाखल झालो. त्यानंतर गोव्याला पोहोचल्यावर आम्ही दोन दिवस आराम केला, असं हीनानं सांगितलं आहे.