शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

'त्या' तिघींनी केला 100 रुपयांत गोव्याचा प्रवास

By admin | Updated: January 10, 2017 17:23 IST

इशिका राय, हिना वासनानी आणि सुकन्या शर्मा यांनी नऊ दिवसांत रस्ते प्रवास करत गोवा गाठलं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - गोव्याचा प्रवास तोही 100 रुपयांत ऐकून अचंबित झालात ना ! मात्र, तीन मुलींनी हा प्रवास सहजशक्य करून दाखवला आहे. इशिका राय, हिना वासनानी आणि सुकन्या शर्मा यांनी नऊ दिवसांत रस्ते प्रवास करत गोवा गाठलं आहे. विशेष म्हणजे प्रत्येक दिवसाला फक्त 100 रुपये खर्च करण्याचं या तिघींनी नियोजन केलं होतं. गेल्या काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दिल चाहता है या सिनेमापासून प्रेरणा घेऊन या तिघींनी हा प्रवास केल्याची चर्चा आहे. दरम्यान, 23 वर्षांची सुकन्या शर्मा ही मुक्त लेखिका असून, स्कूबा ड्रायव्हर आहे. ती मूळची आग्र्याची असून, मुंबईला जाण्यापूर्वी ती पुणे आणि जयपूरला वास्तव्याला होती. तर 29 वर्षीय हिना वासनानी ही उदयपूरची असून, ती 2010ला ती मुंबईत आली. ती लहान चित्रपट निर्माती आहे. तसेच तिला साहसी क्रीडा प्रकार आवडतात. 35 वर्षीय इशिका राय ही कोलकात्याहून आली असून, पुण्यातल्या मायो कॉलेजमधून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ती सध्या आर्किटेक्ट आहे. इशिकानं यापूर्वी दिल्लीचा रस्ते प्रवास केल्याची माहिती दिली आहे. तीन वर्षांपूर्वी मी 14 रस्त्यांवरून प्रवास केले आहेत. मला रस्ते प्रवास खूप आवडत असल्याचंही तिने सांगितलं आहे. रस्ते प्रवासात शेवटच्या मिनिटाला आमचा कार्यक्रम बदलत असे. आम्हाला कोणतेच नियम पाळावे लागले नव्हते.   हिनामुळेच सुकन्या आणि इशिकाची ओळख झाली होती. सुकन्या म्हणाली, मी मुक्त लेखिका असल्यानं मला बाहेर फिरण्याची संधी मिळत होती. हिना आणि मी ब-याच ठिकाणी फिरलो. त्यानंतर हिनाच्या डोक्यातून या रस्ते प्रवासाची कल्पना आली. या प्रवासासाठी घरच्यांचाही विरोध होता. रस्ते प्रवास करणं ही आमची आवड आहे, असं हीनानं सांगितलं आहे. तर प्रवासात आम्हाला जास्तच मोकळेपणाने वेगवेगळ्या लोकांना भेटता आले. आम्हाला कमी खर्चात हा प्रवास करणं साधता आल्याचंही इशिकानं सांगितलं. आमचा बजेट प्रतिदिन 500 ते 1000 रुपयांपर्यंत वाढवण्याचाही काही मैत्रिणींनी सल्ला दिला, मात्र आम्ही कमी बजेटमध्येच प्रवास करण्याचा निश्चय केला होता, असं हिना म्हणाली.

दरम्यान, सुकन्या म्हणाली, प्रवासादरम्यान जास्त भार होऊ नये म्हणून आम्ही फारच थोडे कपडे सोबत घेतले होते. एकदा आम्ही कारनं जाण्याचाही निर्णय घेतला, मात्र त्यानंतर चालत जाण्यावर आमचं एकमत झालं. तसेच आम्ही पहिला थांबा अलिबागला घेतला. त्यानंतर मुरुड जंजिरा, हरिहरेश्वर, दापोली, गुहागर, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला आणि नंतर गोव्यात दाखल झालो. त्यानंतर गोव्याला पोहोचल्यावर आम्ही दोन दिवस आराम केला, असं हीनानं सांगितलं आहे.