शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

'त्या' आदिवासी तरुणींचा खळबळजनक खुलासा

By admin | Updated: January 30, 2017 19:11 IST

दोन आदिवासी तरुणींनी त्यांच्यावर पोलिसांनी अत्याचार केला नाही

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 30 - कांकेर (छत्तीसगड) येथील संबंधित दोन आदिवासी तरुणींनी त्यांच्यावर पोलिसांनी अत्याचार केला नाही, असा खळबळजनक खुलासा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला. सैनू व शीला गोटा या दाम्पत्याने खोटे बोलायला लावले होते, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. परिणामी न्यायालयाने दोन्ही तरुणींना त्यांच्या भाऊ व काकाच्या स्वाधीन करून हवे तेथे जाण्याची मुभा दिली आणि पोलिसांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्यास मनाई केली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सुरुवातीला खुल्या न्यायालयात प्रकरण ऐकण्यात आले. दरम्यान, संबंधित तरुणींचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेता इन चेंबर सुनावणी घेण्यात आली. तरुणींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. तरुणींना हिंदी, मराठी व इंग्रजी यापैकी कोणतीही भाषा येत नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या बोली भाषेमध्ये पोलिसांनी अत्याचार केला नाही, गोटा दाम्पत्याने आम्हाला खोटे बोलायला लावले असे सांगितले. वकिलाने ही माहिती इंग्रजीमध्ये न्यायालयाला दिली. दोन्ही तरुणी सुरक्षित असल्याने व त्यांनी केलेल्या खुलाशामुळे प्रकरणातील मूळ मुद्दे नष्ट होऊन संबंधित दोन्ही याचिका निरर्थक ठरल्या. परिणामी याचिका निकाली काढण्यात आल्या. अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी तरुणींना न्यायालयात हजर करण्यासाठी तर, तरुणींच्या एका नातेवाईकाने दोषी पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यासाठी याचिका दाखल केली होती. गडचिरोली पोलिसांनी सीताबर्डी पोलिसांच्या सहकार्याने गेल्या शनिवारी तरुणींसह गोटा दाम्पत्याला अ‍ॅड. राठोड यांच्या कार्यालयातून वादग्रस्तरीत्या ताब्यात घेतले होते. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता रविवारी सुटीच्या दिवशी अ‍ॅड. राठोड यांची याचिका ऐकून तरुणींना शासकीय सुधारगृहात ठेवण्याचा आणि पोलिसांनी त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, असा अंतरिम आदेश दिला होता. याचिकाकर्त्यांतर्फे मुंबईतील वरिष्ठ वकील गायत्री सिंग व अ‍ॅड. निहालसिंग राठोड तर, शासनातर्फे अ‍ॅड. शिशिर उके यांनी कामकाज पाहिले.-----------------------असे आहे प्रकरणगडचिरोली जिल्ह्यतील हिदूर (एटापल्ली) जंगलात २० जानेवारी रोजी रात्री पोलीस व नक्षलींची चकमक उडाली होती. दरम्यान, पोलिसांना या परिसरात संबंधित तरुणी संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्या रात्री जंगलातच आश्रय घेतला. त्यावेळी पोलिसांनी तरुणींवर अत्याचार केला, असा गोटा दाम्पत्याचा आरोप होता. पोलिसांच्या दाव्यानुसार, त्यांनी २३ जानेवारी रोजी दोन्ही तरुणींची वैद्यकीय तपासणी केली. त्यात अत्याचार झाल्याचे आढळले नाही. पोलीस गोटा दाम्पत्यावर पाळत ठेवून होते. ते तरुणींसह अ‍ॅड. राठोड यांच्या कार्यालयात गेल्याची माहिती खबऱ्याने देताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.