शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

'त्या' आदिवासी तरुणींचा खळबळजनक खुलासा

By admin | Updated: January 30, 2017 19:11 IST

दोन आदिवासी तरुणींनी त्यांच्यावर पोलिसांनी अत्याचार केला नाही

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 30 - कांकेर (छत्तीसगड) येथील संबंधित दोन आदिवासी तरुणींनी त्यांच्यावर पोलिसांनी अत्याचार केला नाही, असा खळबळजनक खुलासा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला. सैनू व शीला गोटा या दाम्पत्याने खोटे बोलायला लावले होते, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. परिणामी न्यायालयाने दोन्ही तरुणींना त्यांच्या भाऊ व काकाच्या स्वाधीन करून हवे तेथे जाण्याची मुभा दिली आणि पोलिसांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्यास मनाई केली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सुरुवातीला खुल्या न्यायालयात प्रकरण ऐकण्यात आले. दरम्यान, संबंधित तरुणींचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेता इन चेंबर सुनावणी घेण्यात आली. तरुणींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. तरुणींना हिंदी, मराठी व इंग्रजी यापैकी कोणतीही भाषा येत नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या बोली भाषेमध्ये पोलिसांनी अत्याचार केला नाही, गोटा दाम्पत्याने आम्हाला खोटे बोलायला लावले असे सांगितले. वकिलाने ही माहिती इंग्रजीमध्ये न्यायालयाला दिली. दोन्ही तरुणी सुरक्षित असल्याने व त्यांनी केलेल्या खुलाशामुळे प्रकरणातील मूळ मुद्दे नष्ट होऊन संबंधित दोन्ही याचिका निरर्थक ठरल्या. परिणामी याचिका निकाली काढण्यात आल्या. अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी तरुणींना न्यायालयात हजर करण्यासाठी तर, तरुणींच्या एका नातेवाईकाने दोषी पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यासाठी याचिका दाखल केली होती. गडचिरोली पोलिसांनी सीताबर्डी पोलिसांच्या सहकार्याने गेल्या शनिवारी तरुणींसह गोटा दाम्पत्याला अ‍ॅड. राठोड यांच्या कार्यालयातून वादग्रस्तरीत्या ताब्यात घेतले होते. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता रविवारी सुटीच्या दिवशी अ‍ॅड. राठोड यांची याचिका ऐकून तरुणींना शासकीय सुधारगृहात ठेवण्याचा आणि पोलिसांनी त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, असा अंतरिम आदेश दिला होता. याचिकाकर्त्यांतर्फे मुंबईतील वरिष्ठ वकील गायत्री सिंग व अ‍ॅड. निहालसिंग राठोड तर, शासनातर्फे अ‍ॅड. शिशिर उके यांनी कामकाज पाहिले.-----------------------असे आहे प्रकरणगडचिरोली जिल्ह्यतील हिदूर (एटापल्ली) जंगलात २० जानेवारी रोजी रात्री पोलीस व नक्षलींची चकमक उडाली होती. दरम्यान, पोलिसांना या परिसरात संबंधित तरुणी संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्या रात्री जंगलातच आश्रय घेतला. त्यावेळी पोलिसांनी तरुणींवर अत्याचार केला, असा गोटा दाम्पत्याचा आरोप होता. पोलिसांच्या दाव्यानुसार, त्यांनी २३ जानेवारी रोजी दोन्ही तरुणींची वैद्यकीय तपासणी केली. त्यात अत्याचार झाल्याचे आढळले नाही. पोलीस गोटा दाम्पत्यावर पाळत ठेवून होते. ते तरुणींसह अ‍ॅड. राठोड यांच्या कार्यालयात गेल्याची माहिती खबऱ्याने देताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.