शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
2
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
3
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
4
आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात किती आहे नवे दर?
5
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
6
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
7
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
8
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
9
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
10
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
11
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
12
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
13
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
14
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
15
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
16
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
17
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
18
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
19
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
20
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं

'त्या' आदिवासी तरुणींचा खळबळजनक खुलासा

By admin | Updated: January 30, 2017 19:11 IST

दोन आदिवासी तरुणींनी त्यांच्यावर पोलिसांनी अत्याचार केला नाही

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 30 - कांकेर (छत्तीसगड) येथील संबंधित दोन आदिवासी तरुणींनी त्यांच्यावर पोलिसांनी अत्याचार केला नाही, असा खळबळजनक खुलासा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला. सैनू व शीला गोटा या दाम्पत्याने खोटे बोलायला लावले होते, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. परिणामी न्यायालयाने दोन्ही तरुणींना त्यांच्या भाऊ व काकाच्या स्वाधीन करून हवे तेथे जाण्याची मुभा दिली आणि पोलिसांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्यास मनाई केली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सुरुवातीला खुल्या न्यायालयात प्रकरण ऐकण्यात आले. दरम्यान, संबंधित तरुणींचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेता इन चेंबर सुनावणी घेण्यात आली. तरुणींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. तरुणींना हिंदी, मराठी व इंग्रजी यापैकी कोणतीही भाषा येत नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या बोली भाषेमध्ये पोलिसांनी अत्याचार केला नाही, गोटा दाम्पत्याने आम्हाला खोटे बोलायला लावले असे सांगितले. वकिलाने ही माहिती इंग्रजीमध्ये न्यायालयाला दिली. दोन्ही तरुणी सुरक्षित असल्याने व त्यांनी केलेल्या खुलाशामुळे प्रकरणातील मूळ मुद्दे नष्ट होऊन संबंधित दोन्ही याचिका निरर्थक ठरल्या. परिणामी याचिका निकाली काढण्यात आल्या. अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी तरुणींना न्यायालयात हजर करण्यासाठी तर, तरुणींच्या एका नातेवाईकाने दोषी पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यासाठी याचिका दाखल केली होती. गडचिरोली पोलिसांनी सीताबर्डी पोलिसांच्या सहकार्याने गेल्या शनिवारी तरुणींसह गोटा दाम्पत्याला अ‍ॅड. राठोड यांच्या कार्यालयातून वादग्रस्तरीत्या ताब्यात घेतले होते. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता रविवारी सुटीच्या दिवशी अ‍ॅड. राठोड यांची याचिका ऐकून तरुणींना शासकीय सुधारगृहात ठेवण्याचा आणि पोलिसांनी त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, असा अंतरिम आदेश दिला होता. याचिकाकर्त्यांतर्फे मुंबईतील वरिष्ठ वकील गायत्री सिंग व अ‍ॅड. निहालसिंग राठोड तर, शासनातर्फे अ‍ॅड. शिशिर उके यांनी कामकाज पाहिले.-----------------------असे आहे प्रकरणगडचिरोली जिल्ह्यतील हिदूर (एटापल्ली) जंगलात २० जानेवारी रोजी रात्री पोलीस व नक्षलींची चकमक उडाली होती. दरम्यान, पोलिसांना या परिसरात संबंधित तरुणी संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्या रात्री जंगलातच आश्रय घेतला. त्यावेळी पोलिसांनी तरुणींवर अत्याचार केला, असा गोटा दाम्पत्याचा आरोप होता. पोलिसांच्या दाव्यानुसार, त्यांनी २३ जानेवारी रोजी दोन्ही तरुणींची वैद्यकीय तपासणी केली. त्यात अत्याचार झाल्याचे आढळले नाही. पोलीस गोटा दाम्पत्यावर पाळत ठेवून होते. ते तरुणींसह अ‍ॅड. राठोड यांच्या कार्यालयात गेल्याची माहिती खबऱ्याने देताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.