शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

‘त्या’ शेतकऱ्यांच्या पाल्यांचे श्रमदान

By admin | Updated: April 10, 2017 03:33 IST

भारतीय जैन संघटना व पाणी फाउंडेशन यांच्यावतीने देशाला दिशा देणारा उपक्रम राबविण्यात येत

खुलताबाद (जि. औरंगाबाद) : भारतीय जैन संघटना व पाणी फाउंडेशन यांच्यावतीने देशाला दिशा देणारा उपक्रम राबविण्यात येत असून श्रमदानातून ४५ दिवसांत तालुक्यातील गोळेगाव दुष्काळमुक्त होणार आहे. रविवारी महावीर जयंतीच्या दिवशी याचा शुभारंभ करण्यात आला. येथील डोंगर परिसरात ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी रविवारी पहाटे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ६५० मुले- मुली दाखल झाले. त्यांनी पहाटेपासून पाणी अडवा, पाणी जिरवाची तसेच पाणलोटची कामे केली.अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनने ‘वॉटर कप’ स्पर्धा ठेवली आहे. या स्पर्धेत राज्यातील ३० तालुक्यांना सहभागी करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील ३७ गावांचा तर फुलंब्री तालुक्यातील ५४ गावांचा यात समावेश आहे. याअंतर्गत वाहून जाणारे पाणी अडवून गावातील पाणीपातळी वाढविण्यात येणार आहे. ही सर्व कामे श्रमदानातून करायची असून श्रमदान झाल्यानंतर भारतीय जैन संघटना मशिनरी पुरविणार आहे. संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, गौतम संचेती, प्रफुल्ल पारख, आ. प्रशांत बंब, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, डॉ. विजयकुमार फड, कृषी अधीक्षक पडवळ, सुरेश बेदमुथा, सत्यमेव जयतेचे संचालक सत्यमेव भटकर आदींनी येथे भेट देऊन झालेल्या कामाचे कौतुक केले. (प्रतिनिधी)२३ तारखेला औसा तालुक्यात श्रमदानशांतीलाल मुथा म्हणाले की, देशात व राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे कुठे नुकसान किंवा हानी झाली तेथे जैन संघटना २४ तासांत पोहोचून मदत करते. जैन संघटनेने मेळघाट व ठाण्यातील आदिवासी मुलांना शिक्षण देऊन प्रवाहात आणले. गोळेगावप्रमाणेच २३ तारखेला लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात श्रमदानाचे काम सुरू होणार आहे.