शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

‘त्या’ शेतकऱ्यांच्या पाल्यांचे श्रमदान

By admin | Updated: April 10, 2017 03:33 IST

भारतीय जैन संघटना व पाणी फाउंडेशन यांच्यावतीने देशाला दिशा देणारा उपक्रम राबविण्यात येत

खुलताबाद (जि. औरंगाबाद) : भारतीय जैन संघटना व पाणी फाउंडेशन यांच्यावतीने देशाला दिशा देणारा उपक्रम राबविण्यात येत असून श्रमदानातून ४५ दिवसांत तालुक्यातील गोळेगाव दुष्काळमुक्त होणार आहे. रविवारी महावीर जयंतीच्या दिवशी याचा शुभारंभ करण्यात आला. येथील डोंगर परिसरात ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी रविवारी पहाटे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ६५० मुले- मुली दाखल झाले. त्यांनी पहाटेपासून पाणी अडवा, पाणी जिरवाची तसेच पाणलोटची कामे केली.अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनने ‘वॉटर कप’ स्पर्धा ठेवली आहे. या स्पर्धेत राज्यातील ३० तालुक्यांना सहभागी करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील ३७ गावांचा तर फुलंब्री तालुक्यातील ५४ गावांचा यात समावेश आहे. याअंतर्गत वाहून जाणारे पाणी अडवून गावातील पाणीपातळी वाढविण्यात येणार आहे. ही सर्व कामे श्रमदानातून करायची असून श्रमदान झाल्यानंतर भारतीय जैन संघटना मशिनरी पुरविणार आहे. संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, गौतम संचेती, प्रफुल्ल पारख, आ. प्रशांत बंब, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, डॉ. विजयकुमार फड, कृषी अधीक्षक पडवळ, सुरेश बेदमुथा, सत्यमेव जयतेचे संचालक सत्यमेव भटकर आदींनी येथे भेट देऊन झालेल्या कामाचे कौतुक केले. (प्रतिनिधी)२३ तारखेला औसा तालुक्यात श्रमदानशांतीलाल मुथा म्हणाले की, देशात व राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे कुठे नुकसान किंवा हानी झाली तेथे जैन संघटना २४ तासांत पोहोचून मदत करते. जैन संघटनेने मेळघाट व ठाण्यातील आदिवासी मुलांना शिक्षण देऊन प्रवाहात आणले. गोळेगावप्रमाणेच २३ तारखेला लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात श्रमदानाचे काम सुरू होणार आहे.