शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

‘त्या’ शेतकऱ्यांच्या पाल्यांचे श्रमदान

By admin | Updated: April 10, 2017 03:33 IST

भारतीय जैन संघटना व पाणी फाउंडेशन यांच्यावतीने देशाला दिशा देणारा उपक्रम राबविण्यात येत

खुलताबाद (जि. औरंगाबाद) : भारतीय जैन संघटना व पाणी फाउंडेशन यांच्यावतीने देशाला दिशा देणारा उपक्रम राबविण्यात येत असून श्रमदानातून ४५ दिवसांत तालुक्यातील गोळेगाव दुष्काळमुक्त होणार आहे. रविवारी महावीर जयंतीच्या दिवशी याचा शुभारंभ करण्यात आला. येथील डोंगर परिसरात ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी रविवारी पहाटे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ६५० मुले- मुली दाखल झाले. त्यांनी पहाटेपासून पाणी अडवा, पाणी जिरवाची तसेच पाणलोटची कामे केली.अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनने ‘वॉटर कप’ स्पर्धा ठेवली आहे. या स्पर्धेत राज्यातील ३० तालुक्यांना सहभागी करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील ३७ गावांचा तर फुलंब्री तालुक्यातील ५४ गावांचा यात समावेश आहे. याअंतर्गत वाहून जाणारे पाणी अडवून गावातील पाणीपातळी वाढविण्यात येणार आहे. ही सर्व कामे श्रमदानातून करायची असून श्रमदान झाल्यानंतर भारतीय जैन संघटना मशिनरी पुरविणार आहे. संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, गौतम संचेती, प्रफुल्ल पारख, आ. प्रशांत बंब, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, डॉ. विजयकुमार फड, कृषी अधीक्षक पडवळ, सुरेश बेदमुथा, सत्यमेव जयतेचे संचालक सत्यमेव भटकर आदींनी येथे भेट देऊन झालेल्या कामाचे कौतुक केले. (प्रतिनिधी)२३ तारखेला औसा तालुक्यात श्रमदानशांतीलाल मुथा म्हणाले की, देशात व राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे कुठे नुकसान किंवा हानी झाली तेथे जैन संघटना २४ तासांत पोहोचून मदत करते. जैन संघटनेने मेळघाट व ठाण्यातील आदिवासी मुलांना शिक्षण देऊन प्रवाहात आणले. गोळेगावप्रमाणेच २३ तारखेला लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात श्रमदानाचे काम सुरू होणार आहे.