शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

थोर विचारवंत, पत्रकार गमावला : राज्यपाल

By admin | Updated: January 20, 2016 02:31 IST

डॉ. अरुण टिकेकर हे व्यासंगी अभ्यासक, इतिहासकार आणि उत्कृष्ट पत्रकार होते. इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते व त्यांच्या लिखाणातून त्यांच्या व्यासंगाची तसेच बहुश्रुतपणाची प्रचिती येत असे

मुंबई : डॉ. अरुण टिकेकर हे व्यासंगी अभ्यासक, इतिहासकार आणि उत्कृष्ट पत्रकार होते. इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते व त्यांच्या लिखाणातून त्यांच्या व्यासंगाची तसेच बहुश्रुतपणाची प्रचिती येत असे. टिकेकर यांच्या निधनाने राज्याने थोर विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार गमावला आहे. अशा शब्दांमध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. टिकेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अरुण टिकेकर यांच्या निधनामुळे अनेक नामवंतांनी दु:ख व्यक्त केले आहे.डॉ. टिकेकर यांच्या निधनाने व्यासंगी पत्रकार आणि माहिती व संशोधनपूर्ण लिखाण करणारा अभ्यासक गमाविला, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. डॉ. टिकेकर यांच्या निधनाने मुंबई विद्यापीठाने एक सुहृद सल्लागार आणि स्नेही गमावला आहे, याचे मला आणि विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, संशोधक यांना तीव्र दु:ख होत आहे, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. कायम जाणीव राहीलअरुण टिकेकर यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक सव्यसाची आणि विचारवंत संपादक मिळाले होते. ‘फास्ट फॉरवर्ड’ या माझ्या संग्रहाच्या निमित्ताने त्यांच्या बरोबर विविध चर्चा व्हायची. महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेत त्यांनी परिश्रमपूर्वक स्थान मिळवले होते. त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव पुढील पिढ्यांनासुद्धा राहील.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी अभ्यासू वृत्तीचा विचारवंतएक गंभीर व अभ्यासू विचारवंत, सव्यसाची लेखक, १९व्या शतकाचे गाढे अभ्यासक, निर्भीड पण संयमी संपादक व सारे आयुष्य आपली विद्यार्थीदशा जोपासलेले विद्यार्थी ही अरु ण टिकेकरांची महाराष्ट्रास असलेली ओळख आहे. ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘लोकमत’ या तीनही मोठ्या मराठी दैनिकांचे संपादक राहिल्याचा मान त्यांच्या गाठीशी आहे. ग्रंथकार, ग्रंथालयाचे संचालक आणि अतिशय निर्मळ व स्वच्छ मनाचा माणूस अशीही त्यांची ओळख साऱ्यांना आहे. त्यांचा व ‘लोकमत’चा संबंध त्या दोहोंचीही ऊर्जा, प्रतिष्ठा व लोकप्रियता उंचावणारा ठरला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका जाणत्या विचारवंताला मुकला आहे. - खा. विजय दर्डापत्रकारितेचे मोठे नुकसानपत्रकारितेच्या बदलत्या स्थित्यंतराचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने मुंबई व महाराष्ट्राच्या इतिहासाचा जाणकार हरपला आहे. - अरुण साधू, ज्येष्ठ पत्रकारव्यासंगी पत्रकार : ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांनी वेळोवेळी होत असलेल्या सामाजिक बदलांना आपल्या लेखणीतून अधोरेखित केले. पत्रकारितेची मूल्ये जपणारे आणि लेखणीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न मांडणारे व्यासंगी पत्रकार हरपले आहेत. - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्रीनिर्भीड, नि:ष्पक्ष पत्रकार : अरुण टिकेकर यांच्या निधनामुळे एक निर्भीड व नि:पक्ष पत्रकार, तसेच लोकांशी थेट जुळलेले एक अभ्यासू विचारवंत हरपले आहेत. टिकेकर यांच्या निधनामुळे वैचारिक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. - राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते विधानसभाअसामान्य प्रतिभेचा विचारवंत मराठी पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील असामान्य प्रतिभा लाभलेले विचारवंत लेखक आपल्यातून निघून गेले आहेत. मराठी व इंग्रजी साहित्य यावर टिकेकरांचे विशेष प्रभुत्व होते. महाराष्ट्र व मुंबईच्या इतिहासाविषयी त्यांचा गाढा अभ्यास होता. आज टिकेकर या जगात नाहीत, परंतु लढवय्या पत्रकार, संपादक म्हणून ते अजरामर राहतील.- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री