शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात तीस हजार वृक्षलागवड

By admin | Updated: July 2, 2016 03:03 IST

शहरीकरणामुळे होणाऱ्या विकासापाठोपाठ पर्यावरणाचा ऱ्हास होत असून वृक्षछाटणीचे प्रमाण वाढले आहे.

नवी मुंबई : शहरीकरणामुळे होणाऱ्या विकासापाठोपाठ पर्यावरणाचा ऱ्हास होत असून वृक्षछाटणीचे प्रमाण वाढले आहे. राज्य शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्र मात शुक्रवारी नवी मुंबई महानगरपालिका, सामाजिक संस्था, शासकीय इमारती, शाळा-महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे तसेच या हरितसंपत्तीचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक विभागात वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यात आली. हवामान, पाण्याची उपलब्धता व भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन प्रदूषण नियंत्रणासाठी, शहर सौंदर्यीकरणासाठी व जल संवर्धनासाठी सावली देणाऱ्या आणि फळ-फळावळ देणाऱ्या वृक्ष प्रजाती, ज्यामध्ये प्रामुख्याने आंबा, चिंच, आवळा, कवठ, काजू, फणस, वड, पिंपळ, निम, पळस, गुलमोहर, बांबू, बोर, चाफा आदी रोपांची लागवड करण्यात आली. या कार्यक्र मासाठी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि सुदृढ रोपे महानगरपालिका, सामाजिक वनीकरण विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली. रबाळे येथील मुंब्रादेवी डोंगरावर राजर्षी शाहू महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत एक हजारहून अधिक वृक्षरोपे लावली. उपमहापौर अविनाश लाड यांनी वाशी मिनी सी शोअर परिसरात, सभागृह नेते जयवंत सुतार यांनी शिरवणे शाळा परिसरात, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी इलठणपाडा परिसरात वृक्षारोपण केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व वृक्षप्राधिकरण सदस्यांसह नगरसेवकांनी आपापल्या प्रभाग क्षेत्रात तेथील स्वयंसेवी संस्था, वृक्षप्रेमी नागरिक यांच्यासह उत्साहाने वृक्षारोपण केले. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण आणि महापालिका अधिकारी यांनी बेलापूर पारसिक हिल परिसरात शालेय विद्यार्थ्यांसह वृक्षारोपण केले. ऐरोली सेक्टर ६ येथील जागृती महिला मंडळाच्या वतीनेही वृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. घणसोली येथे भाजपाच्या नगरसेविका उषा पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सेक्टर ४ मधील मोकळी जागा, शाळांचे मैदान तसेच पोलीस चौकीभोवती वृक्षारोपण करण्यात आले. तसेच इमारत आवारात व दुकानांसमोर लावण्यासाठी देखील झाडांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पुरुष व महिलांसह तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या उपक्रमाला हातभार लावला. (प्रतिनिधी)>विशेष मुलांनीही केली वृक्षलागवडमहानगरपालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे विशेष विद्यार्थी या पर्यावरणशील उपक्र मात उत्साहाने सहभागी झाले होते. ७ ठिकाणी वृक्षारोपण करून वृक्षांची गरज किती आहे हे देखील यामध्ये दर्शविण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसह ४०० हून अधिक शाळांमध्ये ४ हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.