शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३० हजार पानांचे आरोपपत्र

By admin | Updated: August 9, 2016 04:03 IST

बहुचर्चित बाळगंगा सिंचन प्रकल्पाच्या बांधकाम घोटाळ्यात कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर यांच्यासह १० जणांवर ३० हजार पानांचे आरोपपत्र सोमवारी

जितेंद्र कालेकर, ठाणेबहुचर्चित बाळगंगा सिंचन प्रकल्पाच्या बांधकाम घोटाळ्यात कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर यांच्यासह १० जणांवर ३० हजार पानांचे आरोपपत्र सोमवारी ठाण्याच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. धरणाचे चुकीचे संकल्पचित्र वापरून कामाच्या स्वरूपात वाढ करत राज्य सरकारचे ९२ कोटी ६३ लाख ४२ हजार ११० रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे बांधल्या जाणाऱ्या बाळगंगा प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे आरोप होऊ लागल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली. एसीबीच्या विशेष चौकशी पथकाने २५ आॅगस्ट २०१५ रोजी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, तत्कालीन मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील, ठाणे पाटबंधारे मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे, रायगड पाटबंधारे विभाग-१ कोलाडचे तत्कालीन कार्यकारी अभियंता आनंदा काळुखे, कोलाडचे तत्कालीन सहायक अभियंता राजेश रिठे, कोलाडचे तत्कालीन शाखा अभियंता विजय कासट आणि एफए कन्स्ट्रक्शन आणि एफए एंटरप्रायजेसचे भागीदार फतेह मोहंमद अब्दुल्ला खत्री, निसार खत्री, अबीद फतेह खत्री, झाहीद फतेह खत्री आदी १० जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलारायगड जिल्ह्यातील बाळगंगा नदीवर धरण बांधण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्यानंतर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने धरणाच्या बांधकामासाठी २००९ मध्ये निविदा मागवल्या होत्या. त्यात चार ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे दाखवण्यात आले. त्यात एफए एंटरप्रायजेस या कंपनीला बाळगंगा धरणाच्या कामाचा ठेका मिळाला. एफए एंटरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री व इतरांनी निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक झाल्याचे भासवले. त्यांनी आरएन नायक आणि सन्स, हुबळी या कंपनीने निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याचे भासवले. या अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींची मालमत्ता...च्गिरीश बाबर यांच्यासह १४ जणांच्या घरझडतीत २५ आॅगस्ट २०१५ रोजी करोडो रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.गरीश बाबर - ३२ हजार ५०० ची रोकड, राहुरी येथील जमिनीची कागदपत्रेबाळासाहेब पाटील - कोल्हापूर येथे दोन मजली आरसीसी बंगला, विविध बँक खात्यात ६८ लाख ३८ हजारांची रोकड, कार जमिनीसह करोडोंची मालमत्ता.रामचंद्र शिंदे - पुणे ६० लाखांचा फ्लॅट, विविध बँक खात्यात १८ लाख ८१ हजार, दोन कोटी ३७ लाखांच्या सोन्याचे दागिने, सोलापूरसह विविध ठिकाणी जमिनी.आनंदा काळुखे - पत्नी आणि स्वत:च्या नावाने कल्याणसह विविध ठिकाणी ६४ लाखांच्या सहा सदनिका, एक लाख ९९ हजारांची बँक शिल्लक, २० लाख आठ हजारांचे सोन्याचे दागिने तसेच विविध ठिकाणी जमिनी अशी करोडो रुपयांची मालमत्ता.राजेश रिठे (निलंबित अभियंता)- चंद्रकांत रिठे यांचे नावे इंदापूरसह विविध ठिकाणी जमिनी अशी ७० ते ८० लाखांची मालमत्ता.विजय कासट - कल्याण येथे एक लाख ६३ लाखांचा फ्लॅट, नाशिक येथे ३० लाख ८० हजारांची जमीन, याशिवाय, भिवंडी, दिंडोरी येथेही जमिनी, चार लाख ४२ हजारांची रोकड, तीन लाख ६० हजारांचे १९ तोळे दागिने.नसारा खत्री (कंत्राटदार) - खार येथे चार इमारती (२७ हजार २०० चौ. फुटांचे चटई क्षेत्र), १२०० ग्रॅम सोने आणि तीन किलो चांदी निवासस्थानी मिळाली. इमारतीच्या आवारात १३ वाहने. त्यात तीन मर्सिडीज बेण्झ, ३ स्कोडा आणि एका आॅडीचाही समावेश. ही सर्व मालमत्तेचीही माहिती आता आरोपपत्रात एसीबीने न्यायालयाला दिली आहे.