शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ठाण्यात सात महिन्यांत १८२ बालमृत्यू

By admin | Updated: January 10, 2017 04:35 IST

आदिवासी, दुर्गम भागातील कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना जिल्ह्यात सुरू आहेत. तरीदेखील अवघ्या सात महिन्यांत १८२ बालमृत्यू झाल्याची नोंद आढळून

सुरेश लोखंडे/ ठाणेआदिवासी, दुर्गम भागातील कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना जिल्ह्यात सुरू आहेत. तरीदेखील अवघ्या सात महिन्यांत १८२ बालमृत्यू झाल्याची नोंद आढळून आली आहे. यामध्ये एक ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांचा समावेश आहे. मातामृत्यू, बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च करून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, प्राप्त झालेल्या बालमृत्यूंची संख्या पाहता त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचे प्रयत्न काही सामाजिक संघटनांकडून केले जात आहेत. जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांत २०१६च्या एप्रिल ते नोव्हेंबर या सात महिन्यांत ही बालके दगावली आहेत. यामध्ये एक ते सहा वर्षाच्या २० बालकांचा समावेश आहे. तर, ७१ बालके एक वर्षापर्यंतची आहेत आणि शून्य ते सहा वर्षापर्यंतची ९१ बालके दगावलेली आहेत. दगावलेल्या बालकांमध्ये कमी वजनाची, जन्मत: व्यंग, हृदयविकार, हायपोथर्मिया, अ‍ॅस्पिरेशान न्यूमोनिया, अ‍ॅस्पेक्शिया, श्वासावरोध, हेमॅटीमिसिस, सेप्टीसिमिया, अतिज्वर, ज्वर झटके, सर्पदंश, अननोन बाइट, नेफियटीक सिंड्रोम, एचआयव्ही बाधित, न्यूमोनिया आणि इतर आजारांस बळी  पडून हे बालमृत्यू झाल्याचे गाभा समितीच्या बैठकीत उघड झाले. (प्रतिनिधी)