शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

खड्ड्यातील पाण्याने भागते तहान

By admin | Updated: May 4, 2017 05:35 IST

विक्रमगड या तालुक्यातील चिंचपाडा या ७०० आदीवासी लोकसंख्या असलेल्या गावाची तहान सध्या खड्ड्यातील गढूळ पाण्याने भागविली

विक्रमगड : या तालुक्यातील चिंचपाडा या ७०० आदीवासी लोकसंख्या असलेल्या गावाची तहान सध्या खड्ड्यातील गढूळ पाण्याने भागविली जाते आहे. या गावाला तीनही बाजूने डोंगर-दऱ्यांनी वेढलेले आहे. एका बाजुस सजन येथील लघु पाटबंधारे प्रकल्प आहे. ़हे गाव खोस्ते ग्रामपंचायत हद्दीत येते़ मात्र ते गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतिक्षेत असून सरकारी यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे त्यांना मूलभूत सुविधा मिळणेही कठीण होऊन बसले आहे़ येथे पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या असून आजही येथील लोक डॅमच्या किना-यावर खडडे पाडून त्यातील पाणी वापरुन आपली तहान भागवितात. या गावात जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्र सुरु केले आहे़. इयत्ता पहिली ते चौथी पर्यत शाळा असून विद्यार्थ्यांकरीता पिण्याच्या पाण्याची सोय नाही़ उंच भाग असल्याने बोअरवेलला पाणीच नाहीे़अशीच परिस्थिती येथील आदिवासी रहीवाशांचीही आहे़ हे गाव खोस्ते ग्रामपंचायत हद्दीत येते मात्र या गावाच्या विकासाकडे कुणीही अद्यापही लक्ष दिलेले नसल्याचा आरोप येथील रहीवासी वारंवार करीत आलेले आहेत. गावाच्या एका बाजूला सजन लघुबंधारां आहे. त्यात गावातील काही लोकांच्या जमीनी गेल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले,असे असतांना सध्या या गावात पाणी पुरवठा योजना नाही़ या गावासाठी एक विहीर असुन ती ही जानेवारी महिन्यात तळ गाठते़ त्यामुळे येथील महिलांना बंधा-याच्या शेजारी खड्डे खोदून दुषित पाणी भरावे लागत आहे, त्यावरच त्यांना आपली तहान भागवावी लागते आहे़ या खड्डयातील माती मिश्रीत पाण्यामुळे संसर्गजन्य रोगांची साथ पसरण्याची शक्यता आहे. ती उद्भवल्यानंतर त्यात काहींची बळी गेल्या नंतरच संबंधीत यंत्रणेला जाग येईल का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडुन केला जात आहे़त्याचप्रमाणे गावात परीवहनाची मोठी समस्या असून गावात कुठल्याही प्रकारच्या वाहनांची व्यवस्था नाही. वाहन मिळविण्यासाठी येथील ग्रामस्थांना ४ ते ५ किलोमीटरची पायपिट करावी लागते आहे़ गावात कोणत्याही प्रकारचा रोजगार नसून त्यांना स्थलांतरीत होऊन मजुरी किंवा गवंडी काम करुन गुजराण करावी लागत आहे़ या गावात महावितरणाची (विजेची) व्यवस्था आहे़मात्र ती नियोजनबध्द नसून कमी दाबामुळे बल्बही काजव्यासारखे लुकलुकत आहेत तर शेतीला पंपाद्वारे पाणी देता येत नसल्याने पिकाचेही नुकसान सहन करावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक आमदार, खासदार व शासकीय संत्रणेने लक्ष केद्रींत करुन या गावाला पुरविण्यांत येणा-या सोई सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यात सुधारणा घडवून आणावी अशी मागणी येथील आदिवासी ग्रामस्थ करीत आहेत़. जर या समस्या लवकर सोडविण्यात आल्या नाही तर त्यासाठी आंदोलन करण्याची तयारीही आदीवासींनी केली आहे. त्याकडे यंत्रणेचे लक्ष कधी वेधले जाणार? (वार्ताहर)निधी खर्च योजना अपूर्णचओंदे ग्रामपंचायत अंतर्गत वाढीव कॉस्ट नुसार ५६लाखांची पाणी योजना सन-२०११ मध्ये मंजूर करण्यात आलेली आहे़ व या योजनेमध्ये चिंचपाडा-खोस्ता यांनाही जोडण्यात आलेले आहेत़ परंतु ही योजना अदयापही पूर्णत्वास गेलेली नसल्याने खांड-उघाणीपाडा व खोस्ते-चिंचपाडावासियांना तीचा फायदा झालेला नाही. या परीसरात एक तर योजना मंजूर होत नाहीत व झाल्या तर त्यामध्ये सावळा-गोंधळ होत असल्याने याचा फटका रहिवाशांना बसत आहे़ या योजनेसाठी ४६ लाख ६४ हजाराचा निधी मंजूर झाला त्यापैकी ३९ लाख ८८ हजार खर्च झाले आहेत़ मात्र या पाण्याची टाकी, पाईपलाईन, अशी कामे अदयापही अपूर्ण आहेत, मग हा निधी खर्च तरी कोठे झाला? असा सवाल उपस्थित केला जात आहे़ त्यामुळे आमच्यासाठी खोस्ते ग्रामपंचायत अंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी येथील रहीवाशांनी केली आहे़