शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यातील पाण्याने भागते तहान

By admin | Updated: May 4, 2017 05:35 IST

विक्रमगड या तालुक्यातील चिंचपाडा या ७०० आदीवासी लोकसंख्या असलेल्या गावाची तहान सध्या खड्ड्यातील गढूळ पाण्याने भागविली

विक्रमगड : या तालुक्यातील चिंचपाडा या ७०० आदीवासी लोकसंख्या असलेल्या गावाची तहान सध्या खड्ड्यातील गढूळ पाण्याने भागविली जाते आहे. या गावाला तीनही बाजूने डोंगर-दऱ्यांनी वेढलेले आहे. एका बाजुस सजन येथील लघु पाटबंधारे प्रकल्प आहे. ़हे गाव खोस्ते ग्रामपंचायत हद्दीत येते़ मात्र ते गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतिक्षेत असून सरकारी यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे त्यांना मूलभूत सुविधा मिळणेही कठीण होऊन बसले आहे़ येथे पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या असून आजही येथील लोक डॅमच्या किना-यावर खडडे पाडून त्यातील पाणी वापरुन आपली तहान भागवितात. या गावात जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्र सुरु केले आहे़. इयत्ता पहिली ते चौथी पर्यत शाळा असून विद्यार्थ्यांकरीता पिण्याच्या पाण्याची सोय नाही़ उंच भाग असल्याने बोअरवेलला पाणीच नाहीे़अशीच परिस्थिती येथील आदिवासी रहीवाशांचीही आहे़ हे गाव खोस्ते ग्रामपंचायत हद्दीत येते मात्र या गावाच्या विकासाकडे कुणीही अद्यापही लक्ष दिलेले नसल्याचा आरोप येथील रहीवासी वारंवार करीत आलेले आहेत. गावाच्या एका बाजूला सजन लघुबंधारां आहे. त्यात गावातील काही लोकांच्या जमीनी गेल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले,असे असतांना सध्या या गावात पाणी पुरवठा योजना नाही़ या गावासाठी एक विहीर असुन ती ही जानेवारी महिन्यात तळ गाठते़ त्यामुळे येथील महिलांना बंधा-याच्या शेजारी खड्डे खोदून दुषित पाणी भरावे लागत आहे, त्यावरच त्यांना आपली तहान भागवावी लागते आहे़ या खड्डयातील माती मिश्रीत पाण्यामुळे संसर्गजन्य रोगांची साथ पसरण्याची शक्यता आहे. ती उद्भवल्यानंतर त्यात काहींची बळी गेल्या नंतरच संबंधीत यंत्रणेला जाग येईल का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडुन केला जात आहे़त्याचप्रमाणे गावात परीवहनाची मोठी समस्या असून गावात कुठल्याही प्रकारच्या वाहनांची व्यवस्था नाही. वाहन मिळविण्यासाठी येथील ग्रामस्थांना ४ ते ५ किलोमीटरची पायपिट करावी लागते आहे़ गावात कोणत्याही प्रकारचा रोजगार नसून त्यांना स्थलांतरीत होऊन मजुरी किंवा गवंडी काम करुन गुजराण करावी लागत आहे़ या गावात महावितरणाची (विजेची) व्यवस्था आहे़मात्र ती नियोजनबध्द नसून कमी दाबामुळे बल्बही काजव्यासारखे लुकलुकत आहेत तर शेतीला पंपाद्वारे पाणी देता येत नसल्याने पिकाचेही नुकसान सहन करावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक आमदार, खासदार व शासकीय संत्रणेने लक्ष केद्रींत करुन या गावाला पुरविण्यांत येणा-या सोई सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यात सुधारणा घडवून आणावी अशी मागणी येथील आदिवासी ग्रामस्थ करीत आहेत़. जर या समस्या लवकर सोडविण्यात आल्या नाही तर त्यासाठी आंदोलन करण्याची तयारीही आदीवासींनी केली आहे. त्याकडे यंत्रणेचे लक्ष कधी वेधले जाणार? (वार्ताहर)निधी खर्च योजना अपूर्णचओंदे ग्रामपंचायत अंतर्गत वाढीव कॉस्ट नुसार ५६लाखांची पाणी योजना सन-२०११ मध्ये मंजूर करण्यात आलेली आहे़ व या योजनेमध्ये चिंचपाडा-खोस्ता यांनाही जोडण्यात आलेले आहेत़ परंतु ही योजना अदयापही पूर्णत्वास गेलेली नसल्याने खांड-उघाणीपाडा व खोस्ते-चिंचपाडावासियांना तीचा फायदा झालेला नाही. या परीसरात एक तर योजना मंजूर होत नाहीत व झाल्या तर त्यामध्ये सावळा-गोंधळ होत असल्याने याचा फटका रहिवाशांना बसत आहे़ या योजनेसाठी ४६ लाख ६४ हजाराचा निधी मंजूर झाला त्यापैकी ३९ लाख ८८ हजार खर्च झाले आहेत़ मात्र या पाण्याची टाकी, पाईपलाईन, अशी कामे अदयापही अपूर्ण आहेत, मग हा निधी खर्च तरी कोठे झाला? असा सवाल उपस्थित केला जात आहे़ त्यामुळे आमच्यासाठी खोस्ते ग्रामपंचायत अंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी येथील रहीवाशांनी केली आहे़