शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेला मराठवाडा यंदा झाला तृप्त!

By admin | Updated: September 27, 2016 05:32 IST

तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी केली असून, परतीच्या धुवाधार पावसामुळे विभागाने सहा वर्षांत दुसऱ्यांदा सरासरी गाठली आहे.

- सुनील कच्छवे, औरंगाबाद

तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी केली असून, परतीच्या धुवाधार पावसामुळे विभागाने सहा वर्षांत दुसऱ्यांदा सरासरी गाठली आहे. पावसामुळे जमिनीत चांगली ओल आली असून, त्यामुळे रब्बी हंगामात पिकांखालील क्षेत्र वाढणार आहे.तीन वर्षांपासून मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरविली होती. दुष्काळामुळे शेतीच्या उत्पन्नात मोठी घट झाली. यंदा मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मराठवाड्यात आतापर्यंत सरासरी ९९.६७ टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७७९ मि.मी. इतके आहे. त्या तुलनेत विभागात आतापर्यंत ७७६ मि.मी. पाऊस झाला आहे. १३ वर्षांत २०१० हे मराठवाड्यात सर्वाधिक पावसाचे वर्ष राहिले. तेव्हा वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल १२५ टक्के पाऊस झाला होता. त्यानंतरची दोन वर्षे पुन्हा विभागात मोठी तूट होती. २०१३मध्ये ११० टक्केपाऊस झाला. पुढची दोन वर्षे पुन्हा सरासरी केवळ ५० ते ५५ टक्के एवढाच पाऊस झाला.विभागात रब्बी पिकांखालील सरासरी क्षेत्र २० लाख ७७ हजार हेक्टर एवढे आहे. दोन वर्षांत अपुऱ्या पावसामुळे त्यातील निम्म्या क्षेत्रावरही पेरा झाला नव्हता. यंदा हे क्षेत्र निश्चितच वाढणार आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये रब्बीचे क्षेत्र ८ लाख ६४ हजार एवढे आहे. ते ८ लाख ९९ हजार हेक्टरवर जाण्याची अपेक्षा विभागीय कृषी अधीक्षक पंडित लोणारे यांनी व्यक्त केली.‘मांजरा’चे सहा दरवाजे उघडलेबीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना वरदान ठरलेले मांजरा धरण चार वर्षांनंतर १०० टक्के भरले असून, सोमवारी धरणाचे १८पैकी ६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. ‘मांजरा’खालील २० गावांत पूरस्थिती असून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तावरजा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्याचे तीन दरवाजे उघडले आहेत. तीन वर्षांपासून प्रकल्प कोरडा होता. लातूरला सर्वाधिक पाऊस! दुष्काळाचे चटके सहन करावे लागलेल्या लातूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे वार्षिक सरासरीच्या ११४ टक्के तर बीड जिल्ह्यात १०९ टक्के पाऊस झाला.१२ वर्षांत ५ वेळा सरासरी : बारा वर्षांत केवळ पाच वेळा मराठवाड्यात सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाला आहे.