शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

मृतसाठा उपसून भागतेय ५० गावांची तहान

By admin | Updated: March 3, 2017 01:01 IST

५० गावांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या नाझरे जलाशयातील पाणी पुढील चार महिने टिकवण्यासाठी आतापासूनच नियोजनाची आवश्यकता आहे.

जेजुरी : जेजुरी आणि पुरंदर व बारामती या तालुक्यांतील सुमारे ५० गावांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या नाझरे जलाशयातील पाणी पुढील चार महिने टिकवण्यासाठी आतापासूनच नियोजनाची आवश्यकता आहे. मात्र, तसे प्रयत्न होताना दिसत नाही. यामुळे जलाशयावर अवलंबून असणारे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. पुरंदर आणि बारामती या तालुक्यांतील सुमारे ५० गावांना जेजुरीनजीकच्या नाझरे जलाशयातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यात जेजुरी शहर, जेजुरी औद्योगिक क्षेत्र, आयएसएमटी कंपनी, तसेच पारगाव माळशिरस व २३ गावे, नाझरे व ५ गावे, तसेच बारामती तालुक्यातील मोरगाव व १६ गावांचा समावेश आहे. या गावांना पुढील ४ महिने पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, जलसंपदा विभागाकडून याबाबतचे नियोजन झाले नसल्याच्याच तक्रारी आहेत. नाझरे जलाशयात सध्या १६२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. सुमारे ७८८ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या जलाशयात गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुमारे २०० दशलक्ष पाणीसाठा होता. मुळात जलाशयाचा मृत पाणीसाठा २०० दशलक्ष घनफूट आहे. आज मृत साठ्यातूनच या ५० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. मृत साठ्यातील पाणी पिण्यास योग्य नसतानाही तहान भागविण्यासाठी त्यातूनच पाणीपुरवठा करावा लागत आहे. योजनांना पाणी, बाष्पीभवन यांमुळे दररोज एक ते दीड दशलक्ष घनफूट पाणी कमी होत आहे. पुढील तीन ते चार महिने पाणी पुरविणे जिकिरीचे बनलेले आहे. यातच उन्हाळाही प्रचंड वाढलेला आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे आहे हेच पाणी जपून वापरावे लागत आहे. यासाठी नाझरेचे नियोजन करण्याची गरज आहे. नाझरे जलाशयावरून पाण्याचे नियोजन केले जात नाही. आजही अनेक अनधिकृत योजना पाणी घेत असल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात नाझरे शाखाधिकारी एन. सी. नागोसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की जलाशयावरील पाण्याचे नियोजन केलेले आहे. येत्या १५ जुलैअखेर पाणी पुरविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जलाशयावरील पिण्याच्या पाण्याच्या योजना, जेजुरी शहर, आयएसएमटी कंपनी व औद्योगिक क्षेत्राला दिवसाआड ८ तास पाणी उचलण्याची परवानगी देण्यात आली आहे. शेती सिंचनाच्या सर्वच्या सर्व योजना बंद केलेल्या आहेत, अशी माहिती दिली आहे. मात्र, पाणीपुरवठ्याचे नियोजन केलेले असले, तरीही अनेक योजना अजूनही १२ तास पाणी उचलत आहेत. पिण्याचे पाणी राखण्याऐवजी कारखानदारीला दिले जात आहे. या संदर्भात पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांच्याकडे पत्र देऊन कारखानदारीला विशेषत: आयएसएमटी कंपनीला पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती माणिक झेंडे पाटील यांनी केलेली आहे.>गाळमिश्रीत पाणी : अत्यल्प साठा शिल्लकसध्या नाझरे जलाशयात मृत साठ्यातील अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. गावोगावच्या पाणी योजनांना आताच गाळमिश्रित पाणीपुरवठा होऊ लागला आहे. कारखानदारी, बाष्पीभवन यांमुळे हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार नाही अशीच स्थिती आहे. त्यासाठी शेती, कारखानदारीला पाणी बंद करणे गरजेचे आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवणे गरजेचे असल्याचे माणिक झेंडे यांनी सांगितले.