शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

ठामपाच्या योजनेचा विचार करा

By admin | Updated: July 23, 2016 04:39 IST

झोपडपट्टीधारकांचे ‘बीएसयूपी’ योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यास किंवा दरमहा संबंधितांना पाच हजार रुपये भाडे देण्यास महापालिका तयार आहे, असे ठाणे महापालिकेने शुक्रवारी उच्च न्यायालयाला सांगितले.

मुंबई : पारसिक बोगद्यावरील डोंगराच्या परिसरातील झोपडपट्टीधारक पात्र असल्यास त्यांचे ‘बीएसयूपी’ योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यास किंवा दरमहा संबंधितांना पाच हजार रुपये भाडे देण्यास महापालिका तयार आहे, असे ठाणे महापालिकेने शुक्रवारी उच्च न्यायालयाला सांगितले.न्यायालयाने त्यावर मुंब्रा येथील उदयनगरच्या झोपडपट्टीधारकांना महापालिकेच्या योजनेवर विचार करण्याची सूचना केली. तसेच याचिकाकर्त्यांना महसूल व वन विभाग आणि मध्य रेल्वेला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले.मध्य रेल्वेवरील पारसिक डोंगरावर वारंवार दरड कोसळत असल्याने ठाणे महापालिकेने झोपडपट्टीधारकांना १० दिवसांत झोपड्या खाली करण्यासंदर्भात नोटीस बजावली. त्यास झोपडपट्टीधारकांना उच्च न्यायालयात आव्हान दिले. याचिकेवरील सुनावणी न्या. हिमांशु केतकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे झाली.मागील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत काय करणार, अशी विचारणा ठाणे महापालिकेकडे केली. पावसाळ््याच्या चार महिन्यांकरिता नोटीस बजावण्यात आली आहे. जीवितहानी होऊ नये, यासाठी महापालिकेने ही काळजी घेतली आहे. भविष्यात दुर्घटना घडल्यास महापालिकेला दोषी धरण्यात येईल. पावसाळ््यात व अन्य दिवसांतही येथे दरड कोसळतात, असे ठाणे महापालिकेतर्फे अ‍ॅड. एन. आ. बुभना यांनी खंडपीठाला सांगितले. चार महिन्यांनंतर पुन्हा झोपडपट्टीधारक मूळ ठिकाणी राहायला येऊ शकतात का, असा प्रश्न खंडपीठाने महापालिकेला केला. त्यावर बुभना यांनी कोणतेही आश्वासन देण्यास नकार दिला. हा भूखंड शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अखत्यारीत येतो. तसेच मध्य रेल्वेचीही परवानगी घ्यावी लागेल. या मार्गावरून सतत जलद लोकल धावत असतात, असे बुभना यांनी खंडपीठाला सांगितले. पात्र झोपडपट्टीधारकांसाठी महापालिकेची बीएसयूपी ही पुनर्वसन योजना आहे, अशी माहिती महापालिकेने दिली. झोपडपट्टीधारकांनी त्यांच्या झोपड्या १९९५ पूर्वीच्या असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कागदपत्रे पडताळून पुढील निर्णय घेतला जाईल, असे बुभना यांनी न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी) >मध्य रेल्वे प्रतिवादीन्यायालयाने संबंधित रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या या योजनेचा विचार करण्याची सूचना केली. तसेच याचिकाकर्त्यांना राज्य सरकारच्या महसूल व वन विभाग व मध्य रेल्वेला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले.