शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

चर्चेच्या पुढे जाऊन विचार करावा - प्रियंका चतुर्वेदी

By admin | Updated: June 3, 2016 23:09 IST

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सकारात्मकतेवर आधारित हवेत. दोन्ही देशांमधील चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता तर आहेच. परंतु गेल्या ६९ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि . 3 -   भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सकारात्मकतेवर आधारित हवेत. दोन्ही देशांमधील चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता तर आहेच. परंतु गेल्या ६९ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. आता त्याहून पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे, असे मत काँग्रेसच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.चर्चेपलीकडे जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु अनेकदा राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. त्यामुळेच चर्चेसंबंधात दोन पावले समोर टाकल्यानंतर काही काळातच चार पावले मागे घ्यावी लागतात. गेल्या ६९ वर्षांत दोन्ही देशांमध्ये कटू प्रसंगच जास्त दिसून आले. भारत व पाकिस्तानदरम्यान संवादाचा कुठलाही सामान्य आधार नाही. दोन्ही देशांतील लोकांचे काही बाबतीत विचार भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यात संवाद वाढणे आवश्यक आहे. जनतेमधील संवाद वाढविण्यासाठी हिंदी चित्रपट, संस्कृती यांचा उपयोग होऊ शकतो. सोबतच दोन्ही देशांच्या सैन्यातदेखील चर्चा झाली पाहिजे, असे चतुर्वेदी म्हणाल्या.दोन्ही देशांमध्ये प्रसारमाध्यमांचे महत्त्व आहे. त्यांचेदेखील आदानप्रदान व्हायला हवे. देश प्रगतीकडे पावले टाकत आहे. त्यामुळे अशा स्थितीत इतिहास दूर सारून नवी सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देशांमधील संबंधांचे धोरण प्रसारमाध्यमांमधील चर्चांच्या आधारावर तयार व्हायला नको. दोन्ही देशांमध्ये भविष्यात नवीन सुरुवात व्हावी अशीच देशातील इतर तरुणांप्रमाणेच माझीदेखील अपेक्षा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.