शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेच्या पुढे जाऊन विचार करावा - प्रियंका चतुर्वेदी

By admin | Updated: June 3, 2016 23:09 IST

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सकारात्मकतेवर आधारित हवेत. दोन्ही देशांमधील चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता तर आहेच. परंतु गेल्या ६९ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि . 3 -   भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सकारात्मकतेवर आधारित हवेत. दोन्ही देशांमधील चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता तर आहेच. परंतु गेल्या ६९ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. आता त्याहून पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे, असे मत काँग्रेसच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.चर्चेपलीकडे जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु अनेकदा राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. त्यामुळेच चर्चेसंबंधात दोन पावले समोर टाकल्यानंतर काही काळातच चार पावले मागे घ्यावी लागतात. गेल्या ६९ वर्षांत दोन्ही देशांमध्ये कटू प्रसंगच जास्त दिसून आले. भारत व पाकिस्तानदरम्यान संवादाचा कुठलाही सामान्य आधार नाही. दोन्ही देशांतील लोकांचे काही बाबतीत विचार भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यात संवाद वाढणे आवश्यक आहे. जनतेमधील संवाद वाढविण्यासाठी हिंदी चित्रपट, संस्कृती यांचा उपयोग होऊ शकतो. सोबतच दोन्ही देशांच्या सैन्यातदेखील चर्चा झाली पाहिजे, असे चतुर्वेदी म्हणाल्या.दोन्ही देशांमध्ये प्रसारमाध्यमांचे महत्त्व आहे. त्यांचेदेखील आदानप्रदान व्हायला हवे. देश प्रगतीकडे पावले टाकत आहे. त्यामुळे अशा स्थितीत इतिहास दूर सारून नवी सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देशांमधील संबंधांचे धोरण प्रसारमाध्यमांमधील चर्चांच्या आधारावर तयार व्हायला नको. दोन्ही देशांमध्ये भविष्यात नवीन सुरुवात व्हावी अशीच देशातील इतर तरुणांप्रमाणेच माझीदेखील अपेक्षा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.