शहरं
Join us  
Trending Stories
1
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
2
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
3
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
4
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
5
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
6
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
7
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
8
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
9
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
10
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
11
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
12
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
13
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
14
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
15
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
16
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
17
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
18
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
19
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
20
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!

चर्चेच्या पुढे जाऊन विचार करावा - प्रियंका चतुर्वेदी

By admin | Updated: June 3, 2016 23:09 IST

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सकारात्मकतेवर आधारित हवेत. दोन्ही देशांमधील चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता तर आहेच. परंतु गेल्या ६९ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि . 3 -   भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सकारात्मकतेवर आधारित हवेत. दोन्ही देशांमधील चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता तर आहेच. परंतु गेल्या ६९ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. आता त्याहून पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे, असे मत काँग्रेसच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.चर्चेपलीकडे जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु अनेकदा राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. त्यामुळेच चर्चेसंबंधात दोन पावले समोर टाकल्यानंतर काही काळातच चार पावले मागे घ्यावी लागतात. गेल्या ६९ वर्षांत दोन्ही देशांमध्ये कटू प्रसंगच जास्त दिसून आले. भारत व पाकिस्तानदरम्यान संवादाचा कुठलाही सामान्य आधार नाही. दोन्ही देशांतील लोकांचे काही बाबतीत विचार भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यात संवाद वाढणे आवश्यक आहे. जनतेमधील संवाद वाढविण्यासाठी हिंदी चित्रपट, संस्कृती यांचा उपयोग होऊ शकतो. सोबतच दोन्ही देशांच्या सैन्यातदेखील चर्चा झाली पाहिजे, असे चतुर्वेदी म्हणाल्या.दोन्ही देशांमध्ये प्रसारमाध्यमांचे महत्त्व आहे. त्यांचेदेखील आदानप्रदान व्हायला हवे. देश प्रगतीकडे पावले टाकत आहे. त्यामुळे अशा स्थितीत इतिहास दूर सारून नवी सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देशांमधील संबंधांचे धोरण प्रसारमाध्यमांमधील चर्चांच्या आधारावर तयार व्हायला नको. दोन्ही देशांमध्ये भविष्यात नवीन सुरुवात व्हावी अशीच देशातील इतर तरुणांप्रमाणेच माझीदेखील अपेक्षा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.