शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

‘सायन्स टॉपर’ बनला चोर

By admin | Updated: June 7, 2017 06:04 IST

गाड्यांची चोरी करून ‘ओएलएक्स’वर विक्री केल्याप्रकरणी उच्चभ्रू कुटुंबातील जयकिशन ओमप्रकाश सिंग (२३) या विद्यार्थ्याला सोमवारी अंधेरीतून अटक करण्यात आली.

गौरी टेंबकर-कलगुटकर । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गाड्यांची चोरी करून ‘ओएलएक्स’वर विक्री केल्याप्रकरणी उच्चभ्रू कुटुंबातील जयकिशन ओमप्रकाश सिंग (२३) या विद्यार्थ्याला सोमवारी अंधेरीतून अटक करण्यात आली. जयकिशन हा महाराष्ट्रातील बारावी ‘सायन्स टॉपर’पैकी एक असून त्याला २०१५-१६ मधील बोर्डाच्या परीक्षेत ९८.५०% गुण मिळाले होते. गेल्या सहा महिन्यांपासून एमआयडीसी पोलीस त्याच्या मागावर होते.जयकिशन ओमप्रकाश सिंग अंधेरी पूर्वच्या मालपाडोंगरी परिसरात कुटुंबासोबत राहतो. त्याचे वडील व्यवसायाने डॉक्टर आहेत. तो राहत असलेल्या परिसरातच त्याने काळ्या रंगाची होंडा कंपनीची टिष्ट्वस्टर ही मोटारसायकल चोरली. ती घेऊन जात असताना गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस ठाण्यात आणल्यावर सुरुवातीला गुन्हा कबूल न करणाऱ्या जयकिशनला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तसेच पुरावे मिटविण्यासाठी त्या परिसरातील सीसीटीव्हीदेखील फोडल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने तीन महागड्या गाड्यांची चोरी केली आहे. गाडी चोरून ती निर्जनस्थळी ठेवायची. त्यानंतर त्याचा फोटो काढून तो ‘ओएलएक्स’वर शेअर करायचा आणि ती विकायची   अशी त्याची कार्यपद्धती असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याला सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.>अन् बाईक ‘ओएलएक्स’वर सापडली !सहा महिन्यांपूर्वी जयकिशनने एमआयडीसी परिसरातून एक मोटरसायकल चोरी केली होती. तिची जाहिरात त्याने ‘ओएलएक्स’ वर दिली जी नेमकी त्याच मोटारसायकलच्या मालकाने पाहिली. त्यानुसार त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी पोलीस उपनिरीक्षक शाम आयरे यांच्या नेतृत्वाखाली चव्हाण, सोनवणे, ब्रिजेश पवार, आतोळे आणि गवळी यांचे एक पथक तयार केले होते. ते जयकिशनच्या मागावर होते आणि अखेर सोमवारी रात्री या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.>व्यसनामुळे चोरी...अंधेरीच्या जीपीएम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आणि अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या जयकिशनला बारावीनंतर अमली पदार्थांची (बटन्स) सवय लागली. त्यामुळे गाड्या चोरण्यास त्याने सुरुवात केली. त्यातही पदवीच्या पहिल्या वर्षी तो वर्गात पहिला आला. मात्र द्वितीय वर्षात त्याला एका विषयात के.टी. लागली. तेव्हा पालक त्याला गावी घेऊन गेले आणि तेथे त्याचे लग्न लावून दिले. गावी काही महिने तो नीट वागला, मात्र मुंबईला पुन्हा के.टी.च्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आला आणि त्याने गाडी चोरण्याची योजना बनवली. मात्र या वेळी एमआयडीसी पोलिसांनी त्याला पकडले.