शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘सायन्स टॉपर’ बनला चोर

By admin | Updated: June 7, 2017 06:04 IST

गाड्यांची चोरी करून ‘ओएलएक्स’वर विक्री केल्याप्रकरणी उच्चभ्रू कुटुंबातील जयकिशन ओमप्रकाश सिंग (२३) या विद्यार्थ्याला सोमवारी अंधेरीतून अटक करण्यात आली.

गौरी टेंबकर-कलगुटकर । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गाड्यांची चोरी करून ‘ओएलएक्स’वर विक्री केल्याप्रकरणी उच्चभ्रू कुटुंबातील जयकिशन ओमप्रकाश सिंग (२३) या विद्यार्थ्याला सोमवारी अंधेरीतून अटक करण्यात आली. जयकिशन हा महाराष्ट्रातील बारावी ‘सायन्स टॉपर’पैकी एक असून त्याला २०१५-१६ मधील बोर्डाच्या परीक्षेत ९८.५०% गुण मिळाले होते. गेल्या सहा महिन्यांपासून एमआयडीसी पोलीस त्याच्या मागावर होते.जयकिशन ओमप्रकाश सिंग अंधेरी पूर्वच्या मालपाडोंगरी परिसरात कुटुंबासोबत राहतो. त्याचे वडील व्यवसायाने डॉक्टर आहेत. तो राहत असलेल्या परिसरातच त्याने काळ्या रंगाची होंडा कंपनीची टिष्ट्वस्टर ही मोटारसायकल चोरली. ती घेऊन जात असताना गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस ठाण्यात आणल्यावर सुरुवातीला गुन्हा कबूल न करणाऱ्या जयकिशनला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तसेच पुरावे मिटविण्यासाठी त्या परिसरातील सीसीटीव्हीदेखील फोडल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने तीन महागड्या गाड्यांची चोरी केली आहे. गाडी चोरून ती निर्जनस्थळी ठेवायची. त्यानंतर त्याचा फोटो काढून तो ‘ओएलएक्स’वर शेअर करायचा आणि ती विकायची   अशी त्याची कार्यपद्धती असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याला सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.>अन् बाईक ‘ओएलएक्स’वर सापडली !सहा महिन्यांपूर्वी जयकिशनने एमआयडीसी परिसरातून एक मोटरसायकल चोरी केली होती. तिची जाहिरात त्याने ‘ओएलएक्स’ वर दिली जी नेमकी त्याच मोटारसायकलच्या मालकाने पाहिली. त्यानुसार त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी पोलीस उपनिरीक्षक शाम आयरे यांच्या नेतृत्वाखाली चव्हाण, सोनवणे, ब्रिजेश पवार, आतोळे आणि गवळी यांचे एक पथक तयार केले होते. ते जयकिशनच्या मागावर होते आणि अखेर सोमवारी रात्री या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.>व्यसनामुळे चोरी...अंधेरीच्या जीपीएम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आणि अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या जयकिशनला बारावीनंतर अमली पदार्थांची (बटन्स) सवय लागली. त्यामुळे गाड्या चोरण्यास त्याने सुरुवात केली. त्यातही पदवीच्या पहिल्या वर्षी तो वर्गात पहिला आला. मात्र द्वितीय वर्षात त्याला एका विषयात के.टी. लागली. तेव्हा पालक त्याला गावी घेऊन गेले आणि तेथे त्याचे लग्न लावून दिले. गावी काही महिने तो नीट वागला, मात्र मुंबईला पुन्हा के.टी.च्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आला आणि त्याने गाडी चोरण्याची योजना बनवली. मात्र या वेळी एमआयडीसी पोलिसांनी त्याला पकडले.