शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
4
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
5
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
6
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
7
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
8
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
9
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
10
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
11
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
12
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
13
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
14
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
15
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
16
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
17
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
18
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
19
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
20
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

By admin | Updated: January 11, 2016 01:14 IST

शांतीलाल मुथा : बाहुबली येथे भारतीय जैन संघटनेचे अधिवेशन; ‘स्टुडंट एज्युकेशनल टूर’ संकल्पना राज्यभर राबविणार

बाहुबली : भारतीय जैन संघटना जैन समाजाच्या प्रगतीसोबतच राष्ट्र उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याची घोषणा भारतीय जैन संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी रविवारी येथे केली.कुंभोजगिरी-बाहुबली (ता. हातकणंगले) येथे भारतीय जैन संघटनेच्या राज्य अधिवेशनामध्ये शांतीलाल मुथ्था बोलत होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख व राज्याध्यक्ष पारस ओसवाल, सेक्रेटरी अभिनंदन खोत, शाहू महाराज, संजय घोडावत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुथा म्हणाले, ३0 वर्षांपासून जैन संघटना समाजसेवेचे कार्य करीत आहे. देशातील विविध नैसर्गिक आपत्तीत जसे तमिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, गुजरात व नेपाळ या ठिकाणी संघटनेने नागरी सुविधा पुरविल्या होत्या. यावर्षी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबाचे सर्वेक्षण करून त्यावर उपाय शोधण्याचे काम सुरू आहे. बीड जिल्ह्यातील ११७ तलावांमधील गाळ काढून हजारो शेतकऱ्यांना २0 लाख क्युबिक सें. मी. इतके पाणी उपलब्ध करून दिले आहे. समाजसेवेची कामे अशीच सुरू ठेवणार आहे. संजय घोडावत यांनी संघटनेच्या कार्याला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबत त्यांच्या मुलांना घोडावत इन्स्टिट्यूटकडून स्क ॉलरशिप देण्याचे आश्वासनही दिले.शाहू महाराज म्हणाले, भारतीय जैन संघटनेचे कार्य आश्चर्यचकित करणारे आहे. ही मानवतावादी संघटना आहे. याचे अनुकरण अन्य सामाजिक संघटनांनी करावे. संघटनेने शासनालादेखील आपल्या कार्यातून दिशा दाखवावी.संघटनेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी आगामी काळातील संघटनेच्या कार्याबाबत कार्यकर्त्यांना प्रबोधन केले. ते म्हणाले, जैन समाज एकूण लोकसंख्येच्या अर्धा टक्केदेखील नाही; परंतु देशाच्या विकासात त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी ‘स्टुडंट एज्युकेशनल टूर’ ही संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचे सांगितले. संघटनेचे राज्य सेक्रेटरी अभिनंदन खोत यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जैन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. जैन समाजातील गरीब व रोजंदारीवर जाणाऱ्या बांधवांविषयीची कणव त्यांनी व्यक्त केली. जैन समाजातील आर्थिक दरी संपविण्याचे त्यांनी आवाहन केले.संघटनेचे राज्य अध्यक्ष पारस ओसवाल यांनी जैन समाजाने शिक्षणासह व्यापार व व्यवसायावर लक्ष द्यावे, असे आवाहन केले. त्यांनी युवक-युवतींसाठी शिक्षणविषयक प्रबोधन, आदी कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी अनिल पाटील यांनी संपादित केलेल्या संघटनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमास संघटनेचे राष्ट्रीय सेक्रेटरी महेश कोठारी, पंजाबचे अध्यक्ष राकेश जैन, गुजरातचे अध्यक्ष मालतीबेन मेहता, तमिळनाडूचे उपाध्यक्ष कैलासमलजी दुगड, हस्तिमल बंब, अशोक संघवी, सुदर्शन जैन, सुरेश मगदूम, डॉ. शीतल पाटील, विक्रांत नाईक, सुरेश पाटील (सांगली), बी. टी. बेडगे, बाबासाहेब पाटील, डी. सी. पाटील, स्वरूपा यड्रावकर, कुं भोजगिरी तीर्थ कमिटीचे प्रमुख अंबालालजी जैन, मनिकांत शहा, रावसाहेब भिलवडे, यांच्यासह देशभरातून विविध प्रांतांतून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)३५0 मुलांची जबाबदारी राज्यातील मराठवाडा व विदर्भातील ३५0 मुलांच्या पाचवी ते १२ वीच्या शिक्षणाची जबाबदारी संघटनेने उचलली आहे. संघटना वाघोली (पुणे) येथील वसतिगृहात विद्यार्थ्यांना सांभाळण्याचे काम करते आहे. त्याची दखल राज्यपालांनी घेतली आहे.अमर गांधी नवे राज्याध्यक्षया अधिवेशनात २०१६ ते नोव्हेंबर २०१८साठी चंद्रपूर येथील अमर गांधी यांची राज्याध्यक्ष म्हणून घोषणा झाली. ते आठ वर्षे राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत.