शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

‘त्यांना’ देशात राहण्याचा अधिकार नाही

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

भारतमाता की जय म्हणायचे की नाही यावरून सध्या देशात वाद सुरू असून, भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांना देशात राहण्याचा कोणताच अधिकार नाही, असे ठणकावत मुख्यमंत्री देवेंद्र

नाशिक : भारतमाता की जय म्हणायचे की नाही यावरून सध्या देशात वाद सुरू असून, भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांना देशात राहण्याचा कोणताच अधिकार नाही, असे ठणकावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारच्या घोषणा देणाऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी उभे राहत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.भाजपाच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने शनिवारी गोदाकाठावर आयोजित संवाद यात्रेच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. आपल्या पाऊण तासाच्या भाषणात फडणवीस यांनी, ‘भारत माता’ विरोधात घोषणा देणाऱ्यांना आडवे हात घेतले. भारतमाता की जय, वंदे मातरम या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून, विरोधकांनी प्रसंगी भाजपाला विरोध करावा; परंतु भारत मातेला विरोध करू नये; ते देशातील जनता कदापि सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. नाशिकच्या गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी देण्याच्या विषयावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मराठवाड्याला पाणी सोडले त्यावेळी आमदार, खासदार यांनी आपल्याकडे येऊन तक्रार केली; परंतु राज्यातील एक भाग तहानलेला असताना त्यांना पाणी न देणे योग्य होणार नाही, अशी भूमिका आपण घेतली व मराठवाड्याला पाणी सोडले, असे त्यांनी स्पष्ट केले.शिवसेनेला केले लक्ष्यस्वतंत्र मराठवाड्याच्या विषयावरून भाजपाच्या महिला मेळाव्यावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी लक्ष्य केले. ज्यांनी स्वतंत्र मराठवाड्याला विरोध केला, त्यांनीच मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध दर्शविला, एकीकडे संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करायची व दुसरीकडे मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध करायचा ही कोणती नैतिकता आहे, असा सवाल करून मराठवाड्यातील जनता आपलीच आहे, ती पाकिस्तानी नाही त्यामुळे एकदा ठरवून टाका जे करायचे ते करा, मला विरोध घ्यावा लागला तरी घेईन व प्रसंगी नाशिककरांची माफी मागेन; परंतु मराठवाड्यासाठी घोटभर पाणी देईन, असे फडणवीस म्हणाले.