शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

‘ते’ मूल वडिलोपार्जित संपत्तीवर दावा करू शकत नाही - हायकोर्ट

By admin | Updated: June 11, 2017 01:33 IST

‘ते’ मूल वडिलोपार्जित संपत्तीवर दावा करू शकत नाही - हायकोर्ट

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लिव्ह-इन-रिलेशनशिप व समलिंगी संबंधातून जन्माला आलेल्या मुलांनी कायदेपंडितांना ‘विवाहा’चा अर्थ लावण्याचे आव्हान दिले आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला नैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाप्रमाणेच वडिलांच्या संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट केले. मात्र अनैतिक संबंधातून जन्माला आलेले मूल वडिलोपार्जित संपत्तीवर आपला अधिकार सांगू शकत नाही, हे देखील उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे एका मुलीला तिच्या मरण पावलेल्या वडिलांची संपत्ती व सेवानिवृत्ती वेतनमधील काही हिस्सा मिळू शकतो.मूल नैतिक की अनैतिक संबंधांतून जन्माला आले आहे, याचा निर्णय घेण्यासाठी ‘विवाह’ ही महत्त्वाची अट आहे, असे न्या. मृदूला भाटकर यांनी अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलीच्या अर्जावर निर्णय देताना म्हटले. मुलीच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातून त्यांना मुलगी झाली.‘वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला अजिबात नाही, यात शंकाच नाही. मात्र या मुलाला वडिलांच्या नैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाप्रमाणे वडिलांच्या संपत्तीवर व अन्य लाभांवर दावा करण्याचा अधिकार आहे. बेकायदा विवाहातून जन्माला आलेल्या मुलासंदर्भातील काही समााजिक विसंगती दूर करण्यासाठी कायदेमंडळाने प्रगतिशील पाऊल उचलले आहे,’ असे न्या. भाटकर यांनी म्हटले.विवाह एक समाजिक बंधन आहे तर मूल जन्माला येणे हे नैसर्गिक आहे. कधी आणि कसा जन्म घ्यायचा, हे माणसाच्या हातात नाही. त्यामुळे अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही. तेच मूल जर नैतिक संबंधातून जन्माला आले असते तर त्याला जे अधिकार मिळाले असते, ते त्याला द्यायला हवेत, असेही न्या. भाटकर म्हणाले.भारतात लिव्ह-इन-रिलेशीपमध्ये राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या नात्यालाही विवाहाप्रमाणे स्वीकारले जात आहे. ‘मातृत्व’ मान्य केले जाते व सिद्धही होते मात्र ज्या प्रकरणामध्ये कायदेशीर विवाह झाला नाही, त्यामध्ये ‘पितृत्व‘ सहजासहजी स्वीकारले जात नाही. ते सिद्ध करावे लागते. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाचे वडील त्याच्या जबाबदारीतून हात झटकू शकत नाही. अशा मुलांच्या अधिकारांचे संरक्षण करायला हवे. परंतु, विवाह न करता झालेल्या मुलाला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता मिळत नाही, असे न्या भाटकर यांनी म्हटले.विवाहाची व्याख्या कायद्यात करण्यात आलेली नाही. त्यामुळे परंपरेनुसार किंवा कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच नात्याला‘विवाहा’ चे लेबल लावावे लागते. ‘एका रात्रीचे संबंध किंवा एखाद्या पुरुष आणि महिलेने संमतीने एकमेकांशी ठेवलेले शारिरीक संबंध म्हणजे विवाह नाही,’ असेही न्या. भाटकर यांनी स्पष्ट केले.इच्छा असली पाहिजे‘शारिरीक संबंध असणे, हे विवाहातील मुख्य बाब असली तरी ते म्हणजे सर्व नाही. त्यापेक्षा अधिक विवाहासाठी आवश्यक आहे. नात्याला ‘विवाहा’ चे नाव देण्यासाठी दोन्ही पक्षांना एकमेकांशी विवाह करण्याची आणि एकमेकांना ‘पती’ व ‘पत्नी’ चा दर्जा देण्याची इच्छा असली पाहिजे. याचे प्रकटीकरण काही पारंपारिक किंवा कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यावरच होते,’ असेही न्या. भाटकर यांनी म्हटले.