शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

निकमांना बिर्याणी भोवणार

By admin | Updated: March 23, 2015 01:16 IST

दहशतवादी अजमल कसाबसंदर्भात बिर्याणीच्या मुद्यावरून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वातावरण निर्मितीसाठी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे.

जळगाव : दहशतवादी अजमल कसाबसंदर्भात बिर्याणीच्या मुद्यावरून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वातावरण निर्मितीसाठी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. कसाबला जाणून बुजून तर फाशी देण्यात आली नाही ना, असा समज त्यांच्या वक्तव्यामुळे निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार असून निकम यांच्याकडून खुलासा मागविला जाईल, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर जिवंत राहिलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबने कारागृहात कधीही मटण बिर्याणीची मागणी केली नव्हती़ त्याच्याबद्दल लोकांना वाटत असलेल्या सहानुभूतीची जागा संतापाने घ्यावी, या हेतूने अशा प्रकारच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या, असा धक्कादायक खुलासा निकम यांनी शुक्रवारी जयपूर येथे आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान पत्रकारांशी बोलताना केला होता़ कसाबने बिर्याणी मागितली नाही आणि शासनाने ती कधी पुरविली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते़ त्याबाबत बोलताना खडसे म्हणाले, तत्कालीन गृहमंत्री आऱआऱ पाटील यांच्यासमवेत मी स्वत: कसाबची भेट घेतली आहे़ मात्र काही विषय जगासमोर ठेवण्यासारखे नाहीत़ परंतु निकम यांचे वक्तव्य आंतरराष्ट्रीय स्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारे असल्याचे खडसे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)च्निकम यांच्या वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाईबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.